मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

राज्यातील शिंदे – भाजप नेतृत्वातील प्रशासनाने चोवीस अमूल्य मानवी जीवांची हत्या केली – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर घणाघात…!!!


शिंदे – भाजप नेतृत्वातील महाराष्ट्र प्रशासनाने चोवीस अमूल्य मानवी जीवांची हत्या केली – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर घणाघात मुंबई : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मागील 24 तासात 24 मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. “एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र प्रशासनाने या 24 अमूल्य मानवी जीवांची हत्या केली आहे” अशी घणाघाती टीका त्यांनी सरकारवर केली आहे. “या घटनेतील 24 मृतांमध्ये 12 नवजात शिशु चा समावेश असल्याचे ऐकून मी आणि माझी पत्नी प्रचंड अस्वस्थ झालो. या घटनेत नवजात मुलांचे पालक, विशेषत: त्याच्या मातांना काय वाटत असेल. याची आपण कल्पनाही करू शकत नाही.” अशी अतिशय भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. सरकारच्या वतीने मात्र याप्रकरणी सारवा सारव करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी आणि औषधांचा तुटवडा असल्याचे धक्कादायक चित्र या घटने नंतर समोर येत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!