महाराष्ट्रमुख्यपान

अतिवृष्टी, पुराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी

राज्यात मोसमी पावसापूर्वी आणि मोसमी पावसाच्या काळात वीज पडण्याच्या ४७ घटनांची नोंद झाली. तर अतिवृष्टी आणि पुराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी असून, अतिवृष्टी आणि पुराच्या राज्यात ६९ घटना नोंदवल्या गेल्या.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात हवामानाच्या तीव्र घटनांची माहिती देण्यात आली आहे. अहवालात देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात वीज पडण्याच्या एकूण ४२८ घटना घडल्या. त्यात सर्वाधिक चंदीडमध्ये ८५, उत्तर प्रदेशात ८१, झारखंडमध्ये ६२ घटना नोंदवल्या गेल्या. देशभरात पूर आणि अतिवृष्टीच्या एकूण ५४४ घटनांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक हिमाचल प्रदेशमध्ये १२३ घटना घडल्या. त्या खालोखाल महाराष्ट्रात ६९, उत्तराखंडमध्ये ६८, राजस्थानमध्ये ४५ घटना घडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. उष्णतेच्या लाटा उत्तर प्रदेशात ८३ , झारखंडमध्ये २५, तर महाराष्ट्रात तीन नोंदवल्या गेल्या. वादळी पावसाच्या घटनांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात, महाराष्ट्रात दोन आणि आसाममध्ये एक घटना नोंदवल्याची माहिती अहवालात देण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!