
GPS च्या विश्वासावर भर पावसात प्रवास करणाऱ्या दोन तरुण डॉक्टर मित्रांना प्राण गमवावा लागल्याची धक्कादायक घटना केरळच्या एर्नाकुलम येथे घडली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
रात्रीच्या गडद अंधारात, मुसळधार पावसात अनोखळी रस्त्यावरून वैद्यकीय क्षेत्रातील पाचजण केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील गोथूरुथ विभागातून जात होते. डॉ. अद्वैत (२९) याचा शनिवारीच वाढदिवस होता. या वाढदिवसाची शॉपिंग करून ते कोचीहून कोडुन्गाल्लुर येथे परतत होते.
या प्रवासादरम्यान त्यांनी GPS सुरू केला होता. बाहेर गडद अंधार होता, तसंच मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. जलमय रस्त्यांवरून GPSच्या साहाय्याने ते परतत असताना भीषण अपघात झाला. GPS ने सरळ जाण्याचा मार्ग दाखवला. त्यानुसार, डॉ. अद्वैतने जलमय रस्त्यावरून गाडी सरळ चालवत नेली. परंतु, गाडी पाण्यात बुडत गेली. म्हणजेच, GPSने थेट नदीतून रस्ता दाखवला. त्यामुळे आधीच जलमय झालेले रस्ते आणि त्यात ओथंबून वाहणाऱ्या नदीत गाडी गेल्याने गाडीसह पाचजण बुडाले. यापैकी तिघांना आपला जीव वाचवता आला. तर, दोघांना जलसमाधी मिळाली. यामध्ये शनिवारी वाढदिवस असलेला डॉ. अद्वैत आणि डॉ. अजमल असिफ (२९) या दोघांचा समावेश आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत