
आशियाई खेळाच्या चौथ्या दिवशी नेमबाज मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी महिलांच्या 25 मीटर पिस्टल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
मनू भाकरने तिच्या तिसर्या शॉट्सच्या सिरीजच्या रॅपिड राऊंडमध्ये 98 शूट केले. यात तिने 590 गुणांसह अंतिम फेरीत अव्वल पटकावले. ५८६ गुणांसह ईशा सिंग आणि ५८३ गुणांसह रिदम सांगवानही अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या होत्या.
सांघिक स्पर्धेत मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम सांगवान यांनी १७५९ गुणांसह सुवर्ण कामगिरी केली. तर चीनने १७५६ आणि कोरियाचे १७४२ गुण होते. नेमबाजीत भारताचे हे दुसरे पदक आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत