महाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय

स्वच्छता मोहीमेमुळे शहरातली प्रदूषणाची पातळी साडे तीनशे वरून १०० ते ८० पर्यंत खाली…

कुर्ला परिसरातल्या अनेक मंदिरांची स्वच्छता काल करण्यात आली. मुंबई शहरात राबवण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहीमेमुळे शहरातली प्रदूषणाची पातळी साडे तीनशे वरून १०० ते ८० पर्यंत खाली आली आहे; हे या संपूर्ण स्वच्छता मोहीमेचं यश आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल म्हणाले.शिंदे काल या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.संपूर्ण स्वच्छता मोहीम ही एक जन चळवळ झाली असून या मोहीमेच्या माध्यमातून लवकरच राज्य स्वच्छ,सुंदर आणि हरित होण्यास मदत होईल,असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध आहे,याचा पुनरुच्चार शिंदे यांनी या वेळी प्रसार मध्यमांशी बोलताना केला. शासनाच्या प्रयत्नांचा विचार करून मराठा आंदोलकांनी आंदोलन मागं घ्यावं,असं आवाहनही शिंदे यांनी यावेळी केलं. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या कक्षेत बसणारं आरक्षण देण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे.त्याचवेळी ओबीसी आणि इतर कोणत्याही प्रवर्गातल्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!