महाराष्ट्रमुख्यपान

न्यायाला उशीर म्हणजे अन्यायच – आदित्य ठाकरे.

दि.28. लोकसभा निवडणूका जवळजवळ येत आहेत. तसे राज्यातील अपात्र आमदारांबाबतचा निकाल लांबविण्याचे काम सुरु असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून सातल्याने करण्यात येत आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत आहेत असा ठपकाही ठेवण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टिकरून निशाणा साधला.
यावेळी आपल्या दिट मध्ये आदित्य ठाकरे म्हणाले, न्यायाला मुद्दाम उशिर करणं म्हणजे अन्याय करणच आहे। फक्त आमच्यावर नाही, तर महाराष्ट्राबरा असे वक्तव्य केले. तसेच पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मविआचं तत्कालीन सरकार कपटाने पाडून, त्या जागी घटनाबाह्य सरकार आणून भाजपाने महाराष्ट्रावर अन्याय केला. आता सभापती राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात चेंडू असताना (ट्रिब्यूनल ची जबाबदारी असल्याने), असे दिसते की सभापती मुद्दाम विलंब करण्याचे डावपेच खेळून असंवैधानिक सरकारचं संरक्षण करण्यासाठी आपल्या क्षमतेच्या आणि चौकटीच्या पलीकडे जात आहेत असा आरोप केला.

पुढे आदित्य ठाकरे असेही म्हणाले की, जगातली सर्वात मोठी लोकशाही असा दावा करणाऱ्या भारतात घटनाबाबा सरकारचं अशा प्रकारे संरक्षण केले जाताना पाहण हे संतापजनक आहे. सभापती लवकरच घाना येथे राष्ट्रकुल संसदीय परिषदेला भेट देणार आहेत. परंतु ते कोणत्या आधारावर अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतील जिथे घटनाबाह्य, असंवैधानिक सरकार आहे आणि ज्याता बेकायदेशीर मार्गानी संरक्षणही दिलं जातंय? ह्या साऱ्यामुळे जागतिक स्तरावर देशाची बदनामी होत असून, भारतात लोकशाहीच उरलेली नाहीये असे संकेत दिले जात आहेत। अशी टीकाही केली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!