भीम जयंती कशी साजरी करावी

✍🏻☸️ आदर्श भीम जयंती..☸️ ✍🏻
बाबासाहेबांना मानने आणि बाबासाहेबांचे मानने या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.भारतात नव्वद टक्के लोक बाबा साहेबांना मानतात पुजतात पंरतु त्यांनी सांगितलेले विचार संदेश मानत नाहीत असे वागून आपण त्याचा आदर करतोय का आनादर तुम्हीच ठरवा.
उत्सव साजरा करायचा म्हटले कि १०० लोक गोळा होतात आणि महापुरुषाच्या विचाराचे आंदोलन चालवायचे म्हटल्यावर 90 लोक बहाना करुन दुर हटतात ही आजची भयान वास्तविकता आहे जी आम्ही नाकारू शकत नाही
बाबासाहेबांनी कधीही म्हटले नाही की माझी जयंती साजरी करा, जेवण ठेवा, पोस्टर लावा, बॅनर लावा, डीजे वाजवा, नाचा, गा…
या उलट ते म्हणाले की मी अतिशय कठीण परिस्थितीत शत्रूंशी लढुन मानव हिताचा समतावादी कारवा येथे आणला आहे तुम्ही भारतातील सर्व गावांमध्ये आणि ६ हजार जातींमध्ये याला घेऊन जा आणि समता, बंधुता, न्याय व स्वातंत्र्याचे वातावरण गावा गावात निर्माण करा भारताचा मूळ धर्म हा बौध्द धर्म आहे तो येथील सर्वांना समजून सांगा त्याचे पाईक व्हा भारताला लवकरच पुन्हा बौध्दमय करा आणि माझे हे अधुरे काम पुर्ण करण्यासाठी तुमच्या जीवाची बाजी लावा
बाबासाहेबांनी आपल्याला जे करायला सागितले ते आपण त्यांच्या जयंतीनिमित्त करतो का? जरा विचार करा स्वताहाला विचारा.. तर उत्तर आहे..नाही..
पंरतु निवडक लोक आसे महान कार्य निष्ठेने करत आहेत त्या व्यक्तीला, संघटनेला, नेत्याला सलाम आहे
या उलट जे चित्र समाजात दिसून येते ते म्हणजे आपल्याला भेटणारे बहुतेक लोक अन्न, सरबत, बिस्किटे वाटप करत आहेत, लाईटिग लावत आहेत, डीजे लावत आहेत, बॅनर लावत आहेत, नाचण्यासाठी आणि गाण्यासाठी ऑर्केस्ट्रा ठेवत आहेत
जे कार्य पुढे नेण्यासाठी आयुष्य समर्पित करण्याचे काम बाबासाहेबांनी सांगितले ते करण्यासाठी कोणीही पुढे येत असल्याचे दिसत नाही हे गंभीर आहे आणि वास्तव सुध्दा याला कोण बदलेल आणि कसे बदलेल
बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही आपल्यासाठी त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची आणि सध्याच्या शत्रूं विरुद्धची लढाई तीव्र करण्याची आणि ती जिंकण्याची संधी आहे. हे नीट समजून घेतले पाहिजे.बाबासाहेब हे आपल्या सुखाचे, आणि सर्व कल्याणाचे शिल्पकार आहेत. आमच्या पालकांनी आम्हाला जन्म दिला आणि आम्ही या जगात आलो पण बाबासाहेबांनी आम्हाला सन्मान आणि स्वाभिमानाचे जीवन दिले म्हणूनच ते आमच्यासाठी महान आहेत.
बाबासाहेबांनी लहान पणापासूनच आयुष्यात अतिशय प्रतिकूल परिस्थितींचा सामना केला शत्रूंशी लढण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता, नियोजन, रणनीती आणि संघटना त्यांनी स्वत निर्माण केल्या.
शत्रूंशी लढताना त्यांनी कधीही सत्ता, संपत्ती किंवा स्वार्थासाठी तडजोड केली नाही. ते समाजाचे हित सर्वोच्च मानत असे.
धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक असमानतेवर आधारित वैदिक ब्राह्मण व्यवस्थेला त्यांनी ठामपणे नाकारले आणि त्याविरुद्ध लढले आणि जिंकले सुध्दा. सर्वप्रथम, त्यांनी ब्राह्मणवादी शत्रू निर्धारित केला, लोकांना जागे केले आणि त्यांना लढण्यासाठी तयार केले, आपल्या जीवनाचा उद्देश निश्चित केला, त्यावर कृती केली आणि विजय मिळवला. अशा महान विद्वान, आदर्श महामानवाची जयंती आपण कशी साजरी करावी?
१) त्यांच्या जीवनाच्या उद्देशाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.
२) त्यांनी काय लिहिले आहे ते तुम्ही स्वतः वाचले पाहिजे.
३) त्यांचा प्रचंड संघर्ष समजून घेतला पाहिजे
४) आजच्या जीवनात आपण त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे.
५) जर आपल्याला खरोखर त्यांचा आदर करायचा असेल, तर आपण प्रथम त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनात निर्माण केल्या पाहिजेत आणि त्या महान विचारांचे प्रचारक बनले पाहिजे.
६) जे त्यांचे शत्रू होते ते आज आपलेही शत्रू आहेत.
७) त्यांना जे दुःख दिले, तेच दुःख ते आज आपल्याला देत आहेत. बाबासाहेबांनी स्वतः लिहिले आहे की आपले पूर्वनिर्धारित शत्रू हे ब्राह्मणवादी लोक आहेत त्यांच्याशी कोणत्याही पातळीवर तडजोड होऊ शकत नाही कारण जे समस्या निर्माण करतात, ते कधीही त्या सोडवत नाहीत.
८) बाबासाहेबांचे जीवनकार्य आणि उद्देश इतका महान आहे की त्यांची जयंती फक्त एक दिवस साजरी करणे पुरेसे नाही. त्यांचे विचार समजून घेण्यासाठी ५ दिवस, १० दिवस, १५ दिवस किंवा एक महिन्याचे प्रशिक्षण कार्यक्रम असले पाहिजेत आणि या प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांचे विचार समजून घेतल्यानंतर लोकांना समाजाशी जोडले पाहिजे आणि त्यांना उद्देशासाठी तयार केले पाहिजे.
९) बाबासाहेबांची जयंती केवळ एकाच जातीने साजरी करू नये तर समाजातील विविध जाती गटांना आमंत्रित करून त्यांच्यामध्ये बाबासाहेबांच्या विचारांची पेरणी केली पाहिजे.
१०) बाबासाहेब आंबेडकरांचे समतावादी समाजाचे ध्येय भारतातील ६ लाख गावांपर्यंत कसे पोहोचवावे याचे नियोजन असले पाहिजे त्यासाठी सध्या कोणती संसाधने गोळा करावी लागतील याची तयारी करायला हवी. बाबासाहेबांच्या काळात त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या साधनसंपत्तीचा वापर अत्यंत कार्यक्षमतेने केला. आज आपल्याकडे सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान आहे या सर्वांचा वापर करून बाबासाहेबांचे ध्येय संपूर्ण भारतात कसे पार पाडायचे याचे सूक्ष्म नियोजन त्यांच्या जयंतीदिनी केले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सवाची नसावी, ती एका ध्येयाची असावी. वर्षाच्या बाराही महिन्यांचे दैनंदिन नियोजन त्यात असले पाहिजे. समाजात सतत प्रबोधनाचे काम चालू राहिले पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे एक कृती योजना असायला हवी.
११) शत्रूंशी लढून हजारो वर्षांची गुलामगिरी काही वर्षांतच तोडणाऱ्या महामानवाचे आपण प्रामाणिक लेकरे आणि ईमानदार अनुयायी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
१२) बाबासाहेबांनी जे काम एकट्याने केले ते आज आपण कोट्यवधी लोक असूनही आणि मोठ्या पदांवर असूनही करू शकत नाही. याचे कारण म्हणजे अहंकार का मीच करावे, मीच काय ठेका घेतलाय का मलाच काही गरज आहे का मीच का माघार घेऊ या वृत्तीमुळे महामानवाचे काम एका विशिष्ट चौकटीत अडकले आहे
१३) आज आपण या प्रकारच्या वर्तनाबद्दल गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि यात व्यापक बदल घडून आणण्यासाठी उपाय शोधले पाहिजेत आपले मतभेद परस्पर संघर्ष बाजूला ठेवून आपण एकतेने काम केले पाहिजे. आज समाजात लाखो नेते, संघटना आणि संस्था आहेत, परंतु परस्पर संघर्षांमुळे कोणीही एकटा समस्या सोडवू शकत नाही.
१४) या सर्वांपेक्षा वर उठून आपण भीमची लायक लेकर आहोत, आपण एकत्र येऊन शत्रूंशी शौर्याने लढू आणि जिंकू जर आपण एवढा बदल के़ला तर बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा उद्देश निश्चितच यशस्वी होईल सफल होईल..
१५) बाबासाहेबांच्या जयंतीच्या नावाखाली त्यांच्या विचाराची प्रतरणा होईल आशी कृती आपल्याकडून कदापी होऊ नये.ऐवढी खबरदारी मात्र सर्वानी घ्यावी व यापुढे महामानवाने सांगितलेला मार्ग समजून घेऊन त्यावर चालण्याचा प्रयत्न करावा🙏🏻
✍🏻🪷🪷प्रा.अमोल सोनवणे-9096995944
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत