मुंबईमध्ये गेल्या ७ महिन्यात तब्बल १४८ जणांना खड्यांमुळे गमवावा लागला जीव.

दिवसेंदिवस मुंबईमध्ये वाहनांची आणि नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र अरुंद आणि खराब रस्ते यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. २०२३ च्या पहिल्या सात महिन्यांत मुंबई जिल्ह्यात एकूण ५५१ अपघातांमध्ये १४८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांनी केली आहे.
तर दुसरीकडे ही अपघातांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये घटली असल्याचे महामार्ग पोलिस विभागातील नोंद केलेल्या आकडेवारीवरून दिसते. याचे कारण म्हणजे वर्ष २०१८ मध्ये अपघात सर्वाधिक होते. मात्र त्यानंतर आता पर्यंत हे अपघात कमी झाले आहेत.
तर दुसरीकडे गेल्या सात महिन्यांत एकूण ५५१ अपघात झाले आहेत. ज्यात १४८ जणांचा मृत्यू झाला. तर ३५७ गंभीर अपघातात ४४६ नागरिकांना गंभीर इजा झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत