महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

सत्ता संघर्षा मधील झाकलेली दुसरी बाजू….!!

भास्कर भोजने.

इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया सवर्णांच्या कब्जात आहे म्हणून इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया मध्ये फुले शाहू आंबेडकरी राजकारणाची कुठलीच बातमी येत नाही, दाखविली जातं नाही, लिहली जातं नाही…!!
सवर्णांच्या राजकारणासाठी पोषक आहे तेवढेच टी. वी. वृत्तपत्रात दाखवले आणि लिहले जाते….!!

                सवर्णांचे राजकारण यशस्वी व्हावे म्हणून फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या नेतृत्वाची बदनामी, कमजोरी, किंवा स्वभावदोष यावर भरभरून चर्चा घडवून आणली जाते, दाखविले जाते, लिहले जाते आणि फुले शाहू आंबेडकरी नेतृत्वाचा जनाधार तोडण्याची भुमिका मिडिया चांगल्या पद्धतीने वठवित असतो...!! 

            २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सवर्णांच्या मिडियाने प्रमुख भूमिका निभावतं प्रस्थापितांच्या,घरणेशाहीवाल्यांच्या राजकीय आघाड्या महायुती × मविआ असाच दोन धृवीय सामना झाला पाहिजे म्हणून बातम्या लावल्या, डिबेट घडवून आणली, प्रचार प्रसार केला आणि लोकसभा निवडणुकीतून ओबीसी, दलित, अल्पसंख्याक, शेतकरी, आंबेडकरी विचारांचे सर्वच छोटे राजकीय पक्ष संपवण्याचं षडयंत्र यशस्वी केले....!! 

                         २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील  ओबीसी,दलित,अल्पसंख्याक ,आंबेडकरी विचारांचे सर्वच राजकीय पक्ष संपवण्यात मुठभर सवर्ण यशस्वी झाले...!! 
                         शेतकरी वर्गासाठी आयुष्यभर लढणारे राजू शेट्टी,  (स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांनी आपला स्वहक्काचा मतदार तयार केला होता ते स्वबळावर खासदार निवडून येत होते.त्यांना यावेळी एकटे लढावे लागले कोणत्याही आघाडी ने त्यांना साधी एक जागा सुद्धा दिली नाही म्हणून ते  स्वतंत्र लढले आणि पराभूत झाले. एका अर्थाने शेतकरी वर्गाचा राजकीय पक्ष संपवण्याचं षडयंत्र यशस्वी झाले....!!
           महाराष्ट्रातील  शेतक-याचं प्रतिनिधित्व करणारा शेकाप पक्ष २०२४च्या लोकसभा निवडणुकीत दोन पैकी कुठल्या आघाडीत होता,? किती जागा लढविल्या ,?याचा कुणालाच थांगपत्ता लागला नाही, एका अर्थाने शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा राजकीय पक्ष संपवण्याचं षडयंत्र यशस्वी झाले....!! 
              महादेव जानकर धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारं नेतृत्व आणि रासप पक्षाचे नेते.महायुती सोबत युती करुन परभणीत लढले त्यांनाही  पराभवाला सामोरे जावं लागलं.खरं म्हणजे ओबीसी नेतृत्व आणि ओबीसी विचारधारेचा राजकीय पक्ष संपवण्याचं षडयंत्र यशस्वी झाले...!! 
                   मुस्लिम समुहाचं प्रतिनिधित्व करणा-या एआयएमआयएम पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष इम्तियाज जलील यांना दोन्ही आघाडीमध्ये कुठचं एक जागा सुद्धा मिळाली नाही. त्यांनी स्वतंत्र संभाजीनगरची(औरंगाबाद) जागा लढविली. ते विद्यमान खासदार होते तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्रातील ४८ पैकी एकही मुस्लीम खासदार निवडून आला नाही. मुस्लिम समुहाचा राजकीय पक्ष संपवण्याचं षडयंत्र यशस्वी झाले....!! 

                       समाजवादी पक्ष ज्याचं नेतृत्व अबू आझमी करतात ते आमदार आहेत त्या पक्षाची मविआ सोबतं युती होती त्यांना एकही जागा दिली नाही आणि राजकीय पटलावरुन तो छोटा पक्ष बेदखल करण्यात घराणेशाही वाले सवर्ण यशस्वी झाले...!! 

               प्रकाश शेंडगे यांनी स्थापन केलेला  ओबीसी ओळख सांगणारा बहुजनवादी राजकीय पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सपशेल गारद झाला. खरं म्हणजे ओबीसी राजकीय पक्ष संपवण्याचं षडयंत्र यशस्वी झाले...!! 

आमदार कपिल पाटील यांचा समाजवादी गणराज्य पक्ष पक्ष ही २०२४ च्या निवडणुकीत बेदखल करण्यात सवर्ण यशस्वी झाले…!!

                     आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचा प्रहार हा राजकीय पक्ष सुद्धा लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत बेदखल करण्यात घराणेशाही वाले आणि प्रस्थापित यशस्वी झाले...!! 

             आंबेडकरी  विचारधारेचे राजकीय पक्ष अशी ओळख सांगणारे रिपब्लिकन पक्ष ( आठवले गट.) जोगेंद्र कवाडे यांचा (पिरिपा.) डॉ सुरेश माने यांचा (बीआरएसपी) आणि बसपा या सर्वच राजकीय पक्षांना दोन्ही आघाडी पैकी एकाही आघाडीने सोबतं घेतले नाही परिणामी त्यांनी जागा लढविल्या नाही (बसपा वगळता) आणि त्यांना राजकीय सारिपाटावरुन बेदखल करण्यात सवर्ण यशस्वी झाले...!! 

                        राजकीय सारीपाटावर सवर्णांचेच  दोन राजकीय पक्ष कायम राहिले पाहिजे आणि इतर विचारधारेचे राजकारण संपले पाहिजे म्हणून सवर्णांनी ही थंड डोक्याने खेळलेली  राजकीय खेळी आहे...!! 

                   सवर्णांच्या या राजकीय षढयंत्राला समजून घेऊन वंचित बहुजन आघाडी ने आपलं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी संसाधनांची कमतरता असूनही ३९ उमेदवार उभे केले आणि आम्ही सवर्णांच्या राजकीय पक्षासोबत दोन हात करु शकतो हा  आशावाद कायम ठेवला आहे...!!
                            राजकीय पक्ष राजकीय सारीपाटावर कायम असणे आणि एक व्यक्ती खासदार किंवा मंत्री होणे ह्या अतिशय वेगवेगळ्या बाबी आहेत, रामदास आठवले भलेही मंत्री असतील परंतु त्यांचा राजकीय पक्ष संपवण्याचं षडयंत्र यशस्वी झाले आहे, समाजाने कुणाच्या तोंडाकडे पहावे.? पुढच्या निवडणुका कोणत्या आधारावर लढवाव्या.? वगैरे. 
                  महाराष्ट्रातील सुशिक्षित आंबेडकरी वर्ग  या निवडणुकीत  संविधान वाचविण्याच्या भुलथापेला बळी पडला आणि मविआ सोबतं गेला. त्यामुळे आंबेडकरी विचारधारेचं राजकारण संपविण्याच्या कृतीचे आपणं वाहक झालो हे तरी त्याने समजून घेतले पाहिजे...!! 

राजू शेट्टी, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, कपिल पाटील, बच्चू कडू, या सारख्या नेतृत्वाने अख्ख आयुष्य आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर घालविले आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही…!!
सवर्णांनी थंड डोक्याने फासे टाकले, मिडियाने साथ दिली आणि जनतेच्या डोक्यात दोन धृवीय निवडणुका फिट्ट बसविल्या. ज्यांना राजकीय षडयंत्र ओळखता येते ते सावरु शकतात ज्यांना सवर्णांचा फासा समजलाच नाही ते गारद झाले…!!

वंचित बहुजन आघाडी चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वपक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी निकराचा लढा दिला म्हणून भाडोत्री माणसं कामाला लावून त्यांना ट्रोल करण्याची भुमिका सुरू झाली आहे त्यांची बदनामी करण्यासाठी नवे नवे मुद्दे उपस्थित केल्या जातं आहेत…!!

टी. वी च्या बातम्या पाहून मत बनविणा-या आंबेडकरी माणसा टी. वी. आणि वृत्तपत्र तुझ्या विचारधारेचे नाही. त्यामधील बातमी ही सत्यावर आधारित नाही तर भुलथाप देणारी आहे हे ओळखण्याची सद्बुद्धी तुला येवो अशी मंगल कामना करतो….!! .

सवर्णांचा मिडिया, सवर्णांचे राजकीय पक्ष सवर्णांकडे असलेल्या गडगंज संपत्तीच्या जोरावर ऊभ्या केलेल्या दिखाव्यात सामान्य मतदार अलगद अडकला आणि घराणेशाही जिंकली, लोकशाही पराभूत झाली. संविधान कोप-यात बसुन टकमक पहातेय, वाचतो की, आणखी करकचून गळा दाबला जातोय….!!

जयभीम.
@.. भास्कर भोजने.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!