दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

सरन्यायाधीशांना भाड्याचीगाडी देण्यात आली!

भारताचे सरन्यायाधीश मा भूषण गवई यांचेसोबत महाराष्ट्रात जे घडले ते सर्व संतापजनक आहे. राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) तर पाळला नाहीच. शिवाय झालेली अनास्था सुध्दा उद्वेगजनक आहे.

तत्संबंधी संपूर्ण वृत्तांत मुंबईच्या दैनिक भास्कर ला दि १९ मे च्या अंकात छापून आलाय. (सोबत जोडले आहे). यात सरन्यायाधीशांचे प्रसृत न झालेले बरेचसे भाषणही आहे. मुद्दा शिष्टाचार तर आहेच. शिवाय भाड्याची गाडी देणे म्हणजे अनास्था व सुरक्षेकडेही दुर्लक्ष होणे आहे. यावर कळस म्हणजे, सरकारच्या सर्व मर्सिडीज कार नादुरुस्त असल्याने भाड्याने मर्सिडीज बेंज घ्यावी लागली असा खुलासा प्रोटोकॉल विभागाचे उपसचिव हेमंत डांगे यांनी केला आहे.

१७, १८ मे दोन दिवसांचा मुंबई दौरा होता. सदर वृत्तानुसार , चार्टर्ड विमानाने मुंबई विमानतळावर दि १७ च्या सायंकाळी सरन्यायाधीश पोहचले. तेव्हा विमानतळावर शिष्टाचार विभागाचे जुजबी अधिकारी व सत्कार कार्यक्रमाचे आयोजक तेव्हढे हजर होते. खरेतर प्रोटोकॉल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य प्रोटोकॉल अधिकारी मनीषा म्हैसकर यांची उपस्थिती अनिवार्य होती. पण त्या हजर नव्हत्या.

नंतर एकूणच खंत , सरन्यायाधीशांनी दि १८ मे च्या सत्कार कार्यक्रमात दिशादेशक वक्तव्यातून व्यक्त केली.

     लोकशाही भारतात राष्ट्रपती , प्रधानमंत्री , सरन्यायाधीश यांचे अतिविशेष स्थान असते. 

👤

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!