मुख्यपानमुंबई/कोंकण

पाणी काटकसरीने वापरा. पाणीपुरवठा राहणार बंद.

मुंबई महापालिकेच्या ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयाची तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. परिणामी २४ ऑगस्ट सकाळी १० ते २५ ऑगस्ट सकाळी १० पर्यंत चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर आदी भागातील पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार असल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली

ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक एक व दोनची दुरुस्ती कामे पूर्ण झाली आहेत. ती झाल्यानंतर कप्पा क्रमांक एकमध्ये इनलेटद्वारे (१८०० मिमी) पाणी भरण्याचे काम २४ ते २५ ऑगस्ट रोजी हाती घेण्यात येणार आहे. संबंधित तांत्रिक बाबींच्या गरजेनुसार ‘एम-पूर्व’ व ‘एम-पश्चिम’ वॉर्डातील चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर आदी भागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा २४ आण २५ ऑगस्ट रोजी २४ तासांसाठी बंद राहील, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याने दिली आहे. त्यामुळे पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी काटकसरीने वापरा, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!