आर्थिकउद्योगखान्देशमहाराष्ट्रमुख्यपान

काेट्यवधींची कांद्याची उलाढाल ठप्प.

नाशिक जिल्ह्यातील सुमारे १५ बाजार समित्यांमधील कांदा लिलाव गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. लिलाव बंद झाल्याने कोट्यवधींचे नुकसान होत असून शेतकरीही अडचणीत आला आहे. दरम्यान लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर आज लासलगाव बाजार समिती प्रशासन कारवाईचा बडगा उगारला आहे.
कांदा खरेदीदार व्यापा-यांनी बुधवापासून (ता. २० सप्टेंबर) कांदा लिलाव बेमुदत बंद ( nashik onion auction) ठेवला आहे. दोन दिवस उलटून गेले तरी बंदच्या भूमिकेवर कांदा व्यापारी असोसिएशन ठाम राहिले आहे. व्यापाऱ्यांच्या विरोधात आता लासलगाव बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित अथवा रद्द करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

काल लासलगाव बाजार समितीच्या ५४२ व्यापाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या, त्यानंतर आता लासलगाव पाठोपाठ नांदगाव बाजार समितीकडून कांदा व्यापाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
नांदगाव बाजार समितीतील६५ व्यापाऱ्यांना बाजार समिती प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आले आहेत. जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार कांदा लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांना या नोटीसा देण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित अथवा रद्द का करण्यात येऊ नयेत? अशा आशयाच्या कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!