देशाच्या उत्तर भागात थंडीची तीव्र लाट…

धुक्यामुळे दृष्यमानता कमी होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशाच्या उत्तर भागात थंडीची तीव्र लाट आली असून सर्वत्र दाट धुकं पसरलं आहे.रेल्वे,रस्ते आणि हवाई वाहतुकीत अडथळे येत आहेत.पुढचे पाच दिवस ही स्थिती कायम राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. येत्या २ ते ३ दिवसात अंदमान निकोबार द्वीपसमूहांमधे जोरदार पावसाची शक्यता आहे. राजस्थान,पंजाब,हरयाणा,दिल्ली,चंडीगढ,बिहार आणि उत्तरप्रदेशात बहुतेक ठिकाणी तर उत्तराखंड,हिमाचल प्रदेश,पश्चिम बंगाल,आसाम,मेघालय.मिझोरम,त्रिपुरा आणि मध्य प्रदेशात तुरळक ठिकाणी दाट धुकं राहील असा अंदाज आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत