
मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच आता भारताने हा मोठा निर्णय घेतला आहे.
भारताने गुरुवारी कॅनडीयन नागरिकांना व्हिसा देणं बंद केल्याची बातमी अचानक धडकली. ‘ऑप्रेशन्स रिजन्स’ म्हणजेच कामाकाजासंदर्भातील अडचणींचं कारण देत हा निर्णय घेण्यात आल्याचं नोटीफिकेशन व्हिजा अर्ज केल्या जाणाऱ्या वेबसाईटवर झळकत होतं. या निर्णयामुळे आता कोणत्याही कॅनडियन व्यक्तीला भारतात प्रवेश मिळणार नाही असं सांगितलं गेलं. मात्र या निर्णायसंदर्भातील कोणतीही अधिकृत घोषणा सरकारनवतीने करण्यात आलेली नव्हती. कॅनडामधील भारतीय दुतासावाच्या वेबसाईटवर व्हिसा सेवा बंद असल्याचं नमूद करण्यात आल्याने ही बातमी चर्चेत आली. मात्र ज्या नोटीफिकेशनमुळे हा गोंधळ उडाला ते नोटिफिकेशन अचानक गायब झालं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत