मुख्यपानविचारपीठसंपादकीय

अखंड, आजीवन विद्यार्थी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

आज ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशा प्रकारचा आदेश महाराष्ट्र शासनाने २७ ऑक्टोबर २०१७ परिपत्रक काढून सुरु केला. याचे कारण काय ? तर दिनांक ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश घेतला होता. या शाळेच्या रजिष्टरला १९१४ या क्रमांकासमोर भिवा म्हणजे बाबासाहेब यांची सही आपल्याला दिसते. बाबासाहेब शाळेत गेले.. हा त्यांचा शाळा प्रवेश ते पुढे जगातील एक थोर ज्ञानी व्यक्ती म्हणून झालेला हा प्रवास अचंबित करणारा असाच आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी स्वतःला अखंड विद्यार्थी म्हणून घेतले आहे. सामाजिक दुखणी दूर करायची असतील तर उच्च शिक्षण हेच यावर औषध असल्याचे त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची कोनशीला औरंगाबाद येथे बसवताना केलेला आहे. विद्यार्थ्यात विद्या विनय आणि शील बनविणे हे कॉलेजचे ध्येय त्यांनी सांगितले. शिक्षण घेतलेल्या केवळ नोकरी मिळाली की ते समाजाला विसरतात . कृतघ्न होतात हे त्यांना आवडत नव्हते.आपला अभ्यासक्रम आपल्या बौद्धिक विकासाला पोषक आहे का हे देखील विद्यार्थ्यांनी पहिले पाहिजे . कालमानाप्रमाणे नवी जीवनमूल्ये कोणती याचा विचार विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. फुटबॉल, क्रिकेट, ,आणि पोकळ राजकारणात विद्याथ्र्यांनी राहू नये.त्यांनी विद्याभ्यासाने नवी दृष्टी घेतली पाहिजे . ज्ञान ही महान शक्ती आहे. देशाचा विकास आणि उद्धार करून घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कारभारात देखील लक्ष घातले पाहिजे असे त्यांचे मत होते. | विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेपासून नीटनेटके रहावे, पोशाख चांगला घालावा ,प्रत्येकाने आपल्या घरात बुद्धांचा फोटो लावावा असेही त्यांनी सांगितले आहे. तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होई आरसा गया न्यायाने आपण आपल्यातला कमीपण घालविला पाहिजे .सदगुणाकडे ओढा पाहिजे, शिक्षणाबरोबर आपले शील चांगले ठेवले पाहिजे. शील | चांगले असल्याने ज्ञानी माणूस केवळ, उज्जयनी, अवंती या ठिकाणी जो स्वार्थ साधणार नाही तर स्वार्थ साधताना ज्ञानसंचय केला, तसे ज्ञान पुढच्या दुसरयाचे कल्याण करण्याची भावना काळात देखील संग्रहित करणे आवश्यक होते. शिष्याला ज्ञान देताना गुरूने हातचे सतत ठेवेल असे त्यांना वाटे. स्वतः बद्दल माहिती देताना ते लिहितात की राखून ठेवले त्यामुळे ज्ञानाचा -हास होत महू गावी रात्री बाराच्या ठोक्याला गेला. त्यांनीहोते. आपल्या शिक्षणाने | जन्मलो. बाळंतपणात आईला खूप त्रास अस्पृश्याच्या घरात ज्ञान गंगेचा प्रवाह झाला. साताऱ्यातल्या आठवणी नेला. खेड्यापाड्यातील अनेक दलितांना सांगताना ते लिहितात ङ्गमी बारा तेरा न्याय मिळवून देत शिक्षण वर्षांचा होईपर्यंत सर्व लोकांना खात्री, नोकरी, राजकीय क्षेत्रात त्यांना संधी वाटायची कि हे पोर घराण्याला काळीमा फासणार, कारण मी १२-१३ वर्षापर्यंत लंगोटी शिवाय काहीच नेसलो नाही. तुमची लाकडे फोडायची आहेत का ? असे म्हणून ते दारोदार फिरल्याचे सांगतात. माळ्याचा धंदा केला. वानर देखील झाडावर चढणार नाही एवढा मी वेगाने झाडावर चढे, साताऱ्यात प्लेग आल्यावर या पोराला प्लेग का होत नाही ? असेही काही त्यांना म्हणत सर्वाना वाटे या पोराच्या हातून काही होणार नाही. साताऱ्यात बकऱ्या देखील सांभाळल्या. आपल्या आयुष्याला तीन गुरुन्च्यामुळे वळण मिळाल्याचे ते सांगतात. कबीर पंथी घराणे असल्याने लहानपणी त्यांचे वडिलांनी रामायण महाभारत त्यांच्याकडून वाचून घेतले होते. संत कबीर यांचे विचार त्यांना मिळाले. माणूस होणे कठीण आहे तर साधू होणे खूपच कठीण, हे विचार त्यांनी घेतले. मुंबईत ते एक परीक्षा पास झाले तेंव्हा त्यांचा सत्कार करताना त्यांना केळुस्कर यांनी बुद्धाचे चरित्र भेट दिले होते . जगाचे कल्याण केवळ बुद्ध धर्माने होईल असे त्यांना विश्वास होता. जोतीराव फुले हे तिसरे गुरु ब्राह्मणेतर यांना शिक्षण माणुसकीचे धडे जोतीराव यांनीच दिले हे त्यांना जाणवत गेले. भेदभाव न करणारा, महासागर असलेला बुद्ध धम्म त्यांना योग्य वाटला. माणूस जगायचा असेल तर अन्नाची आवश्यकता असते. तशीच विद्येची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले. माझे विद्येचे वेड भयंकर असून ब्राह्मणाच्या घरी नाहीत इतकी ३० हजार पुस्तके माझी दिल्लीत असल्याचे सांगतात. एखाद्याची रांड दुसरया गावाला असते, त्याला आठवण झाल्यावर तो रात्रीचा कशाचाही विचार न करता तिच्या घरी जाईल एवढे प्रेम, पुस्तकावर जेव्हा असेल तेंव्हा तो विद्येचा पुजारी होईल. नुसते भाराभर ग्रंथ वाचणे नुसते उपयोगाचे नाही सत्यशोधन व सत्यग्रहण केले पाहिजे. रसग्रहण शक्ती पाहिजे. नवनवीन कल्पना सुचल्या पाहिजेत. बुद्धी प्रामाण्य हा त्यांच्या शिक्षणातून त्यांनी घेतलेला विचार आहे. आंधळ्या जनतेला प्रकाश देणारी काठी शिक्षण झाले पाहिजे ज्याने समाजाची प्रगती होईल. गुलामगिरी जात नाही तोवर सतत जागृतीचा विस्तव फुलवत ठेवला पाहिजे असे त्यांचे विचार होते. शिक्षण घेतल्यानंतर माणूस परावलंबी होता कामा नये, स्वतःचा उद्धार करण्याचे काम त्याने शिक्षण घेऊन केलेच पाहिजे. पुढच्या जन्मी आपले कल्याण होईल अशा पोकळ वर्तावर विश्वास न ठेवता विद्या अधिकार आणि संपती मिळवण्यासाठी सर्वांगीण उन्नती याच जन्मी करून घेतली पाहिजे हा आशावाद व आत्मविश्वास त्यांनी शिक्षणचिंतनातून मिळविलेला दिसतो. गुलामगिरी पद्धती सोडून दिल्या पाहिजेत. आपले हक्क आपण मिळविले पाहिजेत , स्वावलंबन आणि स्वाभिमान या शिवाय तरणोपाय नाही यासाठी शिक्षण खूप महत्वाचे असे त्यांना वाटत होते. जुलूम करणारयाच्या विरोधात संघर्ष करायला हवा. संघटीत होऊन सत्याग्रह करून न्याय मिळविणे हे त्याच्या जीवनाचे उद्दिष्ट राहिले . शिक्षण घेऊन मनुष्य लुच्चा, लबाड, उसन्या, लटपट्या होणे योग्य नाही. भारत एकसंध राहिला पाहिजे हा त्यांचा विवेकी विचार होता. तऱ्हेवाईक देशभक्त आपण नाही असे त्यांनी परखड मत व्यक्त केले आहे. माझ्या लोकांच्या हितसंबंधाचा प्रतिनिधी मीच आहे, असे म्हणून त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. अस्पृश्यत एकी व्हावी बेकी होऊ नये असे त्यांचे मत होते. पुणे कराराच्या वेळी माझ्या लोकांच्या न्याय हक्कासाठी मी कोणाची पर्वा करणार नाही असे त्यांनी निक्षून सांगितलेले दिसते. देवालयात गेल्याने माणसाचा उद्धार होत नसतो. स्वावलंबी होण्यानेच उद्धार होईल असे विचार त्यांनी सांगितले आहेत. दैवावर भरोसा ठेवणे त्यांना मान्य नाही. मनगट म्हणजे स्वट्च्या प्रयत्नाने उद्देश साध्य करावेत हा त्यांचा विचार होता. अंधश्रद्धा धुवून काढण्याचे आणि विवेकी वातावरण तयार करण्याचे काम त्यांच्या प्रज्ञेने केले आहे. जातीभेद नष्ट केल्याशिवाय कोणाची उन्नती होणार नाही हे त्यांनी सांगितले आहे. शिक्षण घेऊन सामाजिक सुधारणा करण्यासाठी त्यांनी सतत अहोरात्र परिश्रम घेतले. गुलामगिरीत खितपत पडू नका माणूस व्हा असे म्हणत सर्वांना त्यांनी जागे केले.

शिक्षण घेऊन समर्पित होऊन समाजाची आजन्म सेवा करणारे हे व्यक्तिमत्व जगात दुर्मिळ आहे. आपल्या विद्याथ्र्यांनी त्यांच्या साधनेची प्रेरणा स्वतःचे, देशाचे भ करावे हीच इच्छा सातान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय अभ्यासकेंद्र व्हावे हीच माझी विनम्र भावना आहे. विद्या, प्रज्ञा , करुणा, शील व मैत्री या पंच तत्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनवले. कोणताही मनुष्य सतत दिर्घोद्योगानेच पराक्रमी आणि बुद्धिमान होऊ शकतो . कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही मी इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास ८ वर्षे लागतात तो अभ्यास मी २ वर्षे ३ महिन्यात पुरा केला . हे करण्यासाठी २४ तासापैकी २१ तास अभ्यास करावा लागला. दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते. नुसत्या पदव्या मिळवण्याने काही होणार नाहीफ- हे त्यांचे विचार विद्यार्थी, प्राध्यापक , पालक सर्वांनी समजून घ्यावेत व आवश्यक कृती करावी तरच बाबासाहेब यांचेप्रति कृतज्ञता व्यक्त केली असे म्हणता येईल.

  • डॉ. सुभाष वाघमारे
    मराठी विभाग प्रमुख, छ. शिवाजी कॉलेज, सातारा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!