निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपान
सार्वत्रिक निवडणूक २०२४

अशोक सवाई.
दर पाच वर्षांनी येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उत्सवासाठी मतदारांमध्ये खास करून नव मतदारांमध्ये एक प्रकारचा उत्साह असतो तो या निवडणुकीत दिसून आला नाही. यावेळी ही निवडणुक उत्साहहिन वाटली. भाजपचा पारंपरिक मतदार उदासीन आहे त्यामुळे तो मताधिकाराचा हक्क बजावण्यासाठी घराच्या बाहेर पडलाच नाही. हे निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यातच दिसून आले. त्यामुळे मत देण्याची टक्केवारी घटली. ती चौथ्या फेरीपर्यंत टिकून होती. त्याला कारण हे की गेल्या दहा वर्षांपासून मोदी सरकारने जनतेच्या हिताचे काहीच काम केले नाही. उलट कलम ३७०, एनआरसी, सीएए, युसीसी असे बरेच व देशात फूट पाडणारे कायदे संसदेत चर्चा न करता किंवा अध्यादेश काढून बळजबरीने जनतेच्या मानगुटीवर बसविले.
कलम ३७० हे अदानीला काश्मीर मध्ये जमीन खरेदी करता यावी यासाठी हटवण्यात आले. असे ॲड. असीम सरोदे आपल्या भाषणातून सांगत आहेत. तिकडे मणिपूर जळते ठेवण्यात आले. तेथे भर दिवसा रस्त्यावर महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. असे खालच्या पातळीवरचे नीच उदाहरण जगात आजपर्यंत कुठेही सापडले नाही. मणिपूरला जळते का ठेवले? का की तेथील आदिवासी कुकी समाजाने मणिपूर सोडून जावे. का सोडून जावे? कारण तेथे संविधानातील ३७१ हे मुलभूत कलम लागू आहे. हे कलम जेथे जेथे आदिवासी भाग आहे तेथे तेथे ते लागू आहे. हे आदिवासींच्या जल,जंगल, जमीनची रक्षा करते. त्याचा उपभोग आदिवासी शिवाय भारतातील दुसरा कोणताही नागरिक घेवू शकत नाही असे हे कलम सांगते. देशाच्या नाॅर्थ इस्ट भागात व काश्मीर मध्ये खनिज संपत्तीचा भरपूर साठा आहे. असे भू वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. त्यावर अदानी अंबानी सारख्या धन्नाशेठांचा तिरका डोळा आहे. आणि ते त्यांना मिळावे यासाठी मोदी सरकार अवैध मार्गाने प्रयत्न करत आहे. म्हणून मणिपूरातील आदिवासी कुकी समाजाला पिटाळून लावण्यासाठी हे सारं करण्यात येत आहे. असे जाणकारांचे मत आहे व ते आता जनते पासून लपूनही राहिले नाही.
या सरकारने अग्नीवर सारख्या योजना व जीएसटी (गुड्स सर्विस टॅक्स) सारखे फडतूस व जाचक टॅक्स आपली तुंबडी भरण्यासाठी लागू केले. त्यामुळे गरीबांच्या कणीचे पीठ व मृतकाचे कापड ही महाग झाले. महागाई व बेरोजगारीचा निर्देशांक आकाशाला भिडत आहे तर आरोग्य सेवा व शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांचा निर्देशांक पार जमीनीत घुसला आहे. चोर कमळाबाईचा पट्टा गळ्यात टाकून उजळ माथ्याने खुलेआम घुमतो आहे आणि संन्यासी गजाआड सडत आहेत. असे आजचे भयावह चित्र आहे. मोदी सरकारने कायदा व सुव्यवस्थेची पार ऐसीतैसी करून टाकली. अशा सर्व भयावह प्रकाराने जनता त्राहीमाम त्राहीमाम झाली आहे. म्हणून जनता सत्ता बदलाची आतुरतेने वाट पाहत आहे.
सत्याला दाबून त्याच्या उरावर असत्याला बसवण्याचा प्रयत्न गेल्या दहा वर्षापासून झाला आहे/ होत आहे. सत्याला असत्य गिळंकृत करू पाहात आहे. पण सत्य ही अशी चीज आहे की ती असत्याच्या पोटाची चिरफाड करून बाहेर आल्याशिवाय राहात नाही. आजचा जमाना इंटरनेटचा आहे. जगात कुठेही वैध अवैध घटना घटली की क्षणात कळते. हे असत्याला कुरवाळत बसणाऱ्यानी लक्षात घेतले पाहिजे.
संसदेत सरकारी चुकीच्या धोरणावर विरोधी पक्षांचे सदस्य सडकून टिका करतात तेव्हा मोदी शहा सहीत सत्ता पक्षाचे सदस्य खाली माना घालताना दिसतात खरे. पण त्यानंतर आपल्या सरकारी धोरणात काही सुधारणा करावी असे ते बिलकुल मनावर घेत नाहीत. पुन्हा त्यांची मनमानी करणे सुरूच असते. तशी ती करण्यासाठी सरकारने आपली लाज शरम भर बाजारात लिलाव केलेली असते. असे नाइलाजाने म्हणावे लागते.
सन २००२ मध्ये गुजरात मधील दंगलीतील गोध्रा प्रकरणावर बीबीसीने डॉक्युमेंटरी फिल्म रिलीज केली होती त्यात मोदी दोषी असल्याने भारतात त्यावर मोदींनी बंदी घातली. ते दोषी नसते तर त्यावर बंदी घालण्याचे कारण नव्हते. पुलवामात देशाचे ४० जवान जाणून बुजून शहिद होवू दिले हे काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कितीतरी वेळा सांगितले आहे. मणिपूरमध्ये मोदींच्या नाकर्तेपणामुळे लोक मरण पावले. हे व तेथील महिलांची नग्न धिंड हे तेथून व्हायरल झालेल्या व्हिडिओ मुळे देशवासीयांना दिसले. मोदी सरकारच्या सत्ता काळात मानवी मुल्यांना अक्षरशः पायदळी तुडवण्यात आले. हे सर्व देशातील जनता उघड्या डोळ्यांनी बघत आली. अशातच निवडणूक लागली.
वरील सर्व मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित व्हावे किंवा भलतीकडे वळावे म्हणून निवडणूक प्रचारात मोदी सफसेल खोटेनाटे बोलत आहेत. कट्ट्यावर बसलेल्या संटे पोट्टेसोट्टे यांच्यासारखी भाषा ते निवडणूक प्रचारात वापरत आहेत. जी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या एका देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही. ज्यामुळे प्रधानमंत्री पदाची प्रतिष्ठा तर धुळीस मिळतेच मिळते शिवाय जगात देशाचीही मान खाली झुकते याची मोदींना बिलकुल फिकीर नाही. निवडणूकीच्या आधी २२ जानेवारीला अर्धवट राममंदिराचे उद्घाटन करून राममंदिराचा मुद्दा वापरण्यात आला तो फेल गेला. नंतर निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या झाल्या तेव्हा 'अब की बार चार सौ पार'चा नारा देण्यात आला पण दोन फेरीनंतर तो 'अब की बार फिर मोदी सरकार'चा क्षीण नारा लावण्यात आला तोही फेल गेला. नंतर मोदी मटण, मछली, मंगळसूत्र, संपत्ती करून हिंदू-मुसलमान वर आले. पण हेही चालले नाही. मग चौथ्या फेरीत बुथ कॅप्चर करून दादागिरी करणे, हस्तकां मार्फत सतत कमळाचे बटण दाबणे, पीठासीन अधिकाऱ्यां मार्फत मोदींना मत देण्यासाठी आव्हान करणे. मतदारांना उमेद्वारा मार्फत धमकावणे, सायकलचे बटण दाबल्यावर कमळाची चिठ्ठी बाहेर येणे, मुस्लिम मतदारांना धाकदपटशा करून मत देण्यापासून वंचित ठेवणे. लोकशाहीला काळीमा फासणारे असे अनेक प्रकार राजरोसपणे पोलिसांच्या हजेरीत चौथ्या फेरीपर्यंत घडले. यावर निर्वाचन आयोग झोपी गेला नाही तर तो मेला असच म्हणावं लागेल. पुढे २०,२५ व १ जून अशा तारखांच्या फेऱ्या बाकी आहेत. या फेऱ्यात अजून काय काय घडेल किंवा घडवण्यात येईल सांगता येत नाही.
दरम्यान सोशल मीडियावर मातब्बर राजकीय पत्रकार, निरिक्षक, विश्लेषक यांचे निवडणूकीचे अंदाज व विश्लेषण सुरू झाले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार काॅंग्रेसचा पारंपरिक असलेला मुस्लिम मतदार हा आधीपासूनच काॅंग्रेसकडे आहे. २०१४ व २०१९ ला भाजप कडे बहुतांश प्रमाणात वळलेला एससी, एसटी, ओबीसी मतदार संविधान बदलण्याच्या शंकेने व जातीनिहाय जनगणनेच्या आशेने पुन्हा इंडिया अलायन्स कडे वळला आहे. नेहमी भाजप सोबत असणारा क्षत्रिय किंवा राजपूत समाज हा एका गुजराती भाजप नेत्यांकडून अपमानित झाल्यामुळे या समाजाने तर भाजपला मत न देण्याची शपथच घेतली आहे. त्यामुळे हाही मतदार भाजपा पासून दुरावला आहे. यावर विश्लेषक निवडणूकीचे विश्लेषण करताना म्हणतात कि, भाजप १८० ते २१० पर्यंत आपले दुकान बंद करेल तर कुणी म्हणतात २२० ते २४० च्या आसपास भाजपचा आकडा स्थिर राहील. 'पन्नास खोके एकदम ओके' मुळे महाराष्ट्रातील यवतमाळचे जुनेजानते रोखठोक पत्रकार अशोक वानखेडे म्हणतात की महाराष्ट्रात भाजप सिंगल डिजिट वर येईल. त्यामुळे भाजपचे ४०० पार चे स्वप्न लुप्त झालेच शिवाय साधा बहुमताचा म्हणजे २७२ च्या आकड्याला स्पर्श करणेही भाजपला दुरापास्त झाले. परंतु विश्लेषक हे विसरतात की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगढ या राज्यात काॅंग्रेस इव्हीएम मुळेच जिंकता जिंकता हारली होती. इव्हीएम च्या मुद्द्यावर कुणीही विश्लेषक बोलायला तयार नाहीत. जशी काही निवडणूक मत पत्रिकेवर होत आहे.
हातची सत्ता जाणे म्हणजे जेलमध्ये हे पक्के समिकरण भाजपच्या पक्के लक्षात आहे. आर एस एस प्रणित भाजप षडयंत्री खेळ खेळण्यात माहिर आहे. त्यामुळे पुढील परिणामांची चिंता न करता भाजप इव्हीएम चा खेळ केल्याशिवाय राहणार नाही. हे विश्लेषकांनी लक्षात घेतलेले दिसत नाही. आर एस एस व भाजपचे अंधभक्त सोडले तर जमीनी स्तरावर भाजप विषयी जनतेच्या मनात भयंकर राग आहे, आक्रोश आहे. इव्हीएम चा खेळ खेळून भाजप सत्तेवर आला तर भयंकर हिंसा घडण्याचे इशारे किंवा संकेत देशातील विचारवंतांनी देवून ठेवले आहे. तसे जर झाले तर देशाला भयानक परिणामांचा सामना करावा लागणार आहे. तसे होवू नये व देश सुरक्षित हातात येवून तो सुरक्षित राहावा हिच शांती दूताजवळ विनंती आहेच शिवाय देशप्रेमी मूलनिवासी बहुजनांची ही जबरदस्त वील पाॅवर समजावी.
-अशोक सवाई.
किवळे, पुणे.
91 5617 0699
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत