
१) संंघोट्यांचा – मनुवाद्यांचा पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो.
बहुजन लोक शिकलेच नाहीत, खरी माहितीच जर त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही, बहुजनांना काही जाणंच आली नाही तर कशाला बहुजन जनता उठाव करतेय ?
म्हणून पहिला हल्ला हा बहुजनांच्या शिक्षणावर/ज्ञानावर असतो.
मग बहुजन जनतेला आपल्या इच्छेप्रमाणे वापरून घ्यायला मनुवाद्यांना सोपं जातं.
२) दुसरा हल्ला रोजगारावर असतो.
बहुजनांच्या कुटुंबाला खायलाच काही मिळाले नाही तर बहुजन माणूस जिथे पैसा मिळेल तिकडे धावतो. मग भले ते काम स्वतःच्या विचारांविरुद्ध असो कि अनैतिक असो.
३) तिसरा हल्ला हा इतिहासावर असतो.
इतिहासातील स्वतःला अनुरूप व सोयीचे असत्य असे बदल हे जनतेला खोट्या अभिमानाच्या गुंगीत ठेवण्यास उपयोगी पडतात.
४) चौथा हल्ला हा मानवी मेंदूवर असतो.
खोट्या कथा पेरणे, त्याचे स्तोम माजवणे, उदात्तीकरण करणे. खोट्या कथांना आधार म्हणून जनतेच्या मनातील प्रतीकांचा (उदा. जात, धर्म, राष्ट्र, सैनिक, दैवत, क्रांतिकारक इ.) वापर .
हे सर्व करत असताना ब्राम्हण्यवादी -मनुवादी – संघी आपली प्रतिमा डागाळू नये म्हणून वरून प्रामाणिक, भोळेपणा किंवा सात्त्विकतेचा आव आणतात.
५) पाचवा हल्ला हा विरोधकांवर असतो.
संघी लोकांमधे – ब्राम्हण्यवाद्यांमधे भविष्याचा वेध घेण्याची उपजत शक्ती असल्याने हे लोक काय करतात तर पुढे-भविष्यात त्रास होईल अशा व्यक्तींची बदनामी ते अगोदरपासूनच सुरु करतात. ज्या व्यक्तींची बदनामी करायची आहे त्याच्या बदनामीसाठी एखादा क्षुल्लक किंवा खोटा आरोप शोधून काढतात (तो प्रत्येकातच सापडतो) .त्या व्यक्तीच्या बाकी अनेक सकारात्मक कार्यां ,गुणांकडे दुर्लक्ष केले जाते, आरोपाला योग्य ठरतील असे आणखी दहा खोटे आरोप जोडले जातात आणि बदनामी सतत सुरुच राहते. आपापल्या कामात मग्न असलेली ,अज्ञानी, भोळी बहुजन जनता ते आरोप खरे मानून बसते. सत्य समजून घ्यायला त्यांना कुठे समज व वेळ आहे?
हे सगळे हल्ले अपयशी ठरले की मग शेवटचा हल्ला म्हणजे माघार घेऊन आम्ही तुमचेच.
नंतर आम्ही किती भोळे,सात्विक व धार्मिक हा जप ते सुरु ठेवतात व दबा धरुन राहातात तो पुन्हा योग्य वेळ येईपर्यंत.
तेव्हा मित्रांनो, मनुवाद्यांचे -संघोट्यांचे हे मेंदू नासवण्याचे कपट कारस्थान वेळीच ओळखा अन्यथा आपला देश पुन्हा एकदा मध्ययुगात लोटला जाईल.
शिक्षण घेऊन विचारी व्हा…
वैज्ञानिक व योग्य – तर्कशिल दृष्टिकोन स्वीकारा.
खोटा राष्ट्रवाद, देवाधर्माच्या नावाखाली, इतिहासाच्या नावाने खोटं बोलणाऱ्यांना थारा देऊ नका…
- डॉ. संग्राम पाटील
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत