महाराष्ट्रमुख्यपान

“पाच हजार पानांचा महत्त्वाचा आधार आपल्याला मिळाला त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र…”, मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य

महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, मग काहीही झालं तरीही हरकत नाही. आता माघार घेणार नाही असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी केलं आहे. छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. या सभेत बोलत असताना त्यांनी मराठा तरुणांनी आत्महत्या करु नये असं आवाहन करत आपल्याला न्याय मिळणारच असंही म्हटलं आहे.

“मायबाप मराठ्यांनो सरकारने आपला वेळ घेतला आहे, आपण सरकारला आपला वेळ दिला आहे. या संधीचं सोनं करा, अशी पुन्हा येणार नाही त्यामुळे एकजूट राहा. तुमच्यात जर काही मतभेद असतील तर ते बाजूला ठेवा. पण आजच्या घडीला मराठा म्हणून सगळे एकजूट व्हा, एकजूट राहा. तुमचे कुठलेही टोकाचे मतभेद असतील तरी ते बाजूला ठेवा, कारण मराठा आरक्षणाचा घास हातातोंडाशी आला आहे. १४ ऑक्टोबरला आपण सरकारला दिलेला ३० दिवसांचा वेळ संपतो आहे. त्यावर आपण त्यांना १० दिवस बोनस दिले आहेत. २४ ऑक्टोबरला ४० दिवस संपणार आहेत. आंतरवली सराटी या ठिकाणी १४ तारखेला मराठा समाजाचा कार्यक्रम ठेवला आहे. छत्रपती संभाजी नगरसह परिसरातले सगळे मराठे तिथे आले पाहिजेत. आपल्या एकीचं विराट रुप बघून सरकारला दिसलं पाहिजे.”

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!