बड्या कंपन्यांची दलाली करणारी भाजपा सरकार सर्वसामान्य नागरिकांना “अच्छे दिन” देणार कशी !

विजय अशोक बनसोडे
उद्योगपती-भांडवलदार भाजपा तुपाशी आनं भारतीय जनता उपाशी !
उद्योगपती-भांडवलदारांचे तळवे चाटणाऱ्या भाजपवाल्यानों,भारतीय नागरिकांवर “जझिया” कर लावा !
बहुसंख्य हिंदू मतदार असलेल्या बहुजन समाजातील विद्यार्थी, बेरोजगार,सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी,शेतमजूर,मजूर,कामगार फाशी घेऊन मेला तरी चालेल.असेच भारतीय जनता पार्टीच्या राजकारभारा वरून वाटत आहे.युवा उद्योजकांना प्रधानमंत्री कर्ज योजना,मुद्रा योजनेसारख्या योजनातून तुटपुंजी कर्जे द्यावायची ती ही अनेक जाचक अटी पूर्ण करून,वास्तविक पाहता भाजपच्या या योजनांचा लाभ किती गरजुनां मिळतो,हा खरंच संशोधनाचा विषय आहे.बरं बँक आणि सरकारच्या अनेक जाचक अटी पूर्ण करून कोणाला भाजपच्या कर्ज योजनेचा लाभ मिळालाच तर परतफेडीचा तगादा असा असतो की,छोटया मोठया कर्जधारकांना त्यासाठी आत्महत्या करण्याची,घरादरावर आणि जमिनीवर जप्ती येण्याची,तर जमीनदारांना वेठीस धरून कर्ज वसुली करण्यात येते.ही भयाण वास्तविकता कोणीही नाकारू शकत नाही.तर याच भाजपा सरकारने आपल्या देश्यात जीवघेणी GST आणि महागाई वाढवून ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूला “विश्वकर्मा” सारख्या फसव्या योजना राबवून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम करत आहे.खरंतर भाजपा सरकारच्या जीवघेण्या महागाई मध्ये लाखभर रुपये कर्जा मध्ये कोणता लाभार्थी कोणता चांगला व्यवसाय करु शकतो ?
परंतु भारताच्या केंद्र सत्तेत बसलेल्या याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय जनता पार्टी सरकारने रिलायन्स कंपनीला 01 लाख 25 हजार करोड,वेदांता कंपनीस 01 लाख 3 हजार करोड,एस.आर (SR) कंपनीला 01 लाख 01 हजार करोड,अदानी कंपनीस 96 हजार करोड,जे.पी (JP) कंपनीला 75 हजार करोड,जेएसडब्ल्यू (JSW) कंपनीस 58 हजार करोड,जी.एम.आर (GMR) कंपनीला 47 हजार करोड,लॅको कंपनीस 47 हजार करोड,व्हिडिओकॉन कंपनीस 35 हजार करोड,बीव्हीजी (BVG) कंपनीला 33 हजार करोड रुपये म्हणजे भारतातील या टॉपच्या दहा बड्या कंपन्यांना आर.एस..एस प्रणित भारतीय जनता पार्टी सरकारने एकूण 08 लाख 55 हजार करोड रुपये इतकी प्रचंड मोठी कर्जे भारतीय जनता पार्टीने भारतातील गोरगरिबांच्या घामातून कामविलेल्या पैश्यावर लावलेल्या GST नावाच्या करातून गोळा केलेल्या पैशातून दिलेली आहेत.भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून भारतातील उच्च वर्णीयांच्या या नामवंत कंपन्यांना खिरापत म्हणून वाटण्यात आलेल्या कर्जाची आकडेवारी भारतीय संसदेच्या राज्यसभा सभागृहामध्ये संजय सिंग नावाच्या संसद सदस्याने मांडलेली आहे.ही आकडेवारी केवळ भारतीय जनता पार्टी सरकारने या बड्या कंपन्यांना खिरापत म्हणून वाटलेल्या कर्जाची असून मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी सरकारने याच बड्या उद्योगपतींची कित्येक हजार कोटीची कर्ज सुद्धा माफ केलेली आहेत.याची आकडेवारी वेगळीच असून,ती जर आपण पाहिली असता,जर आपला मेंदू कार्यरत असेल तर निश्चितपणे चक्रवल्याशिवाय राहणार नाही. खरंतर भारतीय जनता पार्टी सरकारने जीएसटी (GST) लावण्या पेक्षा भारतीय नागरिकांवर “जझिया” करत लादला पाहिजे.त्याच बरोबर औरंगजेबाचा दाखला देऊन मुस्लिमांना वेठीस धरण्यापेक्षा,स्वतःच औरंगजेबापेक्षाही क्रूर असल्याचं कबूल ही करावं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित भारतीय जनता पार्टीने भारतातील हिंदू नागरिकांना,भारत देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी,
हिंदुत्ववादी सरकार स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत “अच्छे दिन लायेंगे” चे गाजर दाखवत मागच्या दहा वर्षांमध्ये केंद्रीय सत्ता आपल्या कब्जात ठेवण्यात यश मिळविले.परंतु मागच्या या दहा वर्षाच्या सत्ता काळामध्ये भारतीय जनता पार्टीने दरवर्षीच्या आर्थिक बजेट मध्ये देशातील एस.सी/एस.टी/ओ.बी.सी/अल्पसंख्यांक प्रवर्गासाठी ज्या प्रमाणात विकास निधीची तरतूद केली,याची आकडेवारी जर आपण तपासली आणि इथल्या केवळ दहा उद्योगपतींना किती कोटीची कर्ज दिली व किती कोटीची कर्ज माफ केली.याचा ताळमेळ जर घातला,तर असे दिसून येईल की,भारतीय जनता पार्टी सरकारने भारतातल्या गोर-गरिब हजारो जातीत विखुरलेल्या विविध जाती धर्माच्या नागरिकांना देशोधडीला लावण्याचेच काम केलेले आहे.बरं भारतीय जनता पार्टी सरकारकडून वाटण्यात आलेल्या या खिरापतीमध्ये छोट्या-मोठ्या उद्योगपतींची कर्ज आकडेवारी आणि सत्तेत आल्यापासून देश्यातील पशुपतीनाथाच्या मंदिरापासून ते विविध मंदिरे आणि धार्मिक कार्यावर केलेल्या अब्जावधी रुपयांची आकडेवारी यात समाविष्ट नाही.हे ही आपण या ठिकाणी विचारात घेतले पाहिजे.
भारतीय जनता पार्टीच्या शासन काळाचा मुख्य उद्देश असा दिसून येतो की,भारतातील काही बड्या उद्योगपती भांडवलदारांना हाताशी धरून या देशांमध्ये हुकूमशाही निर्माण करणे,हजारो वर्षापासून ज्या हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवलेल्या चातुवर्ण्या व्यवस्थेतील शूद्र आणि अतिशूद्र,बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदारांना पुन्हा एकदा शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या गुलाम बनविणे हा एकमेव अजेंडा राबविण्यात आलेला आहे,असेच चित्र आपल्या सर्वांच्या समोर दिसेल.कारण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सुमती भार्गवाच्या “मनुस्मृतीला” आदर्श मानणारी माणसे असून त्यांना या देशांमध्ये संसदीय लोकशाही आणि संविधान मोडीत काढून पुन्हा एकदा मनुस्मृतीचा अंमल निर्माण करत बहुजन समाजातील नागरिकांना गुलामच बनवायचे आहे.हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
भारतातील सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी,शेतमजूर,मजूर,
कामगारांना विविध योजना आणि पीकविमा मिळवण्यासाठी जीवाचे रान करावे लागते.देश्यातील शिक्षित तरुण उद्योग आणि नोकरीसाठी भटकंती करत आहे.परंतु RSS प्रणित सरकार मात्र खाजगी संस्थांना कंत्राटी नोकरभारती करण्यासाठी परवाने देत आहे.तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागतात.यापेक्षा दुसरी कोणती शोकांतिका असू शकते.त्याच बरोबर प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती भाजपा सरकारने केंव्हाचं बंद केल्या आहेत.तर भाजपच्या “बेटी पढाव,बेटी बचाव” घोषणेला थोडा तरी अर्थ उरतो का ?
वास्तविक पाहता RSS प्रणित भाजपा सरकार ही देश्यातील काही मोजक्या बड्या उद्योगपती भांडवलदारांना कर्जे देवून मोठे करण्यात व्यस्त आहे.वास्तविक पाहता भाजपा सरकारचे जी.एस.टी कमी करणे,पेट्रोल डिझेल स्वस्त कसे होईल,उच्च शिक्षण कसे स्वस्त होईल,जीवनावश्यक वस्तूंचे भाव कसे कमी होतील,आपल्याच मंत्रिमंडळात आणि प्रशासनात वाढलेला भ्रष्टाचार कसा कमी होईल याकडे अजिबात लक्ष नाही.तर तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय जनता पार्टीची खास वैशिष्ट्य म्हणजे मॉब लिंचींग, भ्रष्टाचार,जातीय दंगली आणि विविध मंदिरांना करोडो रुपयाचा निधी देण्यातच जास्त रस आहे.त्यामुळे बहुजन समाजातील सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी,शेतमजूर,मजूर,कामगार फाशी घेऊन मेला तरी चालेल.अशीच भाजपा सरकारची सध्याची भूमिका दिसून येत आहे.खरंतर भाजपच्या या बहुजन समाज विरोधी राजकीय भूमिकेचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
लेखक,विजय अशोक बनसोडे
भारतीय बौद्ध महासभा,8600210090
जिल्हा संस्कार उपाध्यक्ष धाराशिव (द)
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत