वर्तमानकाळ आघाडी अन् युतीचा


दत्ता तुम वाड.
वर्तमानकाळ आघाडी अन् युतीचा. &&&_ सामाजिक राजकीय सांघटना असो की पक्ष सर्वांना एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे, अर्थात एका विचाराची ,एका धेय्याची,,सर्व पक्ष आणि संघटना एकत्र यायला काहीच अडचण येत नाही,परंतु विचार एक असले तरी तरी दिशा धोरण अलग असू शकतात,तरी पण काही किमान समान विषय ,कार्यक्रम घेऊन एकत्र येऊ शकतात,आणि अशी प्रक्रिया राज्य व देश पातळीवर सुरू झालीच आहे,आणि एकत्र येण्याचे येण्याचे परिणाम पण आपण या सार्वत्रिक निवडणुकीत पहिलेच आहेत.एकी केल्याने निश्चितच परिणाम होतो,कारण एकित ताकद बल शक्ती असते.एकीचे बळ,तुकाम्हणे तेची फळ,एकी करा,सुखाचा मार्ग धरा. एका ध्येयाची आणि एका सवयीची माणसे लवकर एकत्र येतात,असे साने गुरुजी म्हणत,हे खरे आहे,परंतु एकी कुणालाही करता येते,मग ते सज्जन असतील की दुर्जन दुष्ट,ते संकुचित विचाराचे असोत की विशाल विचाराचे,एकी मूल्य हिन असो की मूल्य आधारित असो,एकी कुणीही व्यक्ती,कसलेही व्यक्ती,संस्था,संघटना,पक्ष करू शकतात,,लोकशाहीत कुणीच कुणाला अडाऊ शकत नाही.असे असले तरी सज्जन व्यक्ती आणि त्यांच्या संघटना आणि पक्ष एकत्र येऊन आघाडी किंवा युती करून दुर्जनांचा पाडाव करण्याची ही वर्तमानाची गरज आहे,जी ताकद सज्जनात असते ,ती दुर्जनात नसते,कारण दुर्जन दुष्ट व्यक्ती,संघटन,पक्ष हे मुल्याहिन असतात.,त्यांची दुष्ट निती ,दुष्ट विचार,जाणते समोर उघडे केले तर निश्चितच जनता त्यांचा पराभव करते,थोडा वेळ लागेल,पण विजय हा सज्जनांचाच होत असतो,म्हणतात ना ” देर है लेकीन अंधेर नहीं.” दुर्जन लोकांचे विचार अलग अलग असले तरी ते ते लवकर एकत्र येतात,संघटित होतात आणि राज्य देश काबीज करतात,तसेच सज्जनही करू शकतात,पण दुर्जन जेव्हढे लवकर एकत्र येतात,तेव्हढे सज्जन लवकर एकत्र येत नाहीत,कारण ते स्वतःला फार विद्वान समजतात,हाच यांचेतील दोष आहे,म्हणूनच दुष्ट दुर्जन सज्जनावर अधिराज्य गाजवितात,आणि सज्जन त्यांचे नोकर बनून त्यांचेच संकुचित दुष्ट विचार अमलात आणण्यास मदत करतात,ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अर्थात सज्जन कुणास म्हणावे,आणि दुर्जन कुणास म्हणावे? याची पारख नसते,म्हणूनच जग फसते.सज्जन आणि दूर्जनात फरक करण्याचे साधे विचार आहेत,ते पुढील प्रमाणे _ 1 ज्यांचे व्यापक विचार ते सज्जन आणि ज्यांचे संकुचित विचार ते दुर्जन.2 जे विस्वापेक्षा आपला देश,देशापेक्षा आपला प्रांत जिल्हा तालुका गाव कुटुंब आणि कुटुंबा पेक्षा स्वतःस मोठा समजतो ती संकुचित विचाराचा समजावा. 3 गाव प्रांत देश यांचे बद्दल जरूर निष्ठा असावी,पण ” विस्वची हे माझे घर ” या ज्ञानेश्वरांचे विचार या पेक्षा कधीही श्रेष्ठच म्हणावे लागेल.4 आपल्या देशातीलच नव्हे तर अखिल विश्वातील माणूस एकच आहे,प्रांत देश यावरून,किंवा जात धर्म या वरून माणसाची किंमत करणे हा संकुचित विचार होय,तर माणूस आणि माणुसकी हे श्रेष्ठ होत,माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म असे मानाने म्हणजे व्यापक विचार होत,जे सज्जन च करू शकतात.5 सर्व धर्मापेक्षा मानवधर्म श्रेष्ठ मानणे,म्हणजेच व्यापक विचार,आणि माझाच धर्म श्रेष्ठ आणि इतरांचा धर्म कनिष्ठ,माझीच जात श्रेष्ठ ,इतर जाती कनिष्ठ ,असा विचार करणे हे संकुचित विचारसरणी चे लक्षण समजावे,संकुचित विचार हे केवळ दुस्थ आणि दुर्जनांचेच असतात,सज्जनांचे नव्हे.6 स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय समानता,समान संधी,समान प्रतिष्ठा,समाजवाद धर्म निरपेक्षता लोकशाही ,सत्य न्याय निती,दया क्षमा शांती ही मूल्य होत.ही मूल्य ज्यांना मान्य आहेत,असे व्यक्ती,समाज,संघटना,पक्ष म्हणजेच व्यापक विचाराचे ,माणुसकीचे समजावे,आणि अशाच संस्था संघटना पक्ष व्यक्ती च्ये सोबत राऊन त्यांना बल दिले पाहिजे, वर्तमान काळात ज्या व्यक्ती स्वार्थी,शोषक,अन्याय अत्याचारी ,हिंसक आहेत अष्याना नेतृत्व देता कमा नये,ज्या संघटना पक्ष जाती धर्म देश देव यांचा वापर करून सत्ता काबीज करतात ते डस्थ दुर्जन होत,यांचे पासून सावध आणि कोसो दूर राहिले पाहिजे.तरच सामान्य बहुजनांना आच्छे दीन येतील.केवळ अक्छे दिन आणत्तो म्हणून बुरे दीन आणानाऱ्यास आता सत्ते पासून दूर ठेवले पाहिजे.सज्जन लोकांनी ” राजकारण आमचा विषय नाही म्हणत दुर्जनांची चाकरी करीत बसू नये.केवळ मी माझी बायको पोरं गाडी बंगला हेच आपले विश्व असे मंडुक वृत्ति न ठेवता दुर्जनची सेवा करीत बसण्या पेक्षा सज्जनांना सत्तेत बस उन त्यांची चाकरी केलेली बरी.म्हणतात ना,” सज्जनांच्या पायथ्याला बसावे,पण दुर्जनांच्या उशाला पण बसू नये.सज्जनांची सांगत दुर्जनापेक्षा कधीही चांगलीच असते.हे प्रत्येकाचे आईवडील व गुरुजन सांगतात,ते आपण विसरतो. निश्चितच वर्तमान काळ हा पक्ष संघटनांच्या एकिकरणाचा आहे,दुष्ट दुर्जन व्यक्ती पक्ष संस्था संघटना एकत्र येऊन मजबूत बनताहेत, ही दुःखाची गोष्ट आहे,पण आनंदाची गोष्ट ही पण आहे की,सज्जन व्यक्ती संस्था संघटना पक्ष पण एकत्र येत आहेत,याचा अर्थ सज्जन व्यक्ती,जनता मतदार यांचेसाठी पर्याय निर्माण झाला आहे,ही एक जमेची बाजू आहे,कारण चांगल्या व्यक्ती मतदार यासाठी एक मजबूत शांती,जी सत्ता काबीज करू शकेल,अशी नव्हती, ती आता आहे, ही संधी. आहे,संधीचे सोने केले पाहिजे.तरच बहुजनांना चांगले दिवस येतील असा वर्तमानकाळ आहे,असेच म्हणावे लागेल. राजकारण ,सत्ता आणि आपले जगणे याचा फारच जवळचा संबंध आहे,,कारण सरकार जे नेहमी जी.आर.काढत असते,कायदे बनवत असते त्यानुसार महागाई,बेकारी,शिक्षण,आरोग्य ,पर्यावरण , अन्न सुरक्षा,स्थलांतर,स्त्रियांचे प्रस्न,शेतकरी कमकर्यांचे प्रस्न निर्माण होतात किंवा संपतात.म्हणूनच राजकारण माझा विषय नाही,ते गलिच्छ असते असे म्हणण्याची चूक करू नये,100 टक्के मतदान झाले पाहिजे,राजकीय जागृती होणे काळाची गरज आहे,नव्हे प्रत्येक नागरिकांची गरज आहे,राजकारणाविषयी अज्ञान आहे,म्हणूनच पाणी वीज रस्ते शिक्षण आरोग्य असे प्राथमिक गरजा सुध्दा स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी मिटलेल्या नाहीत.याकरिता वर्तमानकाळ हा संघटित होण्याचा काळ आहे,आपण अलग न राहता एखाद्या सज्जन ,व्यापक विचाराच्या पक्षमागे उभे राहून त्यांना बल द्यावे.यातच आपले हित आहे. _. लेखक : दत्ता तुम वाड.सत्यशोधक समाज नांदेड.दिनांक: 12 जुलै 2024.फोन: 9420912209.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत