आर्थिकउद्योगमहाराष्ट्रमुख्यपान

राज्याला कडक उन्हा सोबत वीज बिलाचेही चटके..

राज्यात सध्या उन्हाळा नवनवे उच्चांक गाठत आहे, त्यात गारपीठ अवकाळी पाऊस याने नागरिक शेतकरी अस्वस्थ आहे, आणि त्यातच भर म्हणून अदानी वीज कंपनीने आपल्या वीजदरात वाढ केली आहे. त्यामुळे उन्हापासून सुटका मिळण्यासाठी घरातील एसी, पंखा, फ्रीज यांसारख्या वस्तूंचा वापर वाढवावा म्हटला तर वीज महागली असल्याने त्याचा फटका सुमारे 30 लाख वीज ग्राहकांना बसणार आहे.  

गेल्या महिनाभरापासून मुंबईकरांना उन्हाचा झळा सोसावे लागत आहेत. अशातच आता मे महिन्यापासून सर्वसामान्यांना वीज दरवाढीच्या झळाही सहन कराव्या लागणार आहेत. अदानी कंपनीने गतवर्षी झालेल्या इंधन खर्चातील 318 कोटी 38 लाख रुपयांची वाढ वसूल करण्यासाठी राज्य ऊर्जा नियामक आयोगाकडे आदरपूर्वक प्रस्ताव सादर केला असता. याबाबत आयोगाने सोमवारी मान्यता दिली.  ही रक्कम इंधन अधिभारातून मे ते 24 या काळात ग्राहकांकडून वसूल केली जाईल.  वाणिज्य, औद्योगिक आणि इतर ग्राहकांसाठी, इंधन अधिभार वापरानुसार निर्धारित केला जाईल.

मे महिन्याच्या बिलापासून निवासी ग्राहकांच्या इंधन अधिभारात प्रति युनिट 70 पैसे ते 1.70 रुपये इतकी मोठी वाढ होणार आहे. मे महिन्यापासून दरमहा 0-100 युनिट वीज वापर असणाऱ्या निवासी ग्राहकांकडून प्रति युनिट 70 पैसे, 101-300 युनिटसाठी 1.10 रुपये , 301-500 युनिटसाठी 1.5 रुपये आणि 500  हून अधिक वीजवापरासाठी 1.70 रुपये इंधन अधिभार आकारण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रात सर्वात महागडी वीज

दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही महिन्यांपूर्वीच वीजदरवाढ करण्यात आली. त्यानंतर उत्तरेकडील राज्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आला होता.  पण महाराष्ट्राचा विचार केला तर वीजदरवाढ करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र हे सर्वात महागडी वीज मिळणारं राज्य ठरलं आहे. आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजेचा दर जास्त असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!