७ नोव्हेबर नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस !

अरुण विश्वंभर जावळे
सातारची माती ही कसदार आहे. या मातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इवल्या इवल्या पावलांचे ठसे उमटले आणि याच मातीतून त्यांनी प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या वैश्विक नभांगणात उंच भरारी घेतली. ते इतके उंच गेले की त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अवघ्या जगाचे डोळे दीपले. सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून त्यांची ख्याती झाली. आज याच महामानबाच्या प्रेरणेतून नचऊर्जा घेऊन संबध देशभरातील युवा विद्यार्थी पिढी घडतेय, चाढतेय हे एका अर्थाने सातारच्या मातीचाच विजय होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा साताऱ्यात झाला नसला तरी त्यांचे बालपण मात्र सातारच्या मातीला पहावयास व अनुभवयास मिळाले. खेळण्या बाघडण्याची साधारपणे ८ ते ९ वर्षे लहानग्या बाबासाहेबांची साताऱ्यात गेली. लहानपणी त्यांना भिवा असे म्हणत. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ खऱ्या अधनि साताऱ्यातून झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे इयत्ता पहिलीमध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. हा त्यांचा शाळा प्रवेश दिन मविद्यार्थी दिवसफ
म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळा,
महाविद्यालयांतून दरवर्षी ७ नोव्हेंबर
साजरा होत असतो. छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये व्यक्तिशः मी हा दिवस २००१ सालापासून आंबेडकर अनुयांबाच्या सहकार्याने साजरा करत आलो. हा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस व्हावा यासाठी मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र सरकारकडे आग्रही धरत आलो. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सातत्याने पत्रव्यवहार सुरू ठेवला होता. मात्र शासन त्याबाबत फारसे
गंभीर दिसत नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त (१२५ व्या जयंतीनिमित्त) तरी या आग्रहाला दाद द्यावी आणि विद्यार्थी दिबस घोषित करावा यासंबंधाने मंत्रालस्तरावर बैठका चर्चा सुरू होत्या. परंतु यश काही येत नव्हते. त्यामुळे मुंबईच्या चैत्यभूमी येथील समुद्रात १२५ विद्यार्थी घेऊन जलसमर्पण करण्याची भूमिका मला घ्यावी लागली आणि अखेर शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने २७ ऑक्टोंबर २०१७ रोजी विद्यार्थी दिवस घोषित केला.
आता हा विद्यार्थी दिवस भारतभरातील सर्व शाळा महाविद्यालयातून साजरा होणं महत्वाचे असल्याने दिल्ली दरबारी शर्थीचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मूर्म आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासंबधी अधिकृत घोषणा करणं गरजेचं आहे. डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या
नावाने शिक्षक दिन व डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने बाचक दिन देशभर साजरा केला जातो, तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संपूर्ण भारतात विद्यार्थी दिवस साजरा व्हायला हवा, यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून १ लाख २५ हजार पत्रे दिल्लीला पाठविण्याची मोहिम मागील तीन वर्षापूर्वी मी सुरू केली. या मोहिमेची सुरूवात जागतिक कीर्तीचे ख्यातनाम साहित्यिक प्राच्यविद्यापंडित डॉ. आ.ह. साळुंखे, पार्थ पोळके, इ. झेड. खोब्रागडे, डॉ. अलोक जत्राटकर यांच्या पत्रांनी केली. आतापर्यंत पन्नास हजारापेक्षा अधिक पत्रे दिल्लीला धडकली आहेत. या मोहिमेची दखल घेत दीडवर्षापूर्वी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ७ नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन देशभर साजरा करण्याचे सुतोवाच केले. तथापी त्यासंबंधी केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना निघण्यापूर्वीच रामनाथ कोविंद त्यांचा कार्यकाल संपला. या पार्श्वभूमीवर हा विषय आता द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी नव्याने ७५ लाख पत्रे पाठविण्याची मी भूमिका घेतली असून त्यास घराघरातून • शाळा महाविद्यालयातून जोरदार प्रतिसाद मिळतो आहे..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद (संभाजीनगर) येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करताना मशिक्षण हे वाघीनेचे दूध आहे, जो कोणी प्राशस करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीफ हे विधान केले होते. या विधानाला ७५ वर्षे होत आहेत. याचे औचित्य साधून ७५ लाख पत्रे पाठविण्याची ही मोहीम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राबवत आहे.
खरंतर, सातारचे हे छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाने कमालीचे चर्चेत आले आहे. या हायस्कूलमध्ये भव्यदिव्य स्वरुपातील ग्रंथदालन निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने ५० लाख रुपयेसुध्दा देण्यात आले. अलिकडेच पुन्हा नव्याने एक कोटी रुपये
शासनाकडून उपलब्ध झाले. एका
बाजूला शासनस्तरावर भरीव मदत होत असताना व्यवस्थापन प्रशासन स्तरावर हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांनी या हायस्कूलचे ऐतिहासिक महत्व आणि गांभीर्य ओळखून हायस्कूलला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. दोन अंकी पटसंख्या असणाऱ्या या हायस्कूलची पटसंख्या दीडाशेच्या पुढे नेली. गुणवत्ता विकासाबरोबरच शिक्षकांची कार्यक्षमता बाढवली. लेखन वाचन प्रकल्प, अध्ययन समृद्धी असे अनेकविध कल्पक उपक्रम राबवून हायस्कूलचा चेहरा बदलबला. नवीन बिल्डींग, विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र शौचालय, जुने व जीर्ण साहित्य निर्लेखन, शाळेच्या शेती फार्मची जागा नावावर करून घेणे अशा कार्यात या ऐतिहासिक शाळेचा मुख्याध्यापक
म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले. आज देशाविदेशाच्या कानाकोपऱ्यातून लोक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही शाळा पहायला येत आहेत. या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात यावा यासाठीचा आग्रही सर्वस्तरातून होतोय. जुलै २०१८ मध्ये मुंबई आणि नागपूरमध्ये काही मंत्र्याशी यासंबधाने महत्वपूर्ण चर्चाही झाली. त्याअनुषंगाने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समिती गठित केली गेली, मात्र या समितीला काही मर्यादा आल्याने समिती ठप्प झाली. असे असले तरी हायस्कूलस्तरावर कोरोनाला न जुमानता होत असलेली प्रगती आणि विकास हा निश्चितच कौतुकास्पद आहे. कारण या हायस्कूलच्या प्रशासनाला आणि
एकूणच साताऱ्याला ठाऊक आहे
कि येथे असा विध्यार्थी शिकून
गेलाय की ज्याने अखंड देशाचं
संविधान निर्माण करून या भारताला
सर्वात प्रगल्भ अशी लोकशाही
बहाल केलीय.
काही वर्षापूर्वी मजगात आजपर्यंत सर्वात हुशार विद्यार्थी कोण होऊन गेलाफ यासंबंधीचे संशोधन झाले. इंग्लंड, अमेरिका येथील कोलंबिया, ऑक्सफर्ड अशा नामवंत विद्यापीठांनी यासाठी पुढाकार घेतला होता. हे संशोधन बरेच माहिने सुरु राहिले.
नामवंत विद्यापीठांमधली तज्ज्ञ यामध्ये सक्रियपणे राबत होते. या संशोधनातून एक नंबरसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव पुढे आले. जगभर अनेक महापुरुषांचे असंख्य पुतळे आहेत. परंतु जगात इतर कोणत्याच महापुरुषाच्या पुतळ्याखाली मसिम्बॉल ऑफ नॉलेजफ असे कोट करण्यात आलेले नाही. कोलंबिया विद्यापीठात मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे त्याबर मसिम्बॉल ऑफ नॉलेजफ असे कोट करण्यात आलेले आहे. हा गौरवपूर्ण संदर्भ इथे एवढ्याचसाठी द्यावासा वाटतो की सातारच्या या छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकलेला एक विद्यार्थी जगातला सर्वात हुशार विद्यार्थी ठरू शकतो. अफाट अन् अचाट बुध्दिमत्ता
लाभलेले आभाळ उंचीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजही छ. प्रतापसिंह हायस्कूलच्या रजिस्टरला भिवा रामजी आंबेडकर असे नाव असून १९१४ क्रमांकाला तशी नोंद आहे. प्रवेश घेताना या शाळेच्या मनाला आणि तेथील मातीच्या कणाला पूसटशी कल्पनाही नसेल की हा बाल भीवा भविष्यात जगातला आदर्श विद्यार्थी ठरेल. परंतु हे सारं भीवाने आपल्या बिलक्षण प्रतिभेच्या जोरावर खरं ठरवले. मी तर असे म्हणेन या शाळेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञासूर्य जगाला मिळाला. या शाळेत त्यांचे पाऊल पडले आणि याच मातीतून प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या अवकाशात उंच भरारी घेण्याचे बळसुध्दा त्यांना प्राप्त झाले. त्यामुळे छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल हे केवळ सातारकरांचे नाही तर या जगाचे आज प्रेरणास्थान ठरलेलं आहे. म्हणूनच त्यांचा शाळा प्रवेश हा भारताच्या दृष्टिने नवी पिढी घडवणारा, नवनिर्माणाचे स्वप्न विद्यार्थ्यांच्या मन, मेंदू अन मनगटात सळसळत ठेवणारा दिवस आहे. या दिवसाचे स्मरण चिरंतन ठेवायला हवं. शाळेत जाणं किती महत्त्वाचे आहे हे यानिमित्ताने विद्यार्थी मनात रुजवायला हवं. कारण, उद्याचा नवा, समृध्द, शक्तिशाली भारत उभा करायचा असेल, तमाम गोरगरिबांच्या, दलित वंचितांच्या आणि एकूणच समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य धारेत आणायचे असेल तर एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा
नये हे पाहण्याची आवश्यकता
आहे. यातून समाजाला शिक्षणाची
जबरदस्त प्रेरणा आणि चालना
मिळणार असून व्यापक स्तरावर
शालेय शिक्षण चळवळ अधिक
गतिमान होत राहणार आहे.
अरुण विश्वंभर जावळे
प्रवर्तक, ७ नोव्हेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवस
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत