निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

संविधान वाचविल्याबद्दल मतदारांना धन्यवाद!

महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
सोमवार दि. 10 जून 2024
मो.नं. 8888182324

           देशातील लाकसभेची वर्ष 2024 ची ही निवडणूक इतिहासातील अत्यंत महत्वाची निवडणूक होती. या निवडणूकीनंतर भारतात लोकशाही नांदणार की हुकुमशाही हे ठरणार होते. या निवडणूकीनंतर मनुस्मृतीनुसार पुन्हा एकदा चातुर्वर्ण्य पध्दत लागू करण्याचा छुपा डाव होता. मात्र झोपलेला समाज, जनता, मतदार  यावेळी जागी होऊन त्यांनीच ही निवडणूक आपल्या हातात घेऊन संविधानाचे रक्षण केले आहे म्हणून सर्व समाजाचे, जनतेचे आणि मतदारांचे पुन्हा एकदा जाहीर आभार.

           वर्ष 2014 च्या लोकसभा निवडणूकीत जनतेने काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून भाजपच्या नरेंद्र मोदींच्या हातात दिली. या पाच वर्षात नरेंद्र मोदींनी काँग्रेसला दोष देण्याव्यतिरिक्त काहीच केले नाही. त्यामुळे तरूण, बेरोजगार, शेतकरी, गृहिणी, व्यापारी असा समाजातील प्रत्येक घटक नाराज होता. तरीही evm मशिनच्या सहाय्याने नरेंद्र मोदींनी वर्ष 2019 मध्ये आश्चर्यकारक 304 जागा जिंकून एकहाती सत्ता आणली. त्यामुळे भारत अथवा भाजप सरकार एवजी देश मोदी सरकार झाले. मोदी हुकुमशहा सारखे वागू लागले. सर्वोच्च न्यायालय, रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोग, CBI, ED, इन्कम टॅक्स अशा सर्व सरकारी आणि स्वायत्त संस्था आपल्या अधिपत्याखाली घेऊन विरोधकांना नेस्तनाबूत करायला सुरूवात केली. या देशात विरोधी पक्षच ठेवायचे नाही असे खुलेआम भाजपचे नेतेमंडळी बोलू लागली. विरोधी पक्षातील प्रमुख भ्रष्ट नेते मंडळींना जेलची भिती दाखवून आपल्या पक्षात घेऊन विरोधी राजकीय पार्ट्या खिळखिळ्या करून टाकल्या. मिडीयाला खरेदी करून आपले बटुक बनविले.

           भाजप व नरेंद्र मोदींनी यावेळी 400 जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले होते. इलेक्टोरल बॉण्ड आणि पी.एम. केअर फंडातून मिळविलेला प्रचंड पैसा आणि निवडणूक आयोगाच्या सोबतीने हे उद्दीष्ट पार करायचे ठरले होते. यावेळी हुकुमशहा व्हायचेच असा चंग बांधला होता. पण देशातील सर्व विरोधीपक्ष इंडिया आघाडी च्या एका छत्राखाली येऊन संविधान वाचविण्याची हाक दिल्याने देशातील जनता संविधानाच्या बाजुने आली. यावेळी भाजप आणि नरेंद्र मोदींना मतदारांनी सपशेल नाकारले. परंतु, निवडणूकीच्या चौथ्या टप्प्या नंतर निवडणूक आयोगाने अचानक 1कोटी 7 लाख मतदान वाढवून मोदींची इभ्रत वाचविली. निकालाचे रिपोर्ट तपासले असता भाजपला जेमतेम 70 ते 80 जागांवरच समाधान मानावे लागले असते. मोदींनी 240 जागा मिळवूनही हिंदूंना फाट मारून मुस्लिमांचे लांगुलचालन करणा-या नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचे टेकू घेऊन सरकार स्थापन करण्याची नामुष्की मोदींवर आली आहे.

          एकुणच या निवडणूकीत मतदारांनी संविधान बदलायला निघालेल्या भाजप आणि मोदींना त्यांची जागा दाखवून दिली आहे. देशातील जनतेने एकत्रितपणे संविधान वाचविल्यामुळे समस्त देशप्रेमी जनतेचे संविधान प्रेमींकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहे. ✍️

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!