मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

संभाजी नगर मध्ये खडीहातोड्या बरोबरच अनेक मोर्चे.

शहरात आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून, या बैठकीला सुरवात झाली आहे. दरम्यान यावेळी औरंगाबाद शहरात अनेक मोर्चे निघाले आहेत त्यापैकी आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील देखील सहभागी झाले आहेत. तर, मंत्र्यांनी येऊन या मोर्चेकऱ्यांशी संवाद साधावा अन्यथा आम्ही मंत्रिमंडळ बैठकीच्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेऊ अशी भूमिका जलील यांनी घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक या मोर्च्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, पोलिसांनी हा मोर्चा अडवला आहे.

दरम्यान याबाबत बोलताना जलील म्हणाले की, “आदर्श नागरी पतसंस्थेचे व संचालक मंडळाच्या मालमत्तेचे निलामी करुन गोरगरीब, वयोवृद्ध, कष्टकरी व शेतकरी ठेवीदारांचे हक्काचे पैसे देण्यात यावे, आत्महत्या केलेल्या ठेवीदारांच्या नातेवाईकांना पाच लाखाची तात्काळ मदत करण्यात यावी, रुग्णालयात भरती ठेवीदारांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च शासनाने करावा तसेच महाघोटाळ्यातील फरार आरोपींना आणि त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना अटक करण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावे.”
आदर्श पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान यावेळी मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये झटापट पाहायला मिळत आहे. तर इम्तियाज जलील यांना देखील पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि जलील यांच्यात देखील झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मोर्चेकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केल्याचं समजतं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!