आम्ही परिवर्तनवादी बौध्द नसून परंपरावादी बौध्द आहोत.

वसंत कासारे.
प्रत्येक गोष्टीबद्दल चिंतन मनन करून सत्याचा शोध घेऊन त्या सत्याच आचरण म्हणजेच परिवर्तन. त्या सत्या प्रमाण आयुष्यात बदल करण म्हणजे परिवर्तन. मात्र आमचे लोक चिवर धारण केलेल्या, शुभ्र वस्त्र घातलेल्या व्यक्तीने सांगितलेल चिकित्सा न करता स्विकारतात. म्हणून ते परंपरावादी होतात. सामान्य माणसाला चिकित्सा करण शक्य नसल तरी धम्माचा प्रचार प्रसार करणा-या व्यक्तीने तरी जबाबदारीन वागल पाहिजे. आमच्या बौध्द धम्मातही परंपरेवर बोलणाराला मूर्ख ठरवल जात. अती शहाणा म्हंटल जात, त्याच्या सोबत चर्चा करण टाळल जात. त्यान उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलायचच नाही अस वर्तन केल जात. त्याची सामाजात अती शहाणा म्हणून गुपचुप बदनामी केली जाते.
पण चर्चा करून तो चूकतोय हे दाखविण्याची तसदी घेतली जात नाही. किंवा त्यान सांगितलेल कितीही सत्य असल तरी ते स्विकारायच तर नाहीच उलट ते समोर येणार नाही याचीच काळजी जास्त घेतली जाते. हीच आहे अंधश्रध्दा. हाच आहे बौध्दांमधला मनुवाद. आम्हाला धाम्म कळलाच नाही. आम्ही परंपरेच्या मोहात अडकल्या मुळ सत्य शोधायच धाडसच करीत नाही. परंपरा जपली पाहिजे. परंतु ती धम्म तत्वाला बाधीत करणारी नसावी. ती हिंदू कर्मकांडासारखी अशाश्वत नसावी.
मी रोज अशाच पध्दतीने परिवर्तनाचे प्रयत्न करतोय. परंतु परंपरेच्या मोहात अडकलेले लोक चिकित्साच करायला तयार नाहीत.
फार यातना होतात मनाला. कारण माणसाला खरा धम्मच कळत नाही या परंपरेच्या अंधश्रध्देमुळ.
याला भिक्खूसंघही अपवाद नाही. तथागत बुध्द स्वतः म्हणतात मी सांगतोय म्हणून तुम्ही मानू नका. तुम्ही चिंतन मनन करा, स्वतः अनुभव घ्या , नंतर स्विकारा.इतक स्वातंत्र्य कोणत्याच धर्मसंस्थापकान दिलेल नाही. मग आम्ही मात्र परंपरावादी होऊन हे तथागत बुध्दांनी दिलेल स्वातंत्र्य नाकारत आहोत. आणि अंधश्रध्द होऊन धम्माला ग्लानी आणत आहोत. अकुशल कर्म करीत आहोत.
🙏
वसंत कासारे.
(8087480221)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत