भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म

क्रोध आणि वैर.
मनात क्रोधभावना ठेवू नका. वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका.
◾हा बौद्ध जीवनमार्ग आहे.
◾क्रोधाग्नी शमन करा.
◾ तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट भीतीने वागविले. त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात, त्याचा क्रोधाविकार कधीही शमत नाही.
◾ ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत, त्याचा क्रोध शांत झालेला असतो.
◾ शत्रु शत्रूच्या वाईटावर, द्वेष्टा द्वेष्टाच्या वाईटावर टपलेला असतो.
◾ माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे. असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे.
◾ खरे बोलावे. रागवू नये. मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे.
◾ क्रोध सोडावा. अभिमानाचा त्याग करावा. सर्व बंधनांवर जय मिळवावा येणेप्रकारे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो असा अपरिग्रही दुःख भोगत नाही.
◾ वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबवून धरतो, त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत.
◾ ज्यामुळे वैर वाढते, पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो, परंतु ज्याने जयापजयाच्या कल्पनेचाच त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो.
◾ कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषा सारखे दुर्दैव नाही. उत्पादन स्कंदासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही.
◾ वैराने वैर कधीही शांत होत नाही. अवैरानेच ते शांत होते, हा सनातन धर्म आहे.
( संदर्भ- भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पान नं.२७३.)
संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत