निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

उज्जवल निकम यांना हरविण्याची बौद्ध-मुस्लिमांना नामी संधी ! – सुनील खोब्रागडे

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात संघातून रा. स्व. संघ- भाजपाने एड्वोकेट उज्ज्वल निकम यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीत बौद्ध-मुस्लिम-ख्रिश्चन समुदायाचे कट्टर विरोधी असलेल्या उज्ज्वल निकम यांचा बदला घेण्याची नामी संधी बौद्ध-मुस्लिम-ख्रिश्चन समुदायाकडे चालून आली आहे. उज्ज्वल निकम हे रमाबाई नगर हत्याकांड खटल्यातील वकील होते. त्यांच्यामुळेच या हत्याकांडाचा प्रमुख आरोपी मनोहर कदम यास कठोर शिक्षा होऊ शकली नाही. त्याचप्रमाणे खैरर्लंजी हत्याकांड खटल्यात सुद्धा उज्ज्वल निकम यांनी अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत खटला चालविण्यास विरोध केला. यामुळे या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा होऊ शकली नाही.

पुण्यातील मोहासिन शेख या तरुण इंजींनियरची हिंदू राष्ट्र सेनेच्या जमावाने दिवसाढवळ्या हत्या केली. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांना नेमण्यात आले होते. निकम यांनी खटला निर्णायक वळणावर आला तेव्हा विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला. परिणामी या हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोष सुटले.

उज्ज्वल निकम यांचा हा इतिहास पाहता ते रा. स्व. संघाचे कट्टर सेवक आहेत हे उघड होते. यामुळे उज्ज्वल निकम यांचा बदला घेण्याची नामी संधी बौद्ध-मुस्लिम-ख्रिश्चन समुदायाकडे चालून आली आहे.

या मतदार संघाचा विचार केल्यास या मतदार संघात एकूण 20 लाख मतदार आहेत. यात बौद्ध-दलित मतदार 2 लाख, मुस्लिम मतदार 6 लाख,ख्रिश्चन मतदार 1 लाख आहेत. या मतदार संघात उत्तर भारतीय तसेच मराठी मतदार मोठ्या संख्येत आहेत. मराठी मतदारांपैकी बहुसंख्य शिवसेना उबाठा पक्षाला मानणारे आहेत. म्हणजेच जवळपास 70 टक्के मतदार हे रा.स्व. संघ भाजपाच्या संविधान नष्ट करण्याच्या भूमिकेच्या विरोधात आहेत. २०१९ च्या निवडणुकीत या मतदार संघात भाजप ने 4,86,672 मते (५४ % ) मिळवून विजय मिळवला होता तर काँग्रेस उमेदवारला 3,56,667 मते (४०%) मिळाली होती. वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार अब्दुर रहमान यांना 33,703 (४%)मते मिळाली होती. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभानिवडणुकीत VBA च्या उमेदवाराला केवळ 21 हजार मते मिळाली होती. यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षाताई गायकवाड या मागील 20 वर्षे आमदार आहेत. वैद्यकीय,उच्च,तंत्र शिक्षण खात्याच्या तसेच महिला विकास खात्याच्या मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती.त्या मानाने उज्ज्वल निकम हे राजकारणात पहिल्यांदाच उतरले आहेत. ते जळगाव जिल्ह्यातील असल्याने त्यांना जातीय समीकरणाचा फारसा फायदा मिळण्याची शक्यता नाही. त्यांची मुख्य मदार 1 लाख गुजराती-बनिया व काही प्रमाणात उत्तर भारतीय मतदारांवर आहे. ही समीकरणे पाहता येथे प्रा. वर्षा गायकवाड यांना अगदी सहजपणे विजय मिळेल अशी स्थिति आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!