महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

सामाजिक न्याय दिन

प्राजक्ता_पाटील


आजही प्रस्थापित वर्ग ज्या राजाचा तिरस्कार करतो आणि ज्यांच्या मृत्यनंतर त्यांनी पेढे वाटले .आजही त्यांच्यासाठी अत्यंत संतापजनक अफवा हा वर्ग पसरवत असतो . त्यांचं कारण त्यांचं वैदिक वर्चस्वच महाराजांनी नाकारले आणि सामजिक न्याय ,समानता स्वतःच्या राज्यात स्थापित केली .
अस्पृश्यता पाळू नये म्हणून कायदाच केला .
एक आदर्श राजा कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे #राजर्षीछत्रपतीशाहूमहाराज #आंबोळीचेशेत ही पार्वतीबाईंची कथा तुम्हाला माहीतच आहे .बाहेर फेरफटका मारायला गेलेल्या महाराजांना भूक लागली . पार्वतीबाई आपल्या धन्यासाठी आंबोली घेवून निघाली होती . घोडेस्वार ओळखीचा नव्हता पण त्याने भूक लागली म्हणताच पार्वतीबाईने पोटभर जेवू घातले .दुसऱ्याच दिवशी तिला आणि तिच्या नवऱ्याला दरबारात बोलवणे आले .बघते तर काय कालचा घोडेस्वार राजा होता .तिला 10 एकर शेत ,चोळी बांगडी देवून स्वतःची बहिण म्हणून सत्कार केला . मडीलगे बुद्रुक मधील ते शेत आंबोळीचे शेत म्हणून ओळखले जाते .
गंगाराम कांबळे यांच्या ‘सत्यसुधारक हॉटेल’ मध्ये जाऊन सकाळी फेरफटक्याला गेल्यावर महाराज बग्गी थांबवून मोठ्या आवाजात ऑर्डर द्यायचे .स्वतः महाराज चहा घेत आहेत म्हणाल्यावर लोकं पण घ्यायचे .
अगदी बालगंधर्वांना पण त्यांच्या पडत्या काळात मदत केलीय.
मतभेद बाजूला ठेवून टिळकांच्या मृत्यूनंतर धाव घेणारे महाराज खूप मोठ्या मानाचे होते हे सांगणे न लगे .
स्त्री शिक्षासाठी ते नेहमी आग्रही राहिले ,विधवा पुनर्विवाह करण्यास चालना दिली .सुरुवात ते स्वतः पासून करत, स्वतःच्या घरापासून करत .
बहुजन समाज मागासलेला आहे त्याला पुढे आणायचे असेल तर शिक्षण किती गरजेचे आहे है ते जाणून होते .मागासवर्गीयांसाठी ,सर्व स्तरातील मुलांसाठी ,अगदी मुस्लिमांसाठी पण त्यांनी वस्तीगृह सुरू केले .
#राधानगरी धरणावरून त्यांच्या आधुनिक विचारांची ,शेतीविषयक धोरणाची कल्पना येतेच .त्यांच्या अनेक शौर्य कथांमधून त्यांच्या ताकदीची कल्पना येते .कुस्तीचे फड ,तालीम यांचा विकास झाला तो इथेच .
त्यांच्या पुरोहितांनी त्यांना शूद्र लेखून धर्मसंस्कार नाकारल्यानंतर त्यांनी तो अधिकार त्यांच्याकडून काढून घेतला . एका मराठा व्यक्तीची पुरोहित म्हणून नेमणूक करून .वैदिक ज्ञान इतर समाजासाठी खुले केले .आता इथं नेमकी गोम तुमच्या लक्षात येईल का हे प्रस्थापित त्यांचा एवढा तिरस्कार करतात .पण आपले काही बहुजन लोकं पण शाहू महाराजांचा अनुल्लेख करतात हे अतिशय दुःख दायक आहे .अभिजन समाज ज्यांचा तिरस्कार करतो त्यांच्या विषयी शंका बाळगणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आणि अभिजन वर्ग ज्यांचा उदो उदो करतो त्यांचा उदो उदो करणे .हे जे लोकं करतात ते अजूनही मानसिक गुलामगिरीत जगत आहेत .
मागासवर्गीय लोकांची आरक्षणाची गरज ओळखून त्यांनी आरक्षण सर्वप्रथम सुरू केले म्हणून त्यांना #आरक्षणाचे_जनक म्हणतात .संविधानात यायच्या आधी ते शाहू महाराजांच्या राज्यात होते .
किती सर्वांगीण जीवन आणि समाजाचा विकास त्यांनी केला .त्यामुळे महाराष्ट्र त्यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करतो .
त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करायचा असेल तर त्यांनी केलेले कार्य अभ्यासाणे आणि त्यांच्या मार्गावर चालणे हीच त्यांना मानवंदना असेल.

©️ #प्राजक्ता_पाटील

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!