मांगाचा सवता सुभा

अनुसूचित जाती मधील फूट
मातंग चांभारांच्या अंगाशी येणार…
अनुसूचित जातीच्या आरक्षणात वर्गीकरण लागू झाले पाहिजे….
या मागणीसाठी मातंग समाज संघटित होत आहे, त्या निमित्ताने मातंग बांधवांना नम्र आवाहन करण्यात येत आहे..
आरक्षणात वर्गीकरण ही अनुसूचित जाती – पोटजाती मध्ये फूट पाडण्याचा डाव आहे, भावा भावामध्ये कलह निर्माण करण्याची कुटील डाव खेळी आहे,
आरक्षणाच्या वर्गवारीची वेळ नसून, आरक्षण वाचविण्याची वेळ आहे, आपल्या बापाने परमपूज्य बाबासाहेबानी आपल्यासाठी जे कमविले, मिळविले त्याचे जतन करण्याची ही वेळ आहे त्यासाठी मातंग, चर्मकार, बौद्ध समाजाने एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आहे
बाबासाहेबांनी मिळविलेल्या आरक्षणाचा फायदा फक्त पूर्वश्रमीच्या महारांनी, आताच्या धर्मांतरित बौध्दानी घेतला, असा सर्रास आरोप केला जातोय, या आरोपात तथ्य देखिल आहे,
बाबासाहेबांची मानवमुक्तीचा लढा हा एका विशिष्ठ जाती पुरता कधीही नव्हता
परंतु पूर्वश्रमीच्या महारांनी बाबासाहेब व त्यांच्या कर्तृत्वावर, नेतृत्वावर डोळे झाकून विश्वास ठेवला, बाबासाहेबांनी शिकविलेला, दिलेला एक एक उपदेश जिवाच्या पलीकडे अंगीकारला, बाबासाहेब म्हणाले शिका लोक शिकू लागले, बाबासाहेबानी सांगितले, चातुर्वर्ण जातीच्या आधारे लादलेला व्यवसाय करू नका लोकांनी वतनाची महारकीची कामे सोडून दिली, परंतु एकानेही प्रश्न केला नाहीं, की बाबासाहेब आम्ही खायचे काय, जगायचे कसे कपडे बदलतात तसे बाबासाहेब यांच्या आदेशा नुसार करोडो लोकांनी धर्म बदलला
, हिंदू धर्माचा त्याग केला
बाबासाहेबांच्या चळवळीत सहभाग घेतला, लाठ्या काठ्या झेलल्या, तुरुंगात गेले, अस्पृश्यांचा पुढारी कोण? गांधीं की आंबेडकर असा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी महार समाज बाबासाहेबांच्या पाठीशी उभा राहिला.
इथे एक महत्वाची गोष्ट नमूद करावयास पाहिजे, पूर्वश्रमीच्या महारांचा विकास झाला त्याचे एकमेव कारण धर्मांतर हेच आहे
असपृरुष्यता, शिवा, शिव, विटाळ याचे चटके, त्रास मातंग समाजाला फार कमी झाला कारण हिंदू असलेला मातंग उच्चंजातीच्या हिंदू धर्मीय लोकांच्या सहवासात होता तो सहवास व्यवसाय, धार्मिक विधीकरिता अटळ होता मातंग जातीचा दोर, कासरा, टोपल्या विनणे आणि विकणे या व्यवसायामुळे मांगाचा बाट धरणे अशक्य होते गरजेचे नव्हते, शिवाय ग्रहण काळात मांग जातीच्या व्यक्तीस दान देणे पुण्यांचे समजले जात होते, म्हणून अमावश्या – ग्रहणाच्या दिवशी हिंदू उच्चंवर्णीय मांगाची प्रतीक्षा करीत असत त्यामुळे मांग समाज हिंदू म्हणून हिंदूंच्या सोबत राहिला
मातंग समाजाने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून दूर रहावा, असे प्रयत्न महात्मा गांधी आणि काँग्रेस पक्षाने केले होते, त्यासाठी महात्मा गांधींने महार, मांग, चांभार समूहाचे ” हरिजन ” असे नामांतर केले होते हरिजन सेवक संघ स्थापन करून बिर्लासारख्या उद्योगपतीकडून लाखो रुपयांचा फंड उभा केला, त्या फंडाद्वारे हरिजनांना लाचार बनविण्याचे कार्य केले त्याचा परिणाम महात्मा गांधी – काँग्रेस विरुद्ध बाबासाहेब आंबेडकर अश्या लढ्यात हें तथाकथित हरिजन काँग्रेस व गांधींच्या पाठीशी उभे राहिले, स्वातंत्र्यनंतर ६०,६५ वर्ष मातंग समाज सातत्याने काँग्रेससोबत राहिला,
काँग्रेस हें जळते घर आहे, हा बाबासाहेबांचा संदेश प्रमाण मानून महार बौद्ध समाज काँग्रेसपासून दूर राहिला.
काँग्रेस पक्षाच्या फतव्यानंतर मातंग समाज मोदी, भाजपा सोबत राहिला आहे, हिंदू म्हणून उच्चजातीच्या हिंदूंनी धर्म बांधव म्हणून मातंगाना सहानुभूती आणि प्राधान्य दिले होते देत आहे
विशेषतः अनुसूचित जाती साठी राखीव मतदार संघात हिंदू दलित ( मांग, चर्मकार, खाटीक, भंगी मेहत्तर ) उमेदवारांना निवडून आणतात
आरक्षणाचा फायदा एका विशिष्ट जातीनेच घेतला, हा मांग समाजाचा आरोप मान्य करून त्यावर मांग जातीने आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे सवतासुभा मागण्या पूर्वी
या सवत्या सुभ्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला आहेच 1980 मध्ये मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाला शह देण्यासाठी, नामोहरम करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले अनुसूचित जातीच्या आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक विकासासाठी फुले म्हमंडळंकडून भांडवल, प्रशिक्षण दिले जात होते, पुढे डॉ बाबासाहेब गोपले साहेबांच्या नेतृत्वात मातंगासाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी पुढे आली व मातंगजातीसाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन झाले महामंडळाचा बट्ट्याबोळ झाला, भ्रष्ट्राचार झाला अध्यक्ष तुरुंगात गेले असेच चर्मकार जातीसाठी संत रोहिदास विकास महामंडळाचे झाले
बबन घोलप यांनी 600 कोटी रुपयाचा अपहार झाला तेही बुडाले, बबन घोलप, रमेश कदम यांच्या विरोधात व बाजूने देखिल कुणी बोलत नाहीं …
समाज कल्याण खात्याचा विकास निधी वळविला जातो, पळविला जातो, अशावेळी मातंग, चर्मकार समाजाने आवाज उठवीला पाहिजे पण तसे होत नाहीं, आवाज उठवितो, सत्तेच्या विरोधात तो एकच
बौद्ध समाज मातंगाना स्वतंत्र आरक्षण मिळेलही…..
परंतु ते टिकवून धरण्यासाठी समस्त अनुसूचित जातीची एकजुठ आवश्यक आहे …..
जय भीम जय मातंग
तानसेन ननावरे
युनायटेड रिपब्लिकन्स आम्ही भारताचे लोक
महादू पवार
पत्रकार, मुंबई
9867906135
सूचना, मेसेज सर्वत्र फॉरवर्ड करावा…….
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत