NEET प्रकरणावर आणखी थोडं !

विजय घोरपडे .
” डाॅक्टरी व्यवसायात प्रवेश मिळावा म्हणून सुरू करण्यात आलेल्या योजनेला खिळ बसली हे सरकारचे मोठेच अपयश ! ”
वरील प्रतिक्रिया माझ्या ” तेंव्हा नीट लक्षात घ्या ! ना सरकार बदलले ना व्यवस्था ” या लेखावरची आहे . लोकसत्ताचे माजी सहा.संपादक श्री रमेश झवर यांची आहे . तिथे काम करत असताना ते माझे बॉस होते . माझ्या काही वाचक मित्रांना या एकूणच प्रकरणाची पार्श्वभूमी माहित नसल्याने श्री झवरसाहेबांची प्रतिक्रिया नीट समजली नाही म्हणून आज पुन्हा थोडं त्याच विषयावर लिहित आहे .
या देशाला ” अच्छे दिन ” आणून देण्यासाठी जनतेने जेंव्हा मोदी यांना निवडून आणले तेंव्हा आल्या आल्या म्हणजे 2018 मध्ये त्यांनी ” National Testing Agency म्हणजे N.T.C. स्थापन केली . तत्कालीन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खास पत्रकार परिषद घेऊन या N.T.C.ची घोषणा केली . त्यानंतर
देशातील सर्व सरकारी संस्थामधील व्यवस्थापन प्रवेश परीक्षा ( Administering Entrance Examinations )
ही या एकाच एजन्सी मार्फत करण्यात येऊ लागली . या संस्थेच्या Selection कमिटीत नियोजनपूर्वक RSS मधील उच्चशिक्षित व संघाच्या विचाराशी आजन्म बांधिलकी असलेल्या व्यक्तींची निवड करण्यात आली .ही संस्था मग अन्य शैक्षणिक पात्रतेबरोबर उमेदवाराकडे ” संघ विचारा ” ची पात्रता आहे की नाही हे आवर्जून पाहू लागली व त्याप्रमाणे अत्यंत सफाईने व अधिकृतपणे सरकारी संस्थांमध्ये संघ विचारांच्या व्यक्तींसाठी एक ‘ राजमार्ग ‘ खुला करण्यात आला . मग शैक्षणिक संस्था , विद्यापीठे , सार्वजनिक उपक्रमातील व्यवस्थापन आदी सर्व या मंडळींच्या हाती सोपविण्यात आले . डॉक्टर, इंजिनिअर, स्थापत्य विशारद , आदी सर्व या देशात कोण बनणार , त्यांच्या परीक्षांना कोण बसणार , कोण उत्तीर्ण होणार हे हि N.T.C. ठरवू लागली . म्हणजे देशातील समग्र
” निवड प्रक्रिया ” ( Selection Power ) ही या NTC च्या मार्फत मोदींनी ‘ संघा ‘ च्या हाती दिली .
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ( J.N.U . ) व तत्सम अन्य संस्था इथे जेंव्हा ‘ हे संघीकरण ‘ अवघड होऊ लागले तसे मिडीयाच्या मदतीने अशा
संस्था बदनाम करण्याची मोहिम उघडण्यात आली . गेल्या 10 वर्षात आज सरकारी संस्थांमध्ये सर्वत्र संघाचे विद्वान व संघ विचाराचा वरचष्मा दिसतो तो याच N.T.C मुळे ! या मोदींनी स्थापन केलेल्या संस्थेमुळे ! लोक सेवा आयोगातील उच्च पदांवरही हीच संस्था नियुक्त्या करते ! संसदेत मोदींना 400 पार हे केवळ
‘ संविधान ‘ बदलण्यासाठी हवे होते हे अर्ध सत्य आहे . या देशाची ” ऑब्सोल्यूट पॉवर ” एक हाती पाहिजे म्हणून त्यांना 400 पार हवे होते . त्याचे एक एक पदर आता हळू हळू समोर येतील ! या ऑब्सोलूट पॉवरची संकल्पना संघाने ज्या कम्युनिझम वा कम्युनिस्टांना रात्रंदिवस शिव्या घालतात आणि दुसरीकडे कम्युनिस्ट चीनसमोर लोटांगण घालतात त्यांच्याकडून उचलली आहे .
रशिया मध्ये सामाजिक समानतेसाठी 1917 मध्ये क्रांती झाली . तिला रशियन तथा बोल्शेविक क्रांती म्हटले जाते . ती झाली तेंव्हा रशिया हा देश भूके – कंगाल होता .आणि ही क्रांती तर सामाजिक समानतेसाठी झाली होती .मग त्यासाठी या क्रांतीचे तथा बेल्शेविक
( कम्युनिस्ट) पार्टीच्या कौन्सिलने पंचवार्षिक योजना आखल्या . देशातील
टॅलेन्टेड तरूणांचा शोध घेतला .आणि त्यांच्या टॅलन्टनुसार त्या त्या क्षेत्रात त्यांना वाव दिला . आज जे हे सरकार ” कौशल्य विकास ” सांगून जनतेला फसवत आहे , तो रशियाने आपल्या तरूणांचा खर्या अर्थाने 1918 ते 1927 या काळातच केला होता . यात प्रांत , भाषा , लिंग असा कसलाही भेद न करता देशाच्या तरूणांची ‘ महाशक्ती ‘ या राष्ट्र उभारणीला लावली .या उर्जेवर तरूणांनी सर्व क्षेत्रात आपल्या देशाला 1944 पर्यंत ” महासत्ता ” बनविले . मा. नरहर कुरुंदकर यांच्या ” 60 वर्षाचा रशिया ” या पुस्तकात याचे खूप रोमहर्षक वर्णन आहे . चीन आज दुसरी महासत्ता म्हणून जगावर अधिराज्य गाजवू लागला आहे तो माओ त्से तूंग यांनी आपल्या देशात जो तब्बल 20 वर्षाचा ” लाँन्ग मार्च ” केला त्याच्या पायाभरणीवर ! माओ यांचा तो टॅलन्टच नव्हता तर ती एक जन जागृतीची मोहिमही होती .आणि हा भारत आज जो काही 2014 पर्यंत प्रगती करू शकला तो पंडित नेहरू यांच्या
‘ पंचवार्षिक योजना ‘ या विकासाच्या
‘ ब्ल्यू प्रिन्ट ‘ वर ! आणि ती संकल्पना त्यांनी रशियाकडूनच घेतली होती. देशात सामाजिक समता निर्माण करण्यासाठी !
RSS आज देशात या N.T.C. द्वारा जे ” टॅलन्ट हन्ट ‘ ही कल्पना राबवत आहे ती ना सामाजिक समतेसाठी ना राष्ट्र उभारणीसाठी ! तर या संकल्पनेद्वारे संघ त्यांचे तूर्तास अघोषित असे ” हिंदू राष्ट्र ” घडवू पहात आहे .या N.T.C. द्वारा ते देशातील ‘ टॅलेन्ट ‘ शोधत नाहीत तर केवळ ‘ संघीय ‘ विचाराचे प्रभूत्ववादी शोधत आहेत . आणि या देशाची धूरा त्यांच्या हाती सुपूर्द करत आहेत.
या N.T.C . चे पहिले डायरेक्टर जनरल म्हणून विनीत जोशी यांची निवड करण्यात आली होती . ही संस्था JEE ( जॉइन्ट एन्ट्रन्स एक्झामिनेशन ) पासून ते NEET , NET , ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टीट्यूट टेस्ट , NECET ( नॅशनल एलिजिबिलिटी कम्युलेटीव्ह एन्ट्रन्स टेस्ट ) आदी सर्व राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेते . व अधिकृतपणे तिच घेऊ शकते . आणि सर्वत्र म्हणजे जळी – स्थळी संघीय विचारांचा भरणा करत आहे .
छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आदी राज्यातील लोकसेवा आयोगाच्या नियुक्त्यांबाबतची प्रकरणे तशी न्यायालयापर्यंतही गेली होती .पण जनतेचे यावर लक्ष जाऊ नये म्हणून मिडीया त्यावेळी कुठल्या ना कुठल्या नेत्याचे भ्रष्टाचार किंवा नेत्याची एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप याची जुगलबंदी रंगवत होते . आजही या NEET च्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष भरकटविण्यासाठी मिडीयाकडून काही तरी ‘ शक्कल ‘ लढविली जाईलच !
पण आज NEET चा साळसूदपणे अगदी
सिस्टिममधून होत असलेला भ्रष्टाचार काही प्रमाणात का होईना जनतेसमोर आला आहे . …. आणि तो देशव्यापी आहे .
● विजय घोरपडे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत