जनमत भाजपच्या बाजूने वळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा)चे आमदार कमी का पडले ?

ऍड अविनाश टी काले , अकलूज
मो न 9960178213
युद्ध मग ते लष्करी मोहीमे तील असो किंवा निवडणूक रिंगणातील ते संपल्या नंतर ही त्याचे कवित्व चालूच राहते .
निवडणूक जिंकलेले आनंद व्यक्त करतात , तर पराभूत झालेले आत्मचिंतन करत राहतात ,
प्रत्यक्ष समग्र वास्तवाचे आकलन न झाल्याने त्याचे खापर कुणावर तरी फोडले जाते , आणि मनाची समजूत घालून पुन्हा स्वतः ला लढण्यासाठी तयार केले जाते किंवा मानसिक बळ प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो .
ही एक प्रकारची विचित्र मानसिक स्थिती असते , आणि सत्य पचवणे अवघड असते .
मला असाच माझ्या जीवनात घडलेला किस्सा मला आठवतो , त्याचे असे झाले की मी साखर कारखान्यातून मिळालेली उसाची रक्कम खिशात घेऊन येत होतो ,,आम्ही शेत वस्तीवर रहात होतो , साधारण 50हजार रुपये असतील ,, आणि वडिलांनी ती रक्कम आणण्यास मला सांगितले होते , ती रक्कम खिशातून रस्त्याने कुठे तरी पडले होते .
मी घरी आलो आणि पाहिले तर पैसे नव्हते ,, माझ्या घशाला कोरड पडली , तांब्याभर पाणी पिवून मी तेच ते मोकळे खिसे पुन्हा पुन्हा उलाटे करत होतो , पुन्हा निराश होत होतो , खिसा नीट करून पुन्हा पुन्हा हात घालत होतो .
मला कळत होते की खिशात पैसे नाहीत ,,, पण वर्षाची मेहनत अशी गेल्यावर घालमेल तर होणारच ,,,,
तीच गत भाजप ची झालेली आहे ,
माढा , दिंडोरी , मावळ , सोलापूर अश्या अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा यांचे आमदार असलेल्या भागातून च भाजप ला पिछेहाट सहन करावी लागली आहे ,
आणि “भरवशाच्या म्हशीला टोणगा ” अशी अवस्था भाजप नेत्यांची झालेली आहे ,
तुम्ही समजता तितकी माढा लोकसभा निवडणूक अवघड नाही अस विधान ना देवेंद्र जी फडणवीस यांनी याच आधारे केले होते .
पण या साऱ्यांनी ही बाब विसरली होती की राष्ट्रवादी काँग्रेस चां निर्माण झालेला मतदार हा शरद चंद्र जी पवार साहेब यांच्यावर प्रेम करणारा आहे , आणि त्याची वैचारिक जडण घडण ही मराठा सेवा संघ ते संभाजी ब्रिगेड यांच्या माध्यमातून ब्राम्हणेतर विचारसरणीच्या प्रेरणेतून झालेली आहे .
ना अजित दादा यांच्या वर आणि त्यांचे कुटुंबियांच्या वर जे आरोप झाले , आणि यातून चौकशी व अटकेची कारवाई केली जाण्याची चिन्हे या मुळे अजित दादा यांना भाजप चे आश्रयाला जावे लागले असेच मत या मतदारांचे झाले .
त्या मुळे हा मतदार त्यांनी सांगितलेल्या दिशेला गेलाच नाही .
उलट भाजप प्रति त्याचे मनात घृणा निर्माण झाली हेच खरे कारण या मागे आहे .
या उलट ना एकनाथ जी शिंदे साहेब यांच्यावर गद्दारी केल्याचा आरोप करून ही , त्यांच्या पक्षातील किंवा पक्षाला मानणारा वर्ग हा हिंदुत्व वादी असल्या मुळे त्या मतदारात फारसा फरक पडला नाही .
हेच ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत घडले , ऍड बाळासाहेब आंबेडकर हे भाजप विरोधी आहेत का? याचे उत्तर आहेत असेच येते , परंतु ते किंवा त्यांचा पक्ष स्व सामर्थ्य आधारे निवडणूक जिंकू शकत नाही हे त्यांचा बेस असलेल्या नवबौध्द समाजाला ही ज्ञात असल्यानेच भाजप ला रोखण्या साठी ती मते महा विकास आघाडी कडे वर्ग झाली .
अजित दादा यांचा राजकीय प्रवास जिथून झाला तिथे ही भाजप साठी कोणतीच जागा नव्हती , त्यांचा मतदार हा हिंदुत्व वादी कधीच नव्हता , आणि फक्त अजित दादा यांचे राजकारण चालू रहावे म्हणून भाजपा ला निवडून द्यावे असे त्यांच्या मतदारांना वाटले नाही ,,,
मुळात अजित दादा यांनी त्यांचा मतदार च घडवलेला नाही , ते नेते म्हणून राहिले व त्यांच्या बाजूने असलेले लोकप्रतिनिधी हेच त्यांचे भांडवल होते .
पवार साहेबांचे वैशिष्ठ्य हे आहे की ते लोक प्रतिनिधी यांचे ही नेते आहेत , आणि सामान्य माणसावर ही त्यांचा प्रभाव आहे , हीच खरी गंमत आहे .
म्हणून च अनेकदा लोक प्रतिनिधी त्यांना सोडून गेले पण त्यांचा मतदार त्यांचे समवेत राहिला ,
उन्हा मध्ये उभी असलेली व्यक्ती तिच्या उलट बाजूने सावली निर्माण करते ,
सावलीचे अस्तित्व तो पर्यंत असते जो पर्यंत ती व्यक्ती त्या उन्हात उभी असते , व्यक्ती बाजूला गेली की सावली नष्ट होते .
ना अजित दादा यांचे आजवरचे अस्तित्व असे सावली सारखे राहिलेले आहे , या सावलीला व्यक्ती म्हणून गृहीत धरून त्यांना भाजप ने सत्तेत घेतले . सत्तेची आर्थिक ऊब मिळावी म्हणून आमदार खासदार त्यांचे कडे गेले ,,
पण त्याच लोक प्रतिनिधी यांना जाणीव झाली आहे की जर मतदार ही सत्ता स्वीकारणार नसतील तर आपले अस्तित्व काय राहणार ? म्हणून ते लोक प्रतिनिधी ही अस्वस्थ आहेत ,
आणि अश्या गंभीर परिस्थितीत संघाचे मुख पत्राने ही त्यांचे वर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे ,
अतिशय दुर्बल बनून सत्तेसाठी लाथा खाण्याचा स्वभाव अजित दादा यांचा नाही हे मला ही माहीत आहे , अश्या परिस्थितीत ते गप्प राहणार नाहीत , पण या पुढे ते स्वतः चां पक्ष अधिक मजबूत करण्या कडे लक्ष देतील असेच मला वाटते ,,,
स्पष्टपणे सांगायचे झाले तर कोणताच आमदार , आणि अजित दादा ही अप्रामाणिक नव्हते , पण ते त्यांच्या कडे मतदार वळवू शकले नाहीत याचे कारण तसा वैचारिक बेस असलेला मतदार त्यांच्या कडे नव्हता , आणि असा मतदार घडवू शकेल असा रण निती कार ही त्यांच्या कडे नव्हता .
जीवाचे रान करून भांडणारे आ भरणे मामा आपण पाहिले पण दोन्ही आजी माजी आमदार एकत्रित येऊन ही इंदापूर तालुक्यात जन मतात ते मागेच राहिले ,, हे खुद्द त्यांच्या धर्म पत्नी चे बाबतीत घडतं असेल तर त्यांना अप्रामाणिक कसे म्हणता येईल?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत