सामाजिक न्याय विभागाचे परीपत्रक अन्यायकारक..


अँड.कुलदीप आंबेकर
उच्चशिक्षणासाठी परदेशात जाणारे मागासवर्गीय विद्यार्थ्या आता राहणार वंचितच.
मागील काही वर्षापासुन फुले,शाहु,आंबेडकरी विचाराची प्रेरणा घेउन हजारो मुले परदेशात शिकण्यासाठी जाण्याची स्वप्न बघत होती.त्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे शासनाच्या शिष्यवृत्तीमुळे ती इच्छा पुर्ण होत होती.परंतु विद्यार्थ्या व पालकांची घोर निराशा शासन व प्रशासनाकडुन 23 _10_2023 परीपत्रकांमुळे करण्यात आली.परदेशात शिकण्यास जावु नये असे यांना वाटत आहे.
कारण शासनाने पदवीला जर 75% मार्क असेल तरच अर्ज भरु शकतो.(गेल्या वर्ष पर्यत 60% होते)अशी अट टाकल्याने हजारो विद्यार्थ्या आता अर्ज करु शकणार नाहीत.अंत्यत दुर्दवी बाब म्हणावी लागेल.बरं ही अट का काढले! त्याचे स्पष्टीकरणीही दिले पाहीजे होते.
मुळ प्रवाहात आता कुठे हा घटक येत होता.हा विद्यार्थ्या ग्लोबल भूमिकेतुन स्वत;ला सिद्ध करत होता.करीअरच्या नवनवीन वाटा धुंडाळत होता.समाजाच्या उन्नतीचा आशेचा किरण होता.अशावेळी या निर्णयांनी समाजाची व त्या घटकातील विद्यार्थ्याचं वाटोळं करण्याचा विडा शासनानी उचलला आहे का! असे यातुन दिसत आहे.
हा निर्णय एक अन्यायकारक आहे.यावरती स्टुडंट हेल्पींग हँडस जनहित याचिका दाखल करणार.
अँड.कुलदीप आंबेकर
संस्थापक स्टुडंट हेल्पींग हँडस
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत