भक्तांसाठी प्रेमळ सूचना –

डॉ. विनय काटे
१) इथून पुढे “मोदी सरकार, मोदी सरकार” असे म्हणायचे नाही… “एनडीए सरकार, एनडीए सरकार” असं म्हणायचं! दोन्ही बाबू रागावले तर अवघड होईल सगळं!
२) वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांची आणि त्यांच्या पक्षांची नावे लक्षात ठेवायची सवय राहू द्या… म्हणजे आधीसारखं मोदी म्हणतील तो कायदा आणि निर्णय वगैरे होणार नाही आता!
३) “मनकी बात” वगैरे तुम्हाला आवडत असेल तर ती इथून पुढे जवळपास बंद पडेल. आता मोदीजीना बोलायला भरपूर मित्रपक्ष आहेत. तेव्हा तुम्हाला कमी बोलतील ते!
४) वंदे भारत ट्रेन, रस्ते, बोगदे वगैरेची उद्घाटने करताना एकटे मोदी चालले आहेत असे दृश्य आता दुर्मिळ होईल. त्यांच्या सोबत इतरही लोक दिसायला लागतील.. त्यांची सवय करुन घ्या!
५) मोदीजींनी दिवसातून चारदा कपडे बदलणे, फोटो काढून घेणे, मोरांना दाणे भरवणे, बिनकामाची भाषणे ठोकणे यात दिवसाचे १८ तास वाया घालवणे आता बंद होईल … आता त्यांना खरोखर १०-१२ तास काम करावे लागेल. त्यामुळे वायफळ उद्योग दिसले नाहीत तर नाराज होवू नका!
६) परदेशात दौरे काढून रिकामटेकड्या एनआरआय लोकांना गोळा करुन “मोदी मोदी” वगैरे घोषणा द्यायला लावण्याचे कार्यक्रम बंद होतील. ही करमणूक कमी झाल्याने हिरमुसून जाऊ नका!
७) “मी भक्त आहे तरी… “ किंवा “मी भक्त नाही तरी…” ही स्वतःला भक्त सिद्ध करणारी दोन्ही वाक्ये चारचौघात बोलू नका. दिवस चांगले नाहीयेत!
८) शेतकरी, कष्टकरी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांक यांना वाईट बोलण्याचा मोह आता आवरा… किमान विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांनी तरी याबाबत काळजी घ्या!
९) या देशात धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि संविधान अजून जिवंत आहे हे समजून घ्या… जिथे मोदीजींना दहा वर्षांनी का होईना पण विनम्रपणे झुकावे लागले तिथे तुम्हालाही झुकावे लागेल हे मनी ठेवा!
१०) शक्य तितक्या लवकर द्वेष आणि भक्ती सोडून माणसात या… हा देश आणि इथले लोक खूप चांगले आहेत. तुम्हीही चांगले व्हा!
- डॉ. विनय काटे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत