महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

वसंत कासारे.


हे वाक्य आहे वामनराव पै यांच. या वाक्याचा अर्थ आहे. माणूस जसा जगतो, जसा वागतो तसाच घडतो. माणसाला जर कुणी सांगितल तू चोरी कर , तर त्या माणसान स्वतः निर्णय घ्यायचा. चोरी करायची की नाही. जर त्यान निर्णय घेतला चोरी करायची तर तो चोर होतो.चोर होण न होण हे सांगणा-यावर नाही तर माणसाच्या स्वतः निर्णय घेण्यावर आहे. दहावीच्या एकाच वर्गातून अनेक विद्यार्थी परिक्षा पास होऊन बाहेर पडतात आणि निर्णय घेतात की काॕलेजला जायच की इँजिनियरींगला. काॕलेजला जाणारे निर्णय घेतात सायन्सला जायच, काॕमर्सला जायच की आर्ट्सला. जो विद्यार्थी जो निर्णय घेतो ते तो बनतो. इँजिनियरींगला जाणारा इँजिनियर बनतो. सायन्सला जाणारा डाॕक्टर, बीएससी, एमएससी होतो. हे तो होतो ते त्याच्या निर्णयान. यालाच म्हणतात तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ज्याला बुध्द धम्माच ज्ञान नाही तो कसा त्याच्या जीवनाचा उध्दार करील सांगाना. वामनराव पै यान तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथात ईश्वराच अस्तीत्व मान्य केलेल आहे. जो ईश्वराच अस्तीत्व मानतो तो स्वतःच्या जीवनाचा उध्दार करू शकत नाही . तो परावलंबी असतो. ईश्वरावर अवंलंबून असतो. ज्या ईश्वराला तो मानतो तोच त्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो.
तथागत गौतम बुध्दांच महान वाक्य आहे अतः दिपः भवः . याचा शब्दशः अर्थ आहे स्वयं प्रकाशित व्हा. याचाच आणखीन एक अर्थ आहे (एहि पस्सिको. ) या आणि जाणते व्हा. ज्ञानी व्हा.
जो उपासक तथागत बुध्दांकडे जाऊन नम्रतेन हात जोडून याचना करीत असे की तथागत मला आपल्या धम्माचा उपासक होण्याची अनुमती द्यावी. तेंव्हा तथागत त्या उपासकाला म्हणत एहि पस्सिको. म्हणजेच अतः दिपः भवः.
या आणि स्वतः जाणा, अनुभवा आणि मग ठरवा तुम्हाला मी सांगितलेल्या धम्म मार्गावर चालायचय की नाही. तुम्ही ठरवलत की धम्म मार्गान जायच तर या धम्म मार्गावर चालताना तुम्हाला वाटल की या मार्गावर चालल्यान माझ कल्याण होत आहे. तर हा कल्याणाचा मार्ग तुम्ही इतरांनाही सांगा. त्या साठी आधी मी सांगितलेल्या धम्म ज्ञानान ज्ञानी व्हा आणि इतरांनाही ज्ञानी करा. जसा दिवा आधी स्वतः जळतो आणि स्वतः पेटल्यावर इतरांना प्रकाश देतो. एक दिवा पेटविला की त्या दिव्यान तो दिवा विझायच्या आत अगणित दिवे पेटऊ शकतो तसे तुम्ही जीवंत असे पर्यंत आगणित लोकांना या धम्म मार्गाच ज्ञान द्या. बुध्दं , धम्मं यावं जीवितं परियंतं सरणं गच्छामी !
तथागत बुध्दांनी अतः दिपः भवः हा महान संदेश, कुठल तरी चुकीच ज्ञान घेऊन प्रकाशित व्हा अस नाही सांगितलय.तथागत म्हणतात या आणि मी शोधलेल्या धम्माच ज्ञान घेऊन ज्ञानी व्हा आणि इतरांनाही ज्ञानी करा. तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार या वाक्याचा अतः दिपः भवः या महान संदेशासोबत काडीचाही संबंध नाही. तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार या वाक्याचा अर्थ आहे जसे जगाल , जसे वागाल, तसे घडाल. अतः दिपः भवः म्हणजे स्वयं प्रकाशीत होणे. आणि मानवाला प्रकाशीत करेल, प्रकाशाकडे नेईल असा या विश्वात एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे तथागत बुध्दांचा धम्म. बाकी सगळे ईश्वरवादी, विषमतावादी, शोषक मार्ग आहेत जे मानवाला अंधाराकडे नेतात. या अशा अंधाराकडे नेणा-या मार्गांचा अनुभव घ्या असे तथागत कसे म्हणतील ! हा साधा विचार आमच्या शिकले सवरलेल्या लोकांना समजला पाहिजे. आपण जे विचार मांडतो ते तथागतांच्या शुध्द विचाराला दुशीत करतात. आणि हे अकुशल कर्म आपणच करतो. हा विषय शब्दांचा किस काढण्याचा नाही. हा विषय आहे तथागतांचा धम्म आपणच नासवतोय याचा. भगवान हा शब्द धम्मात इतका समरस झालाय की तो कितीही पटऊन सांगितला की चुकीचा आहे तरी पटत नाही . अगदी उच्च शिक्षित सुध्दा मान्य करीत नाही. बंधूंनो धम्म नासवण थांबल पाहिजे. जेंव्हा जेंव्हा जे जे धम्म नासवणारं वाटेल ते ते आपण निवडून फेकून दिल पाहिजे. एका श्रामणेर धम्म बांधवाचा आपघात झाला. पायावरून ट्रक गेला. जास्त नाही फक्त टाचेचा भाग चुरा झाला. मला माहीत नव्हत. एका कार्यक्रमात भेटला. लंगडत चालत होता. विचारल तर म्हणाला परमेश्वराची कृपा म्हणून वाचलो. फक्त टाचेवरून ट्रक गेला.मी मनातल्या मनात म्हंटल अंगावरून ट्रक गेला आसता तर कोणाची कृपा झाली असती . एका श्रामणेर बौध्द बांधवाच्या नातवान मुंडण केलेल पाहील. म्हंटल कायरे श्रामणेर शिबीराला बसला होतास का ? तर म्हणाला नाही माझे मामा वारले. त्यांना मुलगा नाही म्हणून मी खौर (मुंडण) केल. बघा धम्म कसा नसवला जातोय. याच साठी मनाची तळमळ आहे. अती शहाणपणा नाही करीत मी. सहन होत नाही म्हणून बोलतो. मी बोलतो म्हणून मलाच टार्गेट केल जात. करू देत. पण मी बोलणार. बोलत राहाणार. जीवात जीव असे पर्यंत. बुध्दं यावं जीवितं परियंतं सरणं गच्छामी ! चा मी निश्चय केलेला आहे. आपल्याला कशाची गरज आहे. आपल्याला काय हवय. याचच आम्हाला भान नाही. आमच्यात असलेला मनुवाद मिसळून आम्ही बुध्द नासवतोय. कळत नकळत. नकळत असेल तर जाणून घ्या आणि सुधार करा ना. पण सुधार करण्या ऐवजी आम्ही चुका काढणारालाच अद्दल घडवतो. त्याला बोलायची संधीच नाकारतो. त्याच्या सोबत वैर भावनेन वागतो. त्याच्या बद्दल समाजात वैरभावना पसरवतो. मी या गोष्टीची पर्वा करीत नाही. कारण यात माझा काहीच स्वार्थ नाही. मी पणा नाही. मला ज्ञानाचा गर्व नाही. जे चुकीच आहे ते निदर्शनास आणतो . जेणे करून पुन्हा ते पेरल जाऊ नये.
पेराल तेच उगवत. हजार पटीन. याच भान आम्हाला कधी येईल. मन फार प्रक्षुब्ध आहे. बेचैन आहे. तथागत म्हणतात वैरान वैर वाढत . मैत्री करुणेनच ते संपत. पण आमचे लोक माझी मैत्री करुणा समजूनच घ्यायला तयार नाहीत. माझ्या मैत्री करुणेलाच वैर समजतात.
असो. भवतुः सबः मंगलमः ! हेच माझ ध्येय्य आहे !
????
वसंत कासारे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!