दलित विद्वानांनो सांगा ना आम्ही कुठल्या राजकीय पक्षात जायचं..??? अबब 52 पक्ष…

बाबा रामटेके
दलित कार्यकर्ते हे सामाजिक काम करता करता आपल्या दलित पॅंथर पासून वेगवेगळ्या असलेल्या चार-पाच आंबेडकरी पक्षाच्या गटांमध्ये काम करीत आहेत.परंतु आपल्या लोकांचा एकच नेता, एकच पक्ष, एकच झेंडा नसल्याकारणाने काही लोक काही कार्यकर्ते आपल्या दलाल नेत्यांना कंटाळून हे इतर पक्षांमध्ये जाऊन काम करतात.आपल्या नेत्यांच्या पक्षातून इतर पक्षात गेल्यानंतर… आपले पक्ष आणि आपले नेते कशाप्रकारे वागतात.ते काय काय उचापती करतात हे स्पष्टपणे दिसून येते.भेजा ओपन होतो.
आपले विद्वान दलित कार्यकर्ते म्हणतात अरे तुम्ही तर त्या बाहेरच्या पक्षात आहात आणि त्या पक्षात राहून तुम्ही आमच्यावर टीका करता…. बाहेर गेल्यानंतर कळते की आपल्या पक्षात आणि इतरांच्या पक्षात काम केल्याने काय दुजाभाव होतो.काय दुरावा निर्माण होतो.आपल्या नेत्यांमध्ये आणि आपल्या पक्षांमध्ये कार्यकर्त्यान मध्ये काय कमतरता आहे हे स्पष्टपणे दिसून येते. म्हणूनच इतर पक्षातील कार्यकर्ता आणि आपल्या पक्षातील कार्यकर्ता याच्यामध्ये किती फरक असतो. आपला नेता आणि इतर नेता याच्यातली उंची आणि विद्वत्ता किती आहे हे कळते.
म्हणूनच बोलावे लागते की इतर पक्षात आणि आपल्या पक्षात कोणत्या गोष्टीची कमतरता आहे त्याची पूर्तता कशी करता येईल हे बाहेर गेलेला कार्यकर्ताच सांगू शकतो.
आपले कार्यकर्ते कम्युनिस्ट पक्षात आहेत आपले कार्यकर्ते काँग्रेस राष्ट्रवादी पक्षात आहेत आपले आत्ता आत्ता काही कार्यकर्ते सेनेत गेलेले आहेत.काही भाजपात गेलेलेही आहेत. (नेते भाजपात गेले नाहीत पण त्यांच्या दरवाजात बांधलेले आहेत.ते चालतं.नेत्यांना कोणी काही बोलायची हिंमत करीत नाहीत.) परंतु हे कोणत्या कारणास्तव या पक्षात गेले याचा अभ्यास याची कारण मीमानसा कोणीही करायला तयार नाही. ती केल्याशिवायच आपले लोक,कार्यकर्ते त्याच्यावर टीका करतात. त्यांना वाळीत टाकल्यासारखे करतात.इतर पक्षात गेलेल्यानी आपल्या लोकांवर, आपल्या नेत्यांवर, पक्षावर बोलू नये.त्यांना कोणताही अधिकार नाही. अशा प्रकारची भूमिका कार्यकर्ते घेतात. हे योग्य आहे का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे.
मित्रांनो अनेक वर्ष आपल्या पक्षात किंवा दलित पॅंथर मध्ये काम केल्यानंतर..आपल्या नेत्यांच्या वर टीका केली,नाराजी व्यक्त केली तरीही आपला नेता कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. आपल्या पक्षात असलेला पदाधिकारी याच्याबद्दल कोणतीही भूमिका घेत नाही. एकच अध्यक्ष 20-20 वर्ष ठेवला जातो. कोणती चळवळ उभी केली जात नाही. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जात नाही.अभ्यास वर्ग घेतले जात नाही. तसेच एखादा कार्यकर्ता जर दुसऱ्या पक्षात गेला किंवा त्याने काम करायचे थांबवले तर त्याची दखल विचारपूस केली जात नाही. आपला नेता साधं लक्षही देत नाही. गेला तर गेला …आला आता आला.. अशा प्रकारचे पक्ष आपले आहेत.
आपले नेते जे आहेत.ते इतर मोठे पक्ष आहेत त्यांच्या दरवाज्यात बांधलेले आहेत त्यांचे गोटी बनून राहतात.तर आमचे नेते जर दुसऱ्याचे गोटी बनून राहत असतील…. तर आम्ही त्या गोट्याची गोटी बनून का राहायचे??? या बाबतीमध्ये कोणीच काही बोलत नाही. या बाबतीमध्ये चर्चाही कोणी करत नाही. परंतु नवीन भक्त, रक्त भक्त कार्यकर्ते फार तिखट प्रतिक्रिया या इतर पक्षात गेलेल्या लोकांच्या बाबतीत करीत असतात.
आपले सर्वच नेते इतर पक्षांशी मांडवली करतात. मोठ्या पक्षाची मांडवली करतात.आणि हे धडधडीत दिसत आहे. परंतु कार्यकर्ता मानायलाच तयार नसतो.तो नेत्यांचीच हुजरे गिरी करतो. नेता दलाली करतो म्हणून खालची कार्यकर्ते दलाली करतात.समाज मुकाट बघतो.
आज आपले 52 पक्ष आणि संस्था संघटना आहेत याची यादी वर्तमानपत्रात आलेली आहे. परंतु या यादी पेक्षाही माझ्या अंदाजाने सत्तरच्या आसपास आपले पक्ष संघटना आहेत. पक्षातून फुटला की तो आपला पक्ष काढतो आणि तो पक्ष, नेता असतो गल्लीतला परंतु दाखवतो अखिल भारतीय पार्टी हे सर्व डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांशी सुसंगत आहे का..??? सर्व पक्षआणि संस्था संघटना झोपडपट्टीत. या सर्व नेत्यांचे अध्यक्ष सेक्रेटरी झोपडपट्टीत. झोपडपट्टीच्या बाहेर शून्य.सगळे एकमेकांचे दुश्मन. नेत्यांनी झोपडपट्या फोडल्या.द्वेष वाढवला.
आज स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली तरी आपल्यावर अन्याय अत्याचार सुरूच आहेत अगोदर पूर्वी खेड्यापाड्यामध्ये अन्याय अत्याचार, बलात्कार, वस्त्या जाळणे,वाळीत टाकणे बहिष्कार टाकणे अशा प्रकारच्या घटना घडत असत. परंतु आता अन्याय अत्याचार शहरांमध्ये व्हायला लागलेले आहेत. याचे प्रथम उदाहरण म्हणजे मुंबईत झालेला रमाबाई हत्याकांड नंतर विद्यार्थी तरुण मुलं यांच्यावर मुली यांच्यावर अत्यंत अत्याचार करून खून झाले.त्यांना न्याय मिळवून दिला नाही परंतु आपल्या नेत्यांनी मांडवली केली. त्यांच्या कुटुंबाची मांडवली आपल्या नेत्यांनी करून दिली. हेही आपल्या लोकांना माहिती आहे.परंतु तरीही आपले कार्यकर्ते अशा नेत्यांचे पाय चाटत असतात.
आपल्या दिसतंय आपला नेता मोठ्या पक्ष्यांची मांडवली करून करोडो रुपयांचा व्यवहार करतो. तरीही आमचा कार्यकर्ता त्या नेत्यांशी व त्याच्या पक्षाशी एकनिष्ठ राहतो हे अधोगतीच लक्षण आहे की नाही??
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराजय आहे परंतु हे लक्षात घ्यायला कार्यकर्ता तयारच नाही. आत्ताची जी लोकसभा झाली या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या लोकांनी मत आपल्या नेत्यांच्या सांगण्याच्या विरोधात लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या संविधान वाचवण्यासाठी सेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस या पक्षाच्या उमेदवारांना भरभरून मतदान केलेल आहे. मग आता आम्ही लोकांनी जर स्वतःहून लोकशाही वाचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना वाचवण्यासाठी जर या पक्षांना मतदान केलं असेल तर … आमच्या मतदाराना आम्ही गद्दार समजावे का.? याच्या बाबतीत आमचे विद्वान कार्यकर्ते स्पष्टीकरण देतील का? याच्या बाबतीमध्ये पूर्णपणे विचारांती आता काय भूमिका घेतली पाहिजे ?आत्ताच्या काळात यावर कोणीतरी स्पष्टीकरण दिले पाहिजे. इतर पक्षांमध्ये गेल्याने आमचा कार्यकर्ता बहिष्कृत गद्दार ठरवावा का यावर विचार केला पाहिजे. इतर पक्षात जावे की न जावे. की आपल्याच नेत्याच्या बरोबर राहून त्यांच्या पक्षात जन्मभर सडावे यावर विचार होणार की नाही..? आणि आमच्या कार्यकर्त्यांची आणि आमच्या लोकांची विचारसरणी आम्ही बदलणार की नाही हे आता कोणीतरी चव्हाट्यावर मांडले पाहिजे.
याबाबतीमध्ये आम्ही एक निर्णय ठरवला पाहिजे आमचे 52 पक्ष असलेल्या नेत्यांना नीट समाजाने वठणीवर तरी आणावे किंवा यांचा राजकीय शेवट…नायनाट तरी करा. यांची दलाली तरी थांबवा.यांना मातीत गाडा. (त्या शिवाय नवीन निर्मिती नाही.) यांना शहरा शहरांमध्ये फिरू देऊ नका. या आमच्या सर्व नेत्यांची नाळ झोपडपट्ट्यांशी तुटलेली आहे हे तरी लक्षात घ्या.यांना अन्याय अत्याचार झाला म्हणजे आनंद होतो. यांना ती पर्वणी असते.
हे सर्व नेते कार्यकर्त्यांची आमच्या लोकांची परस्पर फसवणूक करतात.सर्व समाज निवडणुकीत परस्पर विकतात.वेश्येला विकताना दलाल तिला सांगतो तरी मी तुला विकतो. आमचा नेता सांगत पण नाही..
आम्ही मेंढरं आहोत. नेत्यांचे गुलाम आहोत हे तरी जाहीर करा. पण कोणीतरी बोला ना… सांगा आता आम्ही कुठल्या पक्षात जायचं.तरुणांनी कुठल्या पक्षात जायचं बोला बोला… काही तर बोला…!!
फॉरवर्ड करा….महाराष्ट्रभर…..
पत्रकार बाबा रामटेके 28 मे 2024
8097540506
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत