प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सांस्कृतिक वारसाचालवत असल्याचा सार्थ अभिमान!

  • सूरज रतन जगताप


पिंपरी
दि. २२ सप्टेंबर( प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी अनेकजण पुढे येतात परंतु त्या प्रमाणात त्यांचा सांस्कृतिक वारसा चालविण्यासाठी लोक पुढे येताना दिसत नाहीत. मी मात्र डॉ. बाबासाहेबांनी दिलेला हा बौद्ध धम्माचा सांस्कृतिक वारसा चालवत आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेणी संवर्धक व अभ्यासक सूरज रतन जगताप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक,भीम सृष्टी पिंपरी ( पुणे) येथे केले.
संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूह, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित धम्मलिपी गौरव दिन व अनागरिक धम्मपाल जयंती सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून सूरज जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी आयुष्यमती अर्चना लगड या होत्या.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी अनागरिक धम्मपाल यांचा जीवनपट उलगडून दाखवताना बुद्धगया मुक्ती आंदोलन आणि धम्मपालांनी भारतात बौद्ध धम्म रुजविण्याच्या कामी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. अनागरिक धम्मपालांच्या या योगदानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवर्तीत केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाशी असलेला अन्वयही प्रा. देवडेकर यांनी उलगडून दाखवला.
वंदनीय भदन्त यश यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात ‘ सेव्ह बुद्ध केव्ह ॲन्ड हेरिटेज लेणी संवर्धक पूणे ‘ यांच्या वतीनं लेणी संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी दिला जाणारा ‘ सम्राट अशोक पुरस्कार ‘ या वर्षी ‘संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूह, महाराष्ट्र राज्य’ यांना देण्यात आला. या प्रसंगी ‘सेव्ह बुद्ध केव्ह ॲन्ड हेरिटेज लेणी संवर्धक पूणे’ या संस्थेचे आयु. दीपक गायकवाड, सचिन साठे, संदीप शेंडगे, मनोज जगताप, अभिजित थोरात इ. उपस्थित होते तर संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूहाच्या माया कांबळे, छाया बोरसे, पूजा वैद्य, ज्योती निकाळजे, आप्पा गायकवाड इ. उपस्थित होते. लेणी संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचाही या कार्यक्रमात स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
माजी आमदार गौतम चाबूकस्वार, आयु. शैलेंद्र मोरे, आयु. मिलिंदभाऊ अहिरे इत्यादींचीही या निमित्तानं भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुष्यमती सारिका कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन आयुष्यमती पूजा वैद्य यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूह संस्थेतील सर्वच महिलांनी विशेष मेहनत घेतली होती.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!