महाराष्ट्र महाराष्ट्र का ? -आनंद शितोळे


भारत देश म्हणून अस्तित्वात नसताना शेकडो वर्षापूर्वी वाहतुकीची अत्याधुनिक साधन उपलब्ध नसताना भारताचे दोन ढोबळमानाने भाग होते.
उत्तर भारत आणि दक्खन.
जेव्हा या दोन्ही भागाला विभागणारी सीमारेषा डोंगररांगा आणि जंगल होती ज्याला दंडकारण्य म्हटल जायचं.उत्तर भारतातल्या तुलनेने सपाट प्रदेशाच्या मानाने हा सगळा परिसर दुर्गम.
परकीयांची आक्रमण झाली ती फक्त खैबरखिंडीतूनच झाली का ?
मुघलांच्या आगमनाच्या आधीही अनेक वर्षे दक्षिण भारतात मुस्लीम आणि ख्रिश्चन आलेले होते.त्यांच्या व्यापारी वसाहतीही झालेल्या होत्या.
बहामनी साम्राज्य उभ राहील तश्या नंतरच्या काळात तुकडे होऊन वेगवेगळ्या शाह्या उभ्या राहिल्या.
या सगळ्या काळात उत्तरेतून दक्षिणेत किंवा दक्षिणेतून उत्तरेत जाण्यासाठी सोयीचा मार्ग महाराष्ट्रातून जायचा. साहजिकच पहिला संघर्ष इथेच सुरु व्हायचा.
राज्यकर्ते वेगवेगळ्या भागातले पण युद्धभूमी मात्र महाराष्ट्राची.त्यातून इथल्या स्थानिकांची शेतीसोबत लढाईची , शस्त्र वापरण्याची कला आणि सवय विकसित झाली.मग या लढाईची क्षमता असलेल्यांची कुठल्यातरी बाजूने लढण्याची मांडलिक किंवा वतनदार पद्धत सुरु झाली.
आक्रमण झाली तेव्हा उत्तरेत तुरळक अपवाद वगळता बहुतेकांनी मुघलांशी जुळवून घेतल.हे जुळवून घेण थेट सोयरिकी करण्यापर्यंत झाल.
मुघलांचे राजपूत सोयरे धायरे कलाकुसर असणारे महाल बांधू शकले, टिकवू शकले, वेगवेगळ्या कला विकसित करू शकले त्याच कारण हेच होत.
शांतता.
जिथ ती नव्हती तिथ अस काही झाल नाही.
महाराष्ट्रात सैनिकांचं मनोरंजन करण्यासाठी पोवाडा आला ज्याला डफ सोडून काहीही साहित्य लागत नव्हत.
भरतनाट्यम , कथकली, कुचीपुडी,ओडिसी अस काहीही इथ तयार झाल नाही, रूजल, टिकल नाही त्याची कारण हीच आहेत.
महाराष्ट्रात तुम्हाला अतिभव्य मंदिरांचे संकुल सापडणार नाहीत पण लढाईसाठी उपयुक्त किल्ले सगळीकड सापडतील, डोंगरी किल्ले, समुद्रातले किल्ले आणि भुईकोट सुद्धा.
मोठमोठी मंदिरांची संकुल दक्षिणेत उभारली गेली , दोन दोन हजार वर्षे टिकली कारण दरवेळेला हा आक्रमणाचा जाळ महाराष्ट्राला होरपळून काढत होता आणि इथ लढाया सतत चालायच्या.
उत्तर दक्षिणेत खानपानाच्या अनेक रीतीभाती आहेत, तासनतास शिजवून बनवले जाणारे पदार्थ आहेत.
आपल्याकडे खर्डा , पिठलं भाकरी , हुरडा हे सगळ आहे कारण कमीतकमी वेळेत तयार होऊन पोट भरायला उपयुक्त.अपवाद म्हणून फक्त पुरणपोळी आहे.
या दोन्हीकडच्या साठमारीत आपण का होरपळून निघायचं आणि इथल्या जनतेने पिढ्यानपिढ्या युद्धच का बघायची हा विचार मनात येणारा पहिला द्रष्टा माणूस शहाजीराजे.
त्यांनी रुजवलेल बीज वटवृक्ष झाल ते जिजाऊ आणि शिवरायांच्या रूपाने.
संपूर्ण भारतीय उपखंडात राजांनी राज्य कराव, विलासी जगण्यासाठी रयतेने कर द्यावा, राजांनी महाल,हवेल्या बांधाव्यात आणि सुखनैव आयुष्य काढाव हे सर्वसाधारण असताना स्वराज्य अस पहिलं राज्य होत ज्याच्या केंद्रस्थानी स्वराज्याची रयत होती.
छत्रपतींच्या आयुष्यातले नाट्यमय प्रसंग बाजूला ठेवा, प्रशासकीय आज्ञापत्र, धोरण आणि सैन्यासाठीचे नियम नीट समजून घ्या.
स्वराज्यसूत्र म्हणजे रयतेच आयुष्य सुखकर बनवणे.
हा स्वराज्याचा पाया आणि धोका ओळखणारा धोरणी माणूस म्हणजे आलमगीर औरंगजेब.
साठीपार झाल्यावर सगळा खजिना, सैन्य आणि सर्वस्व पणाला लावून स्वराज्य बुडवायला आलेल्या औरंगजेबाला हा धोका माहिती होता.
तरीही दोन्ही छत्रपती गेल्यावर इथल्या माणसांनी जवळपास निर्नायकी अवस्थेत स्वराज्य फक्त टिकवल नाही तर औरंगजेब पराभूत केला.लढाया जिंकूनही युद्ध जिंकू न शकलेला औरंगजेब शेवटी दक्षिणेत मरून गेला.
महाराष्ट्र कलेच्या बाबतीत, भव्य वास्तुरचना असलेली देवळ , महाल , नृत्यप्रकार , व्यंजन याबाबत जवळपास निरंक का आहे याच कारण हेच आहे.
जेव्हा या गोष्टीवरून कुणी संपूर्ण भारतात तुम्हाला हिणवणार असेल तर फक्त एवढच उत्तर द्या.
शिवजयंतीच्या दिवशी Sharad Patil पाटलांनी पोस्ट लिहिली त्यावरून सुचलेलं.
आनंद शितोळे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत