निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

आपले मत वाया जात नाही..!

आंबेडकरी, रिपब्लिकन, वंचीत च्या समर्थकांना, निवडणूक काळात एक गोष्ट हमखास खोटे बोलली जाते, की तुम्ही दिलेले vote वाया जाते… परंतु तुम्ही काँग्रेसला किंवा बीजेपीला मत दिले तर वाया जात नाही… हे साफ खोटे आहे कारण त्यांना आंबेडकरी रिपब्लिकन वंचीत बहुजन पक्ष यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्यापासून रोकण्यात येते… मायावतीला सुध्दा घरी बसवून ठेवण्यात आले, फक्त प्रेस कॉन्फरन्स leader बनवुन ठेवले, आणि वंचितला सुद्धा असेच नामोहरम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे… कारण त्यांना माहीत आहे, एक आंबेडकर भारी पडला म्हणुन पुन्हा दुसरा आंबेडकर होऊ द्यायचा नाही… त्यासाठी आपलेच काही पिलावळ वापरली जातात… आणि म्हणतात वंचितला मत दिले तर वाया जाते…

वंचीतला मत देण्याचे फायदे…

१) २०१९ मध्ये तिसरी आघाडी होती म्हणुन ९.५% म्हणजेच ४५ लाख मत पडले तरी राज्य पक्ष म्हणुन मान्यता मिळाली नाही… परंतु यावेळेस स्वयंबळावर आहोत मागच्या पेक्षा जास्त मते मिळाली तर आपण नक्की राज्य पक्ष होऊ शकतो…
२) राज्य पक्ष बनण्यासाठी किमान ६% च्या वर मते असावे.
३) स्वतःचे पक्ष चिन्ह मिळते.
४) निवडणुक आयोगात आपले प्रतिनिधी पाठवु शकतो, मीटिंग ला हजर राहू शकतो.
५) आंबेडकरी विचारांचे पक्ष म्हणुन स्वतःची लोकशाही संविधानिक विचारधारा स्थापित करता येतो.
६) राज्य ते ग्रामपंचायत पर्यंत पक्ष वाढविण्यास मदत होते.
७) इतर समाजाचे प्रतिनिधी आमदार खासदार निवडून आणण्यास मदत होते.
८) संविधान प्रखरतेने अमलांत आणता येते.
९) आंबेडकरी विचारानुसार देशाची अर्थव्यवस्था सुधारता येईल…
१०) आंबेडकरी विचारानुसार गरिबी निर्मूलन, स्त्री सन्मान व अधिकार, युवा, बेरोजगार, ज्येष्ठ नागरीक योजना राबविता येतील.

तर मग आता लक्षात ठेवा, एवढे फायदे आपल्या पक्षाला मिळत असेल तर आपल्याच चमच्यांना फोडून आपल्याच विरुद्ध काँगेस, शरद पवार, बीजेपी पक्ष राबवून घेऊन आपला वंचीत कसा काय मोठा होऊ देतील…

पुन्हा एक म्हणजे आपल्याला पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, जावई रॉबर्ट वढेरा चालतो…
आपल्याला लालू यादव, तेजस्वी यादव चालतो…
आपल्याला मुलायम सिंग यादव, अखिलेश यादव काका मामा चालतो…
आपल्याला शोभाताई फडणवीस, देवेंद्र फडणवीस, चालतो…
आपल्याला मुंडे परिवार चालतो
आपल्याला शिंदे परिवार चालतो..
आपल्याला विलासराव देशमुख, नारायण राणे परिवार चालतो…
आपल्याला ठाकरे परिवार चालतो… पवार परिवार चालतो…
पण संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर, यशवंत आंबेडकर, प्रकाश आंबेडकर चालत नाही, ही आपल्या आंबेडकरी रिपब्लिकन वंचीत बहुजन समाजातील लोकांची शोकांतिका आहे…

आपले मत कोणत्याही परिस्थितीत वाया जात नाही… आपल्यातील ताई आणि भाऊ यांच्या पासुन सावध रहा… ते फक्त पक्ष फोडी आणि इकडून तिकडे, तिकडून इकडे आणि पक्ष गट प्रमुख बनण्यासाठी राजकारणात आले आहे… करिता कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता आंबेडकरी रिपब्लिकन वंचीत बहुजन पक्षाला भरभरून मते द्या… आणि वंचीतला राष्ट्रीय पक्ष बनवा…????????
आपला
शाम भारसाकळे
जिल्हा उपाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मो 9403409777

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!