बीजेपीचा राम मंदिराच्या नावाने पुन्हा गोधरा घडवण्याचा कट- उद्धव ठाकरे

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार आणि भाजपावर सडकून टीका केली. राम मंदिराचा सोहळा १ जानेवारीला घेत आहेत,”बीजेपीचा राम मंदिराच्या नावाने पुन्हा गोधरा घडवण्याचा कट असा उद्धव ठाकरे यांचा घणाघात . तसेच दोन नेत्यांचा उल्लेख करत राम मंदिराच्या कार्यक्रमावेळी दंगली पेटवल्या जातील, असा गंभीर आरोप केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “तमाम हिंदूंनी आणि देशातील सर्व लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पाकिस्तानवरील हल्ला हे ढोंग होतं हे कळलं. सर्वात भयानक म्हणजे यांनी काहीही न करता राम मंदिर उभारलं जात आहे. कारण बाबरी यांनी पाडली नाही, राम मंदिराचा आदेश यांनी दिला नाही, तो न्यायालयाने दिला. पैसे लोकांनी दिले. आता आणखी काही पैसे सरकार देत आहे.”
आणि पुन्हा एकदा धार्मिक वाद पेटवून हे सत्तेत येतील”
“हे त्या मलिक आणि मोईत्रा यांचं मत आहे, माझं नाही. पुन्हा आपलं तेच होणार, गोरगरिबांच्या घरांचा सत्यानाश, राखरांगोळी होईल आणि पुन्हा एकदा धार्मिक वाद पेटवून हे सत्तेत येतील. सबका साथ सबका विकास झाल्यावर सबको लाथ, दोस्तों का विकास होईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत,” असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत