निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

मवीआ ने दिलेला ४ जागांचा प्रस्ताव वंचित कडून परत; २६ तारखे पर्यंत वाट पाहणार – प्रकाश आंबेडकर

येत्या 26 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू. तोपर्यंत जर काही निर्णय झाला नाही तर त्यानंतर पुढील दिशा ठरवू अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडी चे प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

मविआने दिलेल्या 4 जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो. मी त्यांना 4 जागा परत देतोय. पण अधिकृतपणे प्रत्यक्षात ते 3 जागा देत आहेत असे मत प्रदर्शित केले.

२६ तारखेनंतर आमची जी काही भूमिका असेल ती सर्वांसमोर जाहीर करु”, असा अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. “महाविकासआघाडीच्या तिढ्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. तुम्ही त्याबद्दल त्यांनाच विचारा. प्रकाश शेंडगे यांनी एक नवीन पक्षाची नोंदणी केली आहे. त्यांनी एक यादी आमच्याकडे दिली आणि त्यावेळी युतीबद्दल चर्चा केली. यावेळी मी त्यांना आमचंच घोंगड महाविकासआघाडी सोबत भिजत पडलेला आहे. ते मिटल्याशिवाय आम्ही काहीही बोलू शकत नाही किंवा यावर अंतिम निर्णय घेऊ शकत नाही. आमची दीड तास चर्चा झाली. त्यात कोणकोणते मतदारसंघ मागत आहे, का मागतात याची माहिती घेतली”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!