देशमहाराष्ट्रमुख्यपान

तिहार जेलमध्ये क्षमतेपेक्षा पाच पट कैदी. गुन्हा सिद्ध झालेल्यांपेक्षा कच्चे कैदीच जास्त !

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, बीआरएस नेत्या के कविता आदी नेते व काही महत्वाचे लोकही आशिया खंडातील सर्वात मोठी जेल असलेल्या तिहार तुरुंगात मुक्कामी आहेत. तिहारमध्ये क्र १ ते ९ असे मोठे तुरूंग आहेत. व्हीआयपी कैद्यांना वेगळ्या तुरूंगात ठेवले जात असले तरी गजाआड भर दिवसा खून होण्याच्या घटनांमुळे त्यांच्याही सुरक्षेबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत.

तिहार कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा पाचपट अधिक कैदी आहेत. कैद्यांना आंघोळ करण्यासाठी आणि शौचालयात जाण्यासाठीही रांगेत उभे राहावे लागते व त्यातून भांडणे होतात. कैद्यांना झोपायलाही जागा मिळत नाही.

तिहारमधील एका तुरुंगात कैद्यांना ठेवण्याची क्षमता साडेसातशेच्या आसपास आहे. मात्र एकेका कारागृहात साडेतीन हजारांपेक्षा जास्त कैदी आहेत. ही संख्या तुरूंगाच्या क्षमतेच्या पाचपटीने जास्त आहे. कोरोना काळात अंतरिम जामीन आणि पॅरोलवर सुटलेले ४००० हून अधिक कैदीही लवकरच आत्मसमर्पण करतील तेव्हा तिहारमधील गर्दी आणखी वाढून परिस्थिती दयनीय होईल असे अधिकाऱ्यांचे मत आहे. तिहारचे निवृत्त महासंचालक संदीप गोयल यांनी येथील कैद्यांची बहुसंख्या व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबत केंद्राला पत्र लिहिले होते. तिहारमध्ये एकूण १४,८०० कैदी आहेत व कायम कर्मचारी फक्त १९०० व प्रतीनियुक्तीवरील ९७३. अजूनही किमान ९४४ पदे रिक्त आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!