नामांतर चळवळीचा संघर्षशील योद्धा आणि कार्यकर्ते-नेते घडवणारं विद्यापीठ शांत झालं..!

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा वारसा समर्थपणे चालविणारे पँथर गंगाधरजी गाडे यांचे आज निधन झाले.पॅंथर गंगाधरजी गाडे साहेब यांच्या जाण्याने फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.साहेबांच्या आक्रमकते मुळेच येथील बहुजन,शोषित,वंचित पिढी त्यांची पाळं मूळ घट्ट होत गेली, बहरली,सुखाची फळ चाखत आहे.साहेबांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेला संघर्ष हा कोणीही नाकारू शकत नाही.विदर्भातून औरंगाबादेत आलेल्या या पॅंथरने आयुष्यभर समाजाला न्याय देण्याचं काम केलं.आपल्यातील नेतृत्व कौशल्याने समाजातील अनेक तरुणांना घडवले.समाजातील अनेक नेते साहेबांच्या छत्रछायेतच वाढले,मोठे झाले. समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर लढण्यासाठी हा पॅंथर सदैव पुढे असायचा.राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ उभारून आयुष्यभर केलेल्या या कार्यामुळे सदैव समाज मनात घर करून राहील.
आज दिनांक ०४ मे २०२४ रोजी सकाळी ०४:३० वाजता गंगाधरजी गाडे यांचे निधन झाले.
त्यांचे पार्थिव रविवार दिनांक ५ मे रोजी दुपारी १२ ते ०४ या वेळेत उस्मानपुरा,पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच रविवारी ४ वाजता अंत्यविधी केला जाणार आहे.
नामांतराच्या या लढावू योद्ध्यास अखेरचा क्रांतिकारी जयभिम !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत