विठ्ठल कारखाना वरील कारवाई ने भाजपचा राक्षसी चेहरा उघड ..!

सुडात्मक कारवाया करणे हीच का भाजपा ची रणनीती?
ॲड अविनाश टी काले , अकलूज
मो न :- 9960178213
स्व कर्मवीर औदुंबर अण्णा यांनी विठ्ठल परिवाराचे सहकारातील रोपटे पंढरपूर तालुक्यात लाऊन सभासद शेतकऱ्यांचा सहकाराचा राजवाडा उभा केला ,
या कारखान्याच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांचे संसार फुलले , बहरले , पण विठ्ठल सहकारी सा कारखाना आणि त्यामागील आर्थिक अडचणी यांचा मेळ अद्याप ही सुटत नाही .
या कारखान्यास गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी अगदी तरुण व कार्यक्षम असा नेता अभिजित पाटील यांच्या रूपाने मिळाला , त्यांनी झंझावात निर्माण करून निवडणुकीत वादळ निर्माण केले ,
अभिजित पाटील यांचे नाव जिल्हा सीमा तोडून महाराष्ट्रात गाजू लागले
माझे राजकीय आणि सामाजिक सबंध हे समग्र महाराष्ट्रातील उच्च स्तरीय नेत्यांशी आहेत आणि यातील कित्येकांच्या संपर्कात व्हॉट्सॲप चे माध्यमातून विचाराची देवाणघेवाण होत असते .
माजी आमदार कॉम्रेड माणिकराव जाधव यांनी ही माझ्या कडे अभिजित पाटील यांची चौकशी केली होती .
अभिजित पाटील हे चेअरमन बनण्या पूर्वीच कारखाना कर्जात बुडालेला होता . त्याचे खोलात जाण्या इतपत माझ्या कडे माहिती नाही आणि तो आपला विषय ही नाही .
या कारखान्यावर 277कोटी रुपयांचे कर्ज आणि त्यावरील व्याज 177कोटी असे जवळपास 444कोटी कर्ज थकीत आहे .
आणि याच्या वसुली साठी राज्य सहकारी शिखर बँकेने विद्यमान संचालक मंडळाला दोषी धरून त्यांचे विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे ही पत्र पोलीस स्टेशन ला दिले आहे .
कर्ज वसुली प्राधिकरण कडे दाद मागत कारखान्याची तीन साखरेची गोडावून सिल करण्यात आली आहेत आणि ही सर्व कारवाई दिनांक 26एप्रिल 2024रोजी करण्यात आली आहे , जेंव्हा करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक अध्यक्ष शरद चंद्र जी पवार साहेब त्यांच्या पक्षाचे माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार धैर्यशील जी मोहिते पाटील यांच्या प्रचाराची सभा घेत होते .
याच सभेत चेअरमन अभिजित पाटील ही उपस्थित होते .
या ही पुढे जाऊन कारखान्याची स्थावर मालमत्ता जप्त करण्या ची 7दिवसाची मुदत असलेली नोटीस ही बजावण्यात आलेली आहे , आणि ही जप्ती ची कारवाई टाळायची असेल तर किमान 125कोटी रुपये भरावे लागतील .
साखर पोती असलेली गोडाउन सिल करून ते रीकव्हरी मागत आहेत ,
थोडक्यात हात आणि तोंड बांधून ते वसुली करू पाहत आहेत ,,,,,,,
चालू गळीत हंगामात कारखान्याने 10लाख 88हजार मेट्रिक टन इतका ऊस गाळप केला आणि सोलापूर जिल्ह्यात प्रति टन 3000रुपये विक्रमी दर शेतकऱ्यांना जाहीर केला .
संचालक मंडळाने स्वतः चे जमीन जुमले गहान टाकून शेतकऱ्यांची देनी दिली होती आणि कारखाना सुरुळीत चालू केला होता .
भाजप चे अंध भक्त यावर टीपंन्नी करतील की बँकाचे कर्ज वसुली करणे गैर आहे काय?
आपणाला आठवत असेल मागच्या कांहीं महिन्या पूर्वी अर्थ खाते सांभाळणाऱ्या ना अजित दादा यांनी अशा अडचणीतील सहकारी साखर कारखान्यास कर्ज देताना संचालक मंडळाने त्यांच्या खाजगी प्रॉपर्टी तारण म्हणून ठेवण्याचे सुचवले होते , आणि इतकेच नाही तर कर्जास संचालक मंडळ व्यक्तिगत रित्या जबाबदार धरण्याची अट ही त्यांनी टाकली होती ,
अर्थात उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी त्यास वाटण्याच्या अक्षदा लाऊन , ज्या संस्था अजित दादा यांनी रोखून धरल्या होत्या त्यांना कर्ज देण्यास सांगितले ,
आत्ता प्रश्न इथे हाच येतो की , याच प्रकरणात इतक्या तातडीने गुन्हे दाखल करण्याची पत्रे , गोडाऊन सिल करण्याची कृती , आणि कारखान्याची स्थावर मालमत्ता जप्ती ची नोटीस का आली?
याचे कारण आहे , भाजपा आणि त्यांचे सुड बुध्दी चे राजकारण ,,,,!
देवेंद्र फडणवीस हे आधुनिक युगातील परशू राम आहेत , आणि सीबीआय , ई डी , इन्कम टॅक्स ही त्यांच्या हातातील आधुनिक परशू आहेत .
महाराष्ट्रातील सहकाराचे माध्यमातून सामाजिक , आर्थिक , राजकीय वर्चस्व स्थापित केलेल्या क्षत्रिय मराठा सत्तेला गुलाम बनवायचे असेल तर , 1),,,,,,,,अश्या सत्तेतील भागीदार घटकांना एकमेकाचे विरोधात लढाया करण्यास प्रोत्साहन देणे .
2),,,,,,,प्रसंगी घरे फोडून बहिणीच्या विरोधात भाऊ , भावाच्या विरोधात भाऊ , चुलत भाऊ विरुद्ध चुलत भाऊ , अशा अंतर्गत युद्धाला तोंड फोडून त्यांना कमजोर करणे
3),,,,,,, केंद्रीय तपास यंत्रणा , आर्थिक गुन्हे , यात अडकवून चौकशीचा ससे मिरा त्यांच्या मागे लावणे
केंद्रीय सहकार मंत्रालयाची निर्मिती आणि या खात्याचा कारभार केंद्रीय गृहमंत्री अमित जी शहा यांनी स्वतः कडे घेणे याचा अर्थ हाच होता की
महाराष्ट्रातील मराठा सत्तेचा प्राण सहकाराच्या पोपटा त आहे , तो पोपट स्व अंकित करणे किंवा त्याची मान मुरगाळून या मराठा सत्तेचा विनाश घडवून आणणे .
मोहिते पाटील , हर्षवर्धन पाटील , कल्याणराव काळे , यांनी कांहीं काळ भाजप मध्ये गेल्याने स्वतः चे संस्थांचा बचाव केला ,
पण याच आधारे फक्त दमन शक्तीचे आधारे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याच्या कृतीला मोहिते पाटील यांनी आव्हान दिले .
या लढाया लढण्याची तयारी मराठा शासकांनी ठेवणे अगत्याचे झाले आहे ,
आणि या सार्वत्रिक युद्धात भाजपला हटवण्याचे धारिष्ट्य ही दर्शवणे अगत्याचे झाले आहे ,
भाजपा कोणताही शिष्टाचार , विधी निषेध पाळत नाही , ती कमजोर असते तेंव्हा ही खोड्या काढून समाजाचे जातीय धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणते , आणि समाजा अंतर्गत युद्ध पेटवत राहते
ती शक्तिशाली आणि सत्तेने मद मस्त होते तेंव्हा अधिक आक्रमक बनून सर्वांना गुलाम बनवू पाहते , त्या साठी रात्र असो की दिवस ते कारस्थान करत राहते ,
याचे कारण हा पक्ष आणि त्याचा जनक असलेला संघ परिवार आणि या सर्वांचा जनक असलेला रेशीम बागेचा अनुयायी सनातनी ब्राम्हणी मेंदू हाच राक्षसी आहे , आणि त्याचा चेहरा 2024 चे लोकसभा निवडणुकीने उघड केलेला आहे ,
महाराष्ट्रात भाजपा हरत आहे हे लक्षात येताच या कारवाया कडक केल्या जात आहेत , आणि यातून कोणीच सुटणार नाहीत , जे त्यांचे समर्थक आहेत ते सुपात आहेत , तर त्यांचे विरोधात असणारे जात्यात आहेत ,,,,
मराठा सत्तेला भरडून काढणे हीच त्यांची रणनीती आहे , म्हणूनच सत्तेच्या माध्यमातून उपलब्ध असणाऱ्या कायद्याचा वापर करून कारवाया केल्या जातील ,
वर करणी कायदेशीर वाटणारी कृती मात्र सुडात्मक आहे हे कोणीच नाकारणार नाही ,
यातून मार्ग काढायचा आहे , ही निवडणूक हरून चालणार नाही ,
भाजपच्या सुडात्मक कारवाईचा जबाब
“धैर्यशील जी मोहिते पाटील ” यांचा विजय हेच आहे
त्या साठी हातात तुतारी घेतलेल्या माणसाच्या चित्रा समोरील बटण हे दाबावेच लागेल.
आपला सहकारी
एडव्होकेट अविनाश टी काले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत