निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयसामाजिक / सांस्कृतिक

जनतेचे “मन के सवाल..!”

मोदी समर्थक, कार्यकर्ते आणि नेते यांना माझे काही प्रश्न –

१. मोदी सत्तेत येण्यापूर्वी म्हणाले होते की बाहेरच्या देशातील सगळा काळा पैसा परत भारतात आणू आणि त्यातील काही रक्कम प्रामाणिक कर दात्यांमध्ये वाटू. तर गेल्या दहा वर्षात किती काळा पैसा मोदींनी परत भारतात आणला? आणि किती लोकांना तो पैसा वाटला?

२. २०१९ साली पुलवामा हल्ला होऊन अनेक जवान शहीद झाले. या पुलवामा हल्ल्याचा तपास नक्की कुठपर्यंत आलाय? आत्ता पर्यंत नक्की किती लोकांना अटक झालीये? ज्यांच्या हलगर्जी पणामुळे हल्ला झाला अशा किती अधिकाऱ्यांवर कारवाई केली?

३. मोदी सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते. आज २०२४ मध्ये तरी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालंय का? शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव देणार होते मोदी सरकार. त्याच काय झाल? कांद्या सारख्या मालावर निर्यातबंदी सारखे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे निर्णय मोदी सरकार का घेते?

४. २०१४ साली क्रूड ऑइल ९३ डॉलर प्रति बॅरल असताना भारतात पेट्रोल ७३ रुपये लिटर होत. आता क्रूड ऑइल ७७ डॉलर प्रति बॅरल असताना भारतात पेट्रोल १०५ रुपये लिटर आहे. २०१४ साली ४०० रुपये असणारा गॅस सिलेंडर आज ११०० रुपये आहे. बाकी सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत. या महागाईला जबाबदार कोण?

५. २०२४-२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे लक्ष्य मोदी सरकारने ठेवले होते. आज भारताची अर्थव्यवस्था ३.७ ट्रिलियन डॉलर आहे. मग असे अवास्तव लक्ष्य देऊन लोकांना भुलवण्याचे काम मोदी सरकार का करते?

६. २०१४ पूर्वी जेव्हा १ डॉलर = ६२ रुपये होते तेव्हा मोदी म्हणत होते की पडणाऱ्या रुपयाचे कारण काँग्रेस सरकार आणि त्यातील भ्रष्टाचार आहे . मग आज जेव्हा १ डॉलर = ८३ रुपये आहे तेव्हा याला जबाबदार कोण?

७. २०१६ मध्ये मोदींनी तथागतीत काळा पैसा बाहेर काढण्यासाठी अचानक डिमॉनिटिझेशन (निश्चलीकरण) ची निर्णय घेतला आणि पूर्ण देशाला रांगेत उभं केलं. अलीकडेच सर्वोच्च न्यालालायच्या न्यायाधीशांनी असे मत नोंदवले की हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आणि अवैध होता आणि त्यामुळे काळा पैसा पांढरा व्हायलाच मदत झाली. मग या निर्णयाचा नक्की फायदा काय झाला? आणि कोणाला झाला?

८. इलेक्टरॉल बाँड मधे एकट्या भाजप ला ६५६५ करोड म्हणजे एकूण देणगीच्या ५५ टक्के का भेटले? काही कंपन्यांना जेवढा फायदा नाही त्यापेक्षा जास्त रक्कम त्यांनी देणगी म्हणून बीजेपीला का दिली असेल?

११. मणिपूर मध्ये हिंसाचार भडकला असताना मोदींनी एकदाही तिकडे भेट का दिली नाही? लडाख मध्ये अनेक लोक त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करत असताना त्यावरही मोदी काहीच का बोलत नाहीत. जाहिरात देताना मात्र मोदींनी रशिया युक्रेन युध्द थांबवलं असा खोटा प्रचार का करता? हे धादांत खोट आहे अस स्वतः परराष्ट्र मंत्रालयानेच सांगितल आहे.

१२. मोदी म्हणतात ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ मग भाजपने ज्यांच्यावर पूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच तुम्ही तुम्हाच्या पक्षात अथवा तुमच्या बरोबरी युती मध्ये कस काय घेतलं? उदा. अजित पवार- ७० हजार कोटी सिंचन घोटाळा, अशोक चव्हाण- आदर्श घोटाळा, छगन भुजबळ – महाराष्ट्र सदन घोटाळा आणि इतर अनेक नेते

९. मोदी सत्तेत येण्यापूर्वी म्हणाले होते दरवर्षी २ करोड रोजगाराच्या संधी निर्माण करणार. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने किती रोजगाराच्या संधी निर्माण केल्या?

१०. कोरोना काळात मोदींनी पंतप्रधान सहायता निधी असताना पीएम केअर फंड का उघडला? यात नक्की किती पैसा जमा झाला आणि तो कुठे खर्च झाला?

  • विनोद थोरात, पुणे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!