निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

कार्यकत्यांनो सावधान…….

महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
शनिवार दि. २० एप्रिल २०२४.
मो.नं. 8888182324

           देशात सर्वात मोठ्या उत्सवाला म्हणजेच लोकसभा निवडणूकीला सुरवात झाली आहे. निवडणूक म्हटले की राजकीय पक्षांना सर्वात प्रथम कार्यकर्तांची गरज भासते. कार्यकर्ताचा वापर कडीपत्त्यासारखा केला जातो. हमाली करायची असेल तर सगळ्यात आधी त्यालाच पुढे केले जाते आणि मलई खाण्याची वेळ आली की सगळ्यात आधी त्यालाच बाहेर काढले जाते. म्हणजेच कार्यकर्ता हा Use & Throw असतो, वापरा आणि फेकून द्या. अशी निती वापरली जाते असो.

           तर निवडणूका सुरु झाल्यामुळे कार्यकर्त्यांची लगबग सुरु झाली आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. उमेदवाराचा प्रचार, मेळावे, रॅली, आणि मतदानापुर्वी मतदार याद्या चाळणे, मतदारांपर्यंत पोहचणे, घराघरातून मतदार मतदानासाठी बाहेर काढणे इत्यादी महत्त्वाची कामे कार्यकर्त्यांकडून करुन घेतली जातात. यासाठी कार्यकर्ता आपले सर्व कामधंदे बाजूला ठेऊन नेत्यासाठी दिवसरात्र राबत असतो. यासाठी कार्यकर्त्यांना चिरीमिरी आणि मतदानाच्या दिवसापर्यंत ओली पार्टी दिली जाते. कार्यकर्ताही इमानेइतबारे आपले कर्तव्य पार पाडत असतो. निवडणूकीत हे साधारणतः नेहमीचे चित्र आहे. 

           मात्र, यावेळेची निवडणूक देशात वेगळ्या स्वरूपाची आहे. हुकुमशाही विरुध्द लोकशाही अशी ही निवडणूक आहे. गेल्या १० वर्षात भाजपने जी दडपशाही चालविली आहे. त्या विरोधात ही निवडणूक आहे. प्रत्येक क्षेत्रात केंद्रातील भाजप सरकारला अपयश आलेले आहे. तसेच समाजातील प्रत्येक घटक नाराज आहे. शेतकरी हमी भाव नसल्याने, व्यापारी GST ने, सुशिक्षित तरुण वर्ग नोकरी नसल्यामुळे, महिला वर्ग महागाईमुळे त्याचबरोबर महिलांवर अत्याचाराच्या घटनांमुळे, तसेच भाजप खासदारांच्या संविधान बदलण्याच्या सततच्या वक्तव्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे.  

           सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्रातील भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर करुन विविध कंपन्यांकडून निवडणूक लढण्यासाठी "निवडणूक रोखे" (Electoral Bond) हि योजना आणून हजारो करोड रूपये मिळविले आहेत. त्याचबरोबर कोरोना काळात P.M.Care Fund च्या माध्यमातून लाखो कंपन्यांकडून हजारो करोड रुपये मिळविले आहेत. हा देशाचा पैसा असतानाही माहिती अधिकार कक्षेच्या बाहेर या विभागाला ठेवले आहे. भाजपने इलेक्टोरल बाॅण्ड आणि पी.एम.केअर फंड या दोन्हीच्या माध्यामातून मिळविलेला हजारो करोड रूपयांचा चंदा या निवडणुकीत वापरायला सुरूवात केली आहे. "त्यामुळे कार्यकर्त्यांनो" भाजपच्या विरोधात उभा असलेला उमेदवार हा पैशाने कमजोरच असणार आहे. थोड्याशा पैशाला (पाकिटाला) बळी पडू नका. त्या एकवेळच्या पैशावर तुम्ही आयुष्य काढू शकणार नाहीत. विरोधी उमेदवार पैशाने कमजोर जरी असला तरी त्याकडे दुर्लक्ष करुन त्याचेच काम करा. कारण, तुम्हाला संविधान वाचवायचा आहे देश वाचवायचा आहे. संविधान बदलले तर तुमचे आमचे सर्वांचेच स्वातंत्र्य धोक्यात येणार आहे. लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाहीचा उदय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो या निवडणूकीत आपली सदसदविवेक बुध्दी जागृत ठेऊन पक्षाची कामे करा. तुमच्या मुलांचे भविष्य आता तुमच्याच हातात आहे. म्हणून त्यानुसारच निर्णय घेऊन निवडणुकीची कामे करा. तूर्तास इतकेच.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!