भीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

नाच गाणे, डिजे, भोजन, केक, समाजाकडून खंडणी, जल्लोष यांना तिलांजली देत बीडीएसपी संघाने साजरी केली बाबासाहेबांची वैचारिक जयंती..!

नागपूर : क्रांतीसुर्य नगर, काटोल रोड येथील बीडीएसपी संघाच्या मैदानावर शेकडोंच्या उपस्थितीत हा मौज मस्तिचा दिवस नसुन जबाबदारीचा दिवस आहे, याच भावनेने समस्त नागपुरकरांना संदेश देत अत्यंत चिंतनातुन ही जयन्ती साजरी करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी सुद्धा साधुवाद देत बीडीएसपी संघाची प्रशंसा केली.
डॉ. गजानन काकड( गुरुदेव सेवा) मंडळ , अभय वैद्य ( संभाजी ब्रिगेड), अंबर सहारे (भारतीय बौद्ध महासभा), सखाराम मंडपे (सामाजिक जाणीव असलेले), तसेच विनायक पराते (आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटणारे ) या सर्व मार्गदर्शक मान्यवरांनी आप आपल्या केलेल्या मार्गदर्शनातुन चुकिच्या पद्धतीने सुरू असलेल्या बाबासाहेबांच्या जयन्तीला आजपर्यंत कोणत्याच संघटनेने उघड उघड विरोध केलेला नाही.म्हणुनच ६८ वर्षांनंतरही आंबेडकरी समाज ना तर एकत्रित आला व ना हा समाज बाबासाहेबांच्या दृष्टीतील आदर्श समाज होवु शकला . पण आम्ही बीडीएसपी संघाच्या कार्यप्रणाली वरून हे जाणले की चुकीच्या पद्धतीला विरोध करणारी ही खरोखरच एकमेव धार्मिक संघटना आहे.या संघाच्या हिंमतिचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमिच आहे .
समाजाला प्रबुद्ध करण्याचा यांनी,” धम्म आपल्या घरी” हा जो मार्ग पत्करला आहे तो तर अदभुत आहे. कोणी पुजो की निंदो याची तमा न बाळगता सातत्याने मागील १७ वर्षापासून कार्य करितच राहणे हाच खरा पुरुषार्थ आहे व तो बीडीएसपी संघातच आम्ही बघत आहो हे सर्वांनी मान्य केले.
आम्ही सर्व बीडीएसपी संघासोबत आहोत याचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.
बीडीएसपी संघाची भूमिका मांडताना प्राध्यापिका सरोज वाणी यांनी हे स्पष्ट केले की बाबासाहेबांच्या दृष्टीतील अंधश्रद्धा मुक्त आदर्श समाज निर्माण करणे हे एकमेव ध्येय या संघाचे आहे व यापेक्षा ईतर कोणतेच कार्य श्रेष्ठ होवु शकत नाही त्यामुळे या संघाला समाजाने समजून घ्यावे हे आव्हान सुद्धा त्यांनी उपस्थितांना केले.
डॉ निरज बोधी यांनी मात्र अजुनही खूप काम करणे शिल्लक असल्याची खंतही व्यक्त केली. १७ वर्ष म्हणजे खुप मोठा कालावधी नाही. पिढी दर पिढी हे कार्य सुरूच राहीले पाहिजे याची काळजी बीडीएसपी संघाने घ्यावी असा सल्ला सुद्धा त्यांनी आपल्या मार्गदर्शनात दिला.
अक्षरा प्रशांत काळबांडे व साची सायरे यांनी संवादातून बाबासाहेबांचा संघर्षमय प्रवास मांडला. हा त्यांचा प्रयोग मुलांना बाबासाहेब समजण्यासाठी प्रभावी सिद्ध झाला.
स्वरा प्रशांत काळबांडे हिने ईंग्रजीतुन बाबासाहेबांचे कार्य उपस्थितां समोर मांडले.
जीवीका जय गायसुन्दंरे हिने पाली भाषेतिल पंच शील साधे मराठीत करून सांगितले.
शालवी निरज बोधी हिने बाबासाहेबांचा आदर्श मुलांनी आपल्या डोळ्यासमोर सदैव ठेवावा म्हणजे आपल्याकडुन त्यांचा खरा आदर होईल हे सांगितले.
शृतिका गुरुदेव लाढे हिने पाली भाषेत असलेल्या धम्म पालन गाथेला शुद्ध मराठीतुन व्यक्त केले.
शैलेजा गेडाम ताईंनी चुकीच्या चाली रिती बन्द करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
प्रशांत काळबांडे सरांनी या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार बहुजनांपर्यंत पोहचविण्याचे कुशल कार्य करित आपल्याला सर्वांना जोडण्याचे श्रेष्ठ कार्य करावेच लागेल हे निष्ठुन सांगितले.
डॉ आनंद गजभिये यांचा सत्कार सुद्धा त्यांच्या शासकीय सेवेतुन झालेल्या निवृत्तीच्या अनुषंगाने करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुद्धा त्यांनीच सांभाळले.आभार प्रदर्शन वाल्मिक दादा रामटेके यांनी केले तर प्राध्यापिका सरोज वाणी यांनी धम्म पालन गाथेने बाबासाहेबांच्या जयन्तीच्या कार्यक्रमाचा शेवट केला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!