निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयसामाजिक / सांस्कृतिक

“भंडारा पोटनिवडणूकीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घेण्याची आंबेडकरी मतदाराला अकोला व अमरावती मधुन संधी..!”

देशभरात लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. अकोला व अमरावती लोकसभा मतदारसंघात मात्र वेगळीच चर्चा सुरू आहे.. नागपूर व कोल्हापूर येथे कांग्रेसला व बारामती येथे सुप्रिया सुळे यांना वंचित बहुजन आघाडीने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.. अकोला येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये अशी आंबेडकरी जनतेची अपेक्षा होती..पण बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसने चक्क “आर एस एस चे स्वयंसेवकाला” तिकीट दिल्यामुळे आंबेडकरी जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे..आंबेडकरी जनता कांग्रेस विरोधात प्रचंड संतप्त झाली आहे व भुतकाळात जाऊन कांग्रेसचे “चाल व चरीत्र्यासंबंधात” काही प्रश्न निर्माण झाले आहे.

१) महापरीनिर्वाण झाल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शिवाजी पार्क ह्या जागेवर अंत्यसंस्कार करावे अशी मागणी करण्यात आली होती पण ही शासकीय जागा सुध्दा “कांग्रेसने” दिली नव्हती. तेथे अंत्यसंस्कार करण्यास सुध्दा मनाई करण्यात आली होती..शेवटी बाबासाहेब आंबेडकर यांचे स्नेही भंडारी समाजाचे बोले यांनी अंत्यसंस्कारासाठी स्वतःची खाजगी जागा दिली होती. ह्यावरून किती द्वेष ठासून भरलेला होता हे दिसून येते..
२) “ओबीसी” समाजासाठीचा “कालेलकर आयोग” व मोरारजी देसाई प्रधानमंत्री असताना आणलेला “मंडल आयोग” कांग्रेसने दडपून टाकला . डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कांग्रेसने भारतरत्न पुरस्कार प्रदान केला नाही संसदेत तैलचित्र लावले नव्हते व्हि.पी. सिंग साहेब प्रधानमंत्री असताना त्यांनी “ओबीसी” समाजासाठी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिले तसेच संसदेत तैलचित्र लावले.
३) भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत कांग्रेसने “भाऊराव बोरकर” ह्या सुमार दर्जाचा व्यक्तीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विरोधात उभा करून व षडयंत्र रचुन त्यांचा पराभव घडवून आणला व बाबासाहेबांसारख्या जागतिक दर्जाचे विद्वानाला संसदेत जाण्यापासून रोखले. अगदी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज “बाळासाहेब आंबेडकर” व “आनंदराज आंबेडकर” यांच्या विरोधात काँग्रेसने जाणुनबुजून षडयंत्र रचले आहे..”आनंदराज आंबेडकर” यांना अमरावती लोकसभेची जागा सोडण्याचे आश्वासन दिले होते पण ऐनवेळी कांग्रेसने “दगा” दिला. विशेष म्हणजे बाळासाहेब आंबेडकर व आनंदराज आंबेडकर ह्या दोन भावात भांडणे लावण्याचे “काटकारस्थान” सुध्दा कांग्रेसने केले पण तसे झाले नाही हे दोन्ही भाऊ अतिशय परीपक्व असल्याने ऐक्य भक्कम ठेवले. “दगा” किंवा “विश्वासघात” व “षडयंत्र” हा कांग्रेसच्या DNA मध्ये ठासून भरलेला आह. भंडाऱ्यात ७० वर्षांपूर्वी बाबासाहेबांना पाडण्यासाठीही काँग्रेसने १९५४ च्या भंडारा लोकसभा निवडणुकीतही फोडाफोडी अन् मतदारांना आमिष, धमकी अगदी तसेच शेड्यूल कास्ट फेडरेशनचे (शेकाफे) कार्यकर्ते फोडले होते. पैकी भाऊराव बोरकरांना काँग्रेसने उमेदवारी दिली. बाबासाहेबांच्या पराभवासाठी काँग्रेसने ७० वर्षांपूर्वी केलेली ही खेळी आता तर सर्वच पक्षांचा ‘पॅटर्न’ बनलाय. लोकशाहीचे उद्गाते अन् संविधानाच्या शिल्पकाराचा त्या वेळी कसा पाडाव केला गेला याचे थोडक्यात विवेचन. भंडाऱ्यातून १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले चतुर्भुज जसानी विजयी झाले होते. पण जसानी ठेकेदार असल्यामुळे त्यांना खासदारकी गमवावी लागली व मग १९५४ साली पोटनिवडणूक लागली. निवडणूकीपूर्वी नागपुरात “शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या” बैठकीत बाबासाहेबांशी रावसाहेब ठवरे यांचा वाद झाला होता. त्यामुळे ठवरेंसह काही कार्यकर्ते बाबासाहेबांवर नाराज होते. या नाराजीचा फायदा घेत काँग्रेसचे तत्कालीन नेते नाशिकराव तिरपुडे आणि मनोहरभाई पटेल यांनी ठवरेंना काँग्रेसमध्ये ओढले. ठवरे समर्थक भाऊरावांना उभे केले. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, दादासाहेब गायकवाड, दादासाहेब कुंभारे, माईसाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेबांचा प्रचार केला. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहर पटेल पंडित नेहरूंचे विश्वासू होते. त्यांच्याच नेतृत्वात बाबासाहेबांना पाडण्यासाठी बाळकृष्ण वासनिक, नाशिकराव तिरपुडे, रावसाहेब ठवरे आणि भाऊराव बोरकर या टीमने काम केले. मनोहरभाई आणि जसानींचा विडीचा व्यवसाय होता. विडी मजूर म्हणून दलित वर्ग त्यांच्याचकडे कामाला होता. विडी मजुरी काढू अशी धमकी दिल्यामुळे हवालदिल मतदारांवर त्याचा परिणाम झाला. शिवाय १ रुपया आणि १ मिठाची पुडी मतदारांना दिली. बाबासाहेबांच्या सभेला लोकांनी जाऊ नये म्हणून भारत सेवक सिद्धार्थ या मन्साराम राऊत यांच्या वसतिगृहात जेवण दिले गेले. अशा रितीने जागतिक दर्जाचे विद्वान व अस्पृश्य समाजाचे मसीहा डॉ बाबासाहेब कांग्रेसने षडयंत्र रचुन १९५४ च्या भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव घडवून आणला होता.बोरकर विजयी झाले, पण त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भंडाऱ्यातील लोकांनी कायमचा बहिष्कार टाकला होता (स्त्रोत- प्रा. वामन तुरिले निवडणुकीचे साक्षीदार). आतासुद्धा आंबेडकरी समाजातील भाऊराव बोरकरी संप्रदायाचे विकाऊ, अल्पसंतुष्ट, दर पंचवार्षिक निवडणुकीत काही “सुपारी बहादुर”, काही कांग्रेसने दिलेल्या “पुरस्काराच्या” ओझ्याने दबलेले, “काही समाजसेवेची झुल पांघरणारे धंदेवाईक राजकारणी” काही “बिदागी” घेऊन लेखण्या परजणारे पत्रकार साहित्यिक पावसाळ्यात ज्याप्रमाणे भुछत्रे उगवतात तसेच ऐन निवडणुकीच्या हंगामात सक्रिय झाले आहेत व बाळासाहेब आंबेडकर व आनंदराज आंबेडकर हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज असलेले दोन्ही बंधु निवडून येऊ नये म्हणून कटकारस्थान रचत आहेत…..हे लोक “समाजद्रोही” व “आंबेडकरद्रोही” आहेत आंबेडकरी समाज अशा “समाजद्रोह्यावर” लक्ष ठेवून आहे…व कोणत्याही परिस्थितीत “बाळासाहेब आंबेडकर व आनंदराज आंबेडकर” ह्या दोन्ही बंधुचा विजय खेचून आणनार आहे ह्यात तिळमात्र शंका नाही…

“जय भीम जय शिवराय जय ज्योती जय सावीत्री”

????

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!