महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचाऱ्यांची फौज उभी केलीय.. ED कारवाई करणार काय ? – उध्दव ठाकरे

इलेक्टोरल बॉण्ड प्रकरण हे मोदी सरकारचे ‘मनी लाँडरिंग’ आहे, अजून ३००० पेक्षा जास्त बॉण्ड्स ची माहिती दिलेली नाही. असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. देशाच्या राजकारणामध्ये सध्या इलेक्टोरल बॉण्डचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे सर्वच राजकीय पक्ष आघाड्या आणि युतीच्या माध्यमातून लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलेले असतानाच दुसरीकडे सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील खटल्यामुळे राजकीय पक्ष अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातही इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून सर्वाधिक देणगी मिळालेल्या भारतीय जनता पार्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे गटानेही इलेक्टोरल बॉण्डच्या मुद्द्यावरुन भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

छत्तीसगड निवडणुकीच्या काळात तेथील तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर महादेव गेमिंग ऍप प्रकरणी धाडी घातल्या, पण फ्युचर गेमिंग या जुगारी ऍपकडून बाराशे कोटींचे दान भाजपच्याच पारड्यात पडल्याचे स्पष्ट दिसते. अनेक बनावट कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून कोट्यवधींचे बॉण्डस् खरेदीचा खेळ भाजपने केला. ज्या कंपन्यांची उलाढाल दोनशे कोटींची नाही त्या कंपन्या तीनशे कोटींचे बॉण्डस् खरेदी करतात व भाजपला दान देतात. हा सरळ सरळ काळ्याचे पांढरे करण्याचा धंदा आहे. हे सरळ सरळ मनी लाँडरिंग आहे. भाजपने हे मनी लाँडरिंग केले व त्याबद्दल भाजपवर ईडीने कारवाई का करू नये?” असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!