
आजची बातमी, 6/2/25
ऐकली. ऐका कार्यक्रमात
मोहन भागवत म्हणतात की हिंदुसमाज एकसंघ होत नाही, तोपर्यंत हिंदुसमाजाचा विकास होत नाही. कोणताही समाजाचा विकास हा ऐकीच्या संघटनात्मक संरचनेशिवाय शक्य नाही.
हे साध आणि सोप गणित आहे. इतिहास साक्ष आहे की, हिंदुसमाजाची प्रगती कमी आणि अधोगतीच अधिक झालेली आहे.
आणि त्याचे मुख्य कारण आहे, हिंदुसमाजाचा हिंदुधर्म हा जाती आणि पोटजातीत विभाजित आहे.
आणि जोपर्यंत हिंदुधर्मात ब्राह्मण_ शुद्र जातीव्यवस्थता, जातीभेद, आहे तोपर्यंत हिंदुधर्म जीवंत आहे आणि ज्या दिवसी हिंदुधर्मातील जाती,पोटजाती ,ब्राह्मण_ शुद्रा तील
भेद गळुन पडेल, ब्राह्मणत्व आणि शुद्रत्व [ओबीसी] गळुन पडेल तरच हिंदुसमाज एकसंघ शक्य आहे पण अशा सामाजिक परिस्थितीत हिंदुधर्माचाच अंत होतो.आणि मला नाही वाटत की मोहन भागवताचे फुकटचे जन्मजात श्रेष्ठत्व, ब्राह्मणत्व
संपुष्टात येऊन, त्यांना हिंदुसमाज जाती पातीत जो वाटलेला आहे तो एकसंघ करायचा आहे म्हणजे हिंदुधर्मातील ब्राह्मण समाजाचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर याचे मतानुसार समुळ उच्चाटन करायचे आहे?आणि ब्राह्मण समाजाचे जोपर्यंत समुळ उच्चाटन होत नाही आणि सर्व जाती पाती, पोटजाती कोणत्याही जातीभेदाशिवाय एकसंघ होणे अशक्यप्राय आहे. तरीही हिंदुसमाजाला पुन्हा गुमराह करण्याच्या शुद्ध हेतुने,हिंदुधर्मातील जातीव्यवस्थेत समुळ उच्चाटन annihilation of caste झाल्या शिवाय किंवा जाणिव तसे केल्या शिवाय हिंदुसमाज ऐकसंघ होणे कदापिही शक्य नाही,तरीही हिंदुधर्मातील जातीव्यवस्थेचे annihilation of caste डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या प्रमाणे पुस्तक/ग्रंथ रूपी मांडली नव्हे, भारतीय संविधानात तशी तरतूद करून ठेवली असतांना सुद्धा,
सुप्रीम कोर्टापासुन तर राजकीय नेते अभिनेत्यांपर्यत जातीव्यवस्थेचे समुळ उच्चाटन करण्यासाठी,डाॅ.बाबासाहेब आंबेडकरां प्रमाणे, कोणीही क्रांतिकारक पुढाकार घ्यायला तयार नाही ऐकीकडे देशाचे प्रधान मंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्रीपदी विराजमान मंत्रीमंडळ ऐकीकडे स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष, सुवर्ण वर्ष साजरे करीत असतांना कोणीही जातीव्यवस्थेतेचे उच्चाटन annihilation of caste बद्दल चकार शब्द काढायला तयार नाही त्याचे ऐकमेव कारण म्हणजे जाती ब्राह्मणांचे जातीव्यवस्थेबरोबर समुळ उच्चाटन होण्याचा संभव धोका. तसेही कायदेशीर भारतीय संविधानाने अनुच्छेद 13 व 14 ने नुसार जातीव्यवस्थेतील जाती ब्राह्मणांचे समुळ उच्चाटन 1959,च्या 26 जानेवारीलाच झालेले आहे. तरीही मंदीरातील जातीब्राह्मणांचे वर्चस्व आजुनपर्यत संपुष्टात आलेले नाही, annihilation झालेले नाही. त्याचे अंतर्मन स्पष्ट आहे की,कोणत्याही जन्माने ब्राह्मण समाजाला असे वाटत नाही की, ब्राह्मणांचे समुळ उच्चाटन होऊच नये, आणि जातीव्यवस्थेचेही समुळ उच्चाटन होऊ नये कारण असे झाले तर मात्र, सर्वात त्रासदायक यातना ह्या जाती ब्राह्मणांना च होणे संभव असतांना, मोहन भागवत यांचे हिंदुसमाज एकसंघ झाला पाहिजे, हिंदुसमाजाला सांगत सुटणे हे निव्वळ रडगाणे आणि हिंदुसमाजाला गुमराह करण्याच्या मानसिक षडयंत्रा शिवाय दुसरे काहीही नाही. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मुंबई त आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुसमाज, मराठा समाजाला गुमराह करण्यांच्या सहहेतुक केलेले संभाषण होय.
म्हणूनच, राष्ट्रीय प्रज्ञाजानकरांनी
मोहन भागवता पासून सावधान राहणे काळाची गरज होय.
हिंदुसमाज एकसंघ जो पर्यंत जातीब्राह्मणांचे, जातीव्यवस्थेचे समुळ उच्चाटन होत नाही, तो पर्यंत अशक्य असणारी काळ्या दगडावरी,
रेषा होय.
प्रा.मुकुंद दखणे.
यवतमाळ 9373011954.
जयभीम 🙏🏾जयभारत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत