निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

भाजपा हा मुठभर लोकांच्या हिताचा पक्ष – शरद पवार

बारामती : लोकसभा 2024 च्या निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक भाष्य केले आहे. केंद्रातील भाजपा प्रणित सरकारने जनतेच्या पैशावर गाव खेड्यातील गोर गरीबा साठी कांहीं केले नसून मुठभर उद्योगपती साठी सवलती, कर्जमाफी इत्यादी प्रयत्न केले आहेत त्यामुळे भाजप पक्ष खेड्यापाड्यातील लोकांच्या हिताचा पक्ष नाही, मूठभर लोकांच्या हिताचा पक्ष आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

बारामतीची निवडणूक ही घरातच होत आहे. घरात निवडणूक होण्याचं काही कारण नव्हतं. काही जण पक्ष सोडून गेले ही सांगायची गोष्ट नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणी स्थापना केली हे संबध देशाला माहिती आहे. आत्तापर्यंत जे लोक निवडून आणले ते कुणी आणले? त्यांना पदे दिली? ती कुणी दिली? मी कधी स्वतःला काही मागितलं नाही. आपण नवीन कार्यकर्ते तयार करणे त्यांना प्रोत्साहन देणे त्यांच्या विकासाचं काम करून घेणे हाच माझा स्वभाव होता आणि दहा वीस वर्षांमध्ये मी स्थानिक राजकारणात लक्ष दिलं नाही असही ते म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!